शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

एका तासात नेमकं काय घडलं? बार आणि रेस्टॉरंटवर पालिका प्रशासन मेहेरबान का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 23:27 IST

केडीएमसी प्रशासनाने बार आणि हॉटेल सुरू ठेवण्यास रात्री 11 वाजेपर्यंत वाढीव मुदत दिली.या निर्णयामुळे सध्या व्यापारी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे. (Kalyan Dombivali Municipal corporation)

कल्यान - बुधवारी कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत तबल 392 कोरोना रुग्ण आढळल्याने महापालिका प्रशासनाची धावपळ उडाली. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने बुधवारी संध्याकाळी साधारणपणे साडे सहा वाजण्याच्या सुमारास  माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानांना सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बार  हॉटेल्स- रेस्टॉरंट रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहतील असेही त्यांनी नमुद केले होते. (What exactly happened in an hour? Why is the municipal administration kind to bars and restaurants?)

मात्र एक तासाच्या कालावधीनंतर  महापालिकेने  कोलांटीउडी घेत बार आणि हॉटेल्स रात्री 9 वाजेपर्यंत नाही तर रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या एका तासात नेमकं काय घडलं? पालिकेने आपला निर्णय का बदलला? पालिका प्रशासन हॉटेल आणि बार वर मेहेरबान का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

त्यातच शनिवारी आणि रविवारी p1 pe नुसार  दुकानं सुरू राहतील असे आदेशही पालिकेने दिले आहेत. त्यामुळे साहजिकच व्यापाऱ्यांचे यात नुकसान होणार आहे. असे असताना बार आणि हॉटेल्स बाबत मात्र वेगळा निर्णय घेतला जातो. हातगाडीलासुद्धा सायंकाळी 7 तर  पोळीभाजी केंद्राला सुद्धा रात्री 9 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. हे सर्व एकीकडे असताना फक्त बार आणि हॉटेल बाबत वेगळा निर्णय घेतला जात आहे. 

कोरोनां फक्त आमच्याच दुकानातून पसरतो का? बार आणि रेस्टॉरंटमधून कोरोनाचा प्रसार होणार नाही का? आमच्या बाबतीतच दुजाभाव का, अशा एक ना अनेक प्रश्नांचा भडिमार कल्याणडोंबिवलीतील व्यापारी करू लागलेत. झाले असे की , केडीएमसी प्रशासनाने बार आणि हॉटेल सुरू ठेवण्यास रात्री 11 वाजेपर्यंत वाढीव मुदत दिली.या निर्णयामुळे सध्या व्यापारी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे. इतर ठिकाणी ज्याप्रमाणे नियम सर्वांसाठी सारखे लागू करण्यात आले आहेत, त्याप्रमाणे केडीएमसीनेही सर्वांना सारखे नियम लागू करावेत. आम्ही केडीएमसीच्या सोबत आहोत मात्र आमच्या बाबतीत दुजाभाव केला जात असल्याच्या भावना व्यापारी व्यक्त करत आहेत.  

त्यामुळे येणाऱ्या काळात व्यापाऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी केडीएमसीकडून काही वेगळा निर्णय घेण्यात येतो का तसेच व्यपाऱ्यांच्या प्रतिनिधींशी पालिका प्रशासन चर्चा करून काही तोडगा काढते का ? हे पाहणे महत्वाचे आहे. त्यासोबतच नियम मोडल्यावर ज्याप्रमाणे  फेरीवाले, सामान्य नागरिक, व्यापारी यांच्यावर कारवाई केली जाते तशी  बेधडक कारवाई  या हॉटेल्स आणि बारवर देखील केली जाते का ते येणाऱ्या दिवसात समजेल. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याkalyanकल्याणdombivaliडोंबिवली