शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

Tauktae Cyclone: तौक्ते वादळाचा फटका शेतमालाला, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची ४० टक्के कमी आवक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 4:24 PM

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असा कल्याण बाजार समितीचा नावलौकीक आहे.

कल्याण-तौक्ते वादळाचा फटका शेतमालास बसला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आज ४० टक्के कमी शेतमालाची आवाक झाली आहे. त्यात वीज पुरवठा खंडीत असल्याने आलेला शेतमाल व्यापारी वर्गाला विकण्यात अडचणी आल्या. फासरा मालही विकला गेला नाही.

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असा कल्याण बाजार समितीचा नावलौकीक आहे. या बाजार समितीत कालच्या तारखेत ३ हजार २५४ क्विंटल फळ आणि भाजी पाल्याचा माल आला होता. काल तौक्ते वादळामुळे आज पहाटे बाजारात फळ आणि भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. आजच्या तारखेत केवळ १ हजार २३४ क्विंटल इतकाच फळ आणि भाजीपाला आला. पुणे, जुन्नर, नाशिक या भागातून कल्याण बाजार समितीत शेतमाल येतो. त्याचबरोबर गुजरात आणि राज्यस्थान आणि मध्य प्रदेशातून शेतमाल येतो. काल वादळी वाऱ्याचा तडाखा बसल्याने शेतमालाची वाहतू करणारे शेतमालाचे ट्रक टेम्पो कल्याणपर्यंत पोहचू शकले नाही. कांदा बटाट्याची वाहतू करणारे टेम्पो ट्रक गुजरात आणि राजस्थानमधून आले होते.

मात्र ते कालच्या तारखेत कल्याणमध्ये दाखल झाले होते. आज शेतमालाची आवक वादळी वाऱ्यामुळे झालेली नाही. फळ आणि भाजीपालाप्रमाणोच कांदाच्या आवक ९६० क्विंटल, बटाट्याची आवक १६३५ क्विंटल आणि अन्नधान्याची आवाक १ हजार ६६० क्विंटल इतकी झाली आहे. कालच्या तारखेत कांद्याची आवक २ हजार ६५८ क्विंटल, बटाट्याची आवक १ हजार ३६० क्विंटल आणि अन्नधान्याची आवाक ९७४ क्विंटल इतकी झाली आहे.

कोरोनामुळे केवळ अत्यावश्यक बाब म्हणून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजार सुरू ठेवण्यात आला आहे. तसेच दर रविवारी बाजार समिती बंद ठेवली जाते. कोरोनामुळे बाजारातील व्यापारी वर्गास फटका सहन करावा लागत असताना आत्ता तौक्ते वादळी वाऱ्यांचाही फटका बाजार समितीला सहन करावा लागला असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्यामकांत चौधरी यांनी सांगितले की, तौक्ते वादळी वाऱ्याचा फटका बाजार समितीला बसला आहे. बाजार समितीत  शेतमालाची आवाक ४० टक्के कमी झाली आहे. त्यात बाजार समितीचा वीज पुरवठा खंडीत असल्याने व्यापाऱ्यांना व्यापार करता आलेला नाही. फार कमी प्रमाणात मालाला उठाव होता. 

 

टॅग्स :kalyanकल्याणTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळMarketबाजार