शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

कल्याण ग्रामीणमध्ये दोन माजी आमदारांनी पुन्हा मतमोजणीसाठी केला अर्ज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 22:59 IST

कल्याण ग्रामीणची लढाई प्रतिष्ठेची.मानली जात होती... या लढाईत खरा सामना भोईर विरुद्ध पाटील असाच होणार असे राजकीय कयास बांधले गेले. मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश मोरे हे या ठिकाणाहून विजयी झाले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

मयुरी चव्हाण काकडे : 

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून काही दिवस उलटले असले तरी या निकालाची चर्चा अजूनही देशभरात सुरू आहे.. काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागल्याने ईव्हीएम मशीनच्या यंत्रणेवर सोशल मीडियासह इतर व्यासपीठांवरही  अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत.. डोंबिवली विधानसभेत ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज केल्याची माहिती ताजी असतानाच कल्याण ग्रामीणमध्ये ही मनसेचेराजू पाटील आणि ठाकरे गटाचे सुभाष भोईर या दोघांनीही ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांकडे या मतदारसंघाच्या मतमोजणीची पुन्हा मागणी केली आहे. कल्याण ग्रामीणची लढाई प्रतिष्ठेची.मानली जात होती... या लढाईत खरा सामना भोईर विरुद्ध पाटील असाच होणार असे राजकीय कयास बांधले गेले. मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश मोरे हे या ठिकाणाहून विजयी झाले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मोरे हे चांगल्या मताधिक्याने निवडून आल्याने त्यांचा विजय संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. या मतदारसंघात काटे की टक्कर होणार हे अंदाज खोटे ठरले आणि बक्कळ लीड घेऊन राजेश मोरे आमदार झाले. विश्वासनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निकालानंतर दोन माजी आमदार एकमेकांच्या संपर्कात आले. ज्या परिसरात संबंधित आमदारांचे वर्चस्व होते त्या ठिकाणाही दोघे आमदार पिछाडीवर होते तर शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर होते... हे कसे काय शक्य आहे? अशी चर्चा दोन्ही आमदारांमध्ये झाली. त्यानंतर मनसेच्याराजू पाटील यांनी 22 तर सुभाष भोईर यांनी 5 व्हीव्हीपॅट यंत्रातील मते पुन्हा मोजणीसाठी अर्ज केला आहे. या वृत्ताला ठाकरे गट आणि मनसेकडून दूजोरा देण्यात आला असून मतमोजणीसाठी लागणारी रक्कम देखील भरण्यात आल्याचे सांगण्यात आले.व्हीव्हीपॅट यंत्रातील मते मोजणीसाठी ठिकाण आणि तारीख निश्चित केली जाईल असं दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आलं.राजकारणामध्ये  विजय - पराभव या गोष्टी  सुरूच असतात मात्र मतमोजणी मध्ये शंभर टक्के गोंधळ झाला असून पुन्हा मतमोजणी केल्यावर काय माहिती समोर येईल ही माहिती नाही पण कल्याण ग्रामीण मधील नागरिकांमध्ये ही या निकालाविषयी उलट सुलट चर्चा सुरू आहे असे या दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे निवडणूक निकालानंतर एकत्र येणारे हे माजी आमदार कल्याण ग्रामीण मधील पुढची राजकीय गणित जुळवण्यासाठी एकत्र येतात का?  ते पाहावं लागेल

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raju Patilराजू पाटीलMNSमनसेShiv Senaशिवसेना