शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

शिवतीर्थावर हिंदू शब्द उच्चारण्याची हिंमत झाली नाही, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By मुरलीधर भवार | Updated: March 24, 2024 21:25 IST

'ओमर अब्दुल्लाला जाब विचारण्याची हिंमत कुठून येईल ?'

कल्याण:  जम्मू कश्मीर मध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही असे विधान ओमर अब्दुल्ला यांनी केले होते. या विधानावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष केले. यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला. त्याला राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र ओमर अब्दुल्ला यांनी महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही' असे वक्तव्य केले.

ओमार अब्दुल्लाचा महाराष्ट्र राज्यभर निषेध सुरू आहे, मी देखील तीव्र शब्दात निषेध करतो. प्रत्यक्षात काश्मीरला सगळ्यात जास्त पर्यटक महाराष्ट्रातून जातात. टुरिझमच्या माध्यमातून महाराष्ट्रातून काश्मीरला सगळ्यात जास्त उत्पन्न मिळते. ज्यांनी हिंदुत्वाच्या, मराठी माणसाच्या नावावर राजकारण केले. त्यांनी ओमार अब्दुल्लाना विचारण्याची हिंमत ठेवावी अडीच वर्षात सत्तेसाठी लाचारी पत्करली व आत्ता २०२४ मध्ये सत्तेचे अपेक्षाने लाचारी पत्करतायत.

जे राहुल गांधी कायम सावरकरांबद्दल नकारात्मक बोलतात त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याचं काम तसेच त्यांचे स्वागत करण्याचं काम हे करतात. ज्या शिवतीर्थावरून बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अंगार प्रत्येकाचा मनात फुलवण्याचं काम केलं . त्या शिवतीर्थावर  एकदा हिंदू शब्द उच्चारण्याची देखील त्यांची हिंमत झाली नाही. तर ओमर अब्दुल्लाला विचारण्याची हिंमत कुठून येईल ?अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. 

महाराष्ट्राच्या राजकारणाचा रंग भगवा  

आज होळीचा सण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय .उद्या धुलीवंदन साठी नागरिकांमध्ये एकच उत्साहात वातावरण पाहायला मिळतोय . कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली मधील होळीच्या विविध कार्यक्रमांना आज हजेरी लावली होती . कल्याण पूर्वेकडील एका कार्यक्रमात पत्रकारांनी श्रीकांत शिंदे यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा रंग कोणता असेल असा प्रश्न विचारला असता त्यांनी भगवा असेल असे उत्तर दिले .

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेOmar Abdullahउमर अब्दुल्ला