शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
6
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
7
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
8
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
9
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
10
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
11
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
12
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
13
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
14
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
16
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
17
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
18
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
19
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
20
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ

संविधान यशस्वी करण्याची जबाबदारी समाजाची : श्यामकांत अत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 14:29 IST

Constitution Day: आयोजकांनी कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शाहिदांना तसेच कोविड महामारीच्या काळात दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली.

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: भारतीय संविधान हे सर्व दृष्टीने परिपूर्ण आहे . परंतु ते यशस्वी करण्याची जबाबदारी समाजाची असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत माजी प्राचार्य श्यामकांत अत्रे यांनी व्यक्त केले. संविधान दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील अभ्युदय प्रतिष्ठान या संस्थेने पेंढरकर सभागृह, टिळकनगर विद्यामंदिर येथे गुरुवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील साठ देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला. त्यामुळे देशोदेशींच्या राज्यघटनेतील अनेक चांगल्या बाबींचे प्रतिबिंब आपल्याला भारतीय राज्यघटनेत पाहायला मिळते. भारतीय राज्यघटना केवळ पाश्चात्य विचारांवर आधारित नाही. हजारो वर्षांच्या संतुलित समाज व्यवस्थेची परंपरा तिला लाभली आहे. त्यामुळेच ती बंदिस्त नाही. तिच्यात लवचिकता आहे . ज्यामुळे तिच्यात कालानुरूप, लोकांच्या आशा-अपेक्षांनुसार सुधारणा केली जाऊ शकते असे ते म्हणाले.

नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्ये यांबाबत राज्यघटनेने मौलिक भाष्य केलेले आहे परंतु समाज कर्तव्यपारायण नसल्याने समाज अपेक्षित यश प्राप्त करू शकला नाही असे ते म्हणाले. आयोजकांनी कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शाहिदांना तसेच कोविड महामारीच्या काळात दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली. व्यासपीठावर भारतमाता, डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमा, राज्यघटनेची प्रत अशी योजना केली होती ज्यांचे सर्व उपस्थितांनी पूजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभ्युदय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विठ्ठल भट असल्याची माहिती संघ स्वयंसेवक चंद्रकांत जोशी यांनी दिली. 

टॅग्स :kalyanकल्याणConstitution Dayसंविधान दिन