शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

संविधान यशस्वी करण्याची जबाबदारी समाजाची : श्यामकांत अत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 14:29 IST

Constitution Day: आयोजकांनी कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शाहिदांना तसेच कोविड महामारीच्या काळात दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली.

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: भारतीय संविधान हे सर्व दृष्टीने परिपूर्ण आहे . परंतु ते यशस्वी करण्याची जबाबदारी समाजाची असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत माजी प्राचार्य श्यामकांत अत्रे यांनी व्यक्त केले. संविधान दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील अभ्युदय प्रतिष्ठान या संस्थेने पेंढरकर सभागृह, टिळकनगर विद्यामंदिर येथे गुरुवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील साठ देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला. त्यामुळे देशोदेशींच्या राज्यघटनेतील अनेक चांगल्या बाबींचे प्रतिबिंब आपल्याला भारतीय राज्यघटनेत पाहायला मिळते. भारतीय राज्यघटना केवळ पाश्चात्य विचारांवर आधारित नाही. हजारो वर्षांच्या संतुलित समाज व्यवस्थेची परंपरा तिला लाभली आहे. त्यामुळेच ती बंदिस्त नाही. तिच्यात लवचिकता आहे . ज्यामुळे तिच्यात कालानुरूप, लोकांच्या आशा-अपेक्षांनुसार सुधारणा केली जाऊ शकते असे ते म्हणाले.

नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्ये यांबाबत राज्यघटनेने मौलिक भाष्य केलेले आहे परंतु समाज कर्तव्यपारायण नसल्याने समाज अपेक्षित यश प्राप्त करू शकला नाही असे ते म्हणाले. आयोजकांनी कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शाहिदांना तसेच कोविड महामारीच्या काळात दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली. व्यासपीठावर भारतमाता, डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमा, राज्यघटनेची प्रत अशी योजना केली होती ज्यांचे सर्व उपस्थितांनी पूजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभ्युदय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विठ्ठल भट असल्याची माहिती संघ स्वयंसेवक चंद्रकांत जोशी यांनी दिली. 

टॅग्स :kalyanकल्याणConstitution Dayसंविधान दिन