शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

संविधान यशस्वी करण्याची जबाबदारी समाजाची : श्यामकांत अत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 14:29 IST

Constitution Day: आयोजकांनी कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शाहिदांना तसेच कोविड महामारीच्या काळात दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली.

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: भारतीय संविधान हे सर्व दृष्टीने परिपूर्ण आहे . परंतु ते यशस्वी करण्याची जबाबदारी समाजाची असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत माजी प्राचार्य श्यामकांत अत्रे यांनी व्यक्त केले. संविधान दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील अभ्युदय प्रतिष्ठान या संस्थेने पेंढरकर सभागृह, टिळकनगर विद्यामंदिर येथे गुरुवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील साठ देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला. त्यामुळे देशोदेशींच्या राज्यघटनेतील अनेक चांगल्या बाबींचे प्रतिबिंब आपल्याला भारतीय राज्यघटनेत पाहायला मिळते. भारतीय राज्यघटना केवळ पाश्चात्य विचारांवर आधारित नाही. हजारो वर्षांच्या संतुलित समाज व्यवस्थेची परंपरा तिला लाभली आहे. त्यामुळेच ती बंदिस्त नाही. तिच्यात लवचिकता आहे . ज्यामुळे तिच्यात कालानुरूप, लोकांच्या आशा-अपेक्षांनुसार सुधारणा केली जाऊ शकते असे ते म्हणाले.

नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्ये यांबाबत राज्यघटनेने मौलिक भाष्य केलेले आहे परंतु समाज कर्तव्यपारायण नसल्याने समाज अपेक्षित यश प्राप्त करू शकला नाही असे ते म्हणाले. आयोजकांनी कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शाहिदांना तसेच कोविड महामारीच्या काळात दिवंगत झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली. व्यासपीठावर भारतमाता, डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमा, राज्यघटनेची प्रत अशी योजना केली होती ज्यांचे सर्व उपस्थितांनी पूजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभ्युदय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विठ्ठल भट असल्याची माहिती संघ स्वयंसेवक चंद्रकांत जोशी यांनी दिली. 

टॅग्स :kalyanकल्याणConstitution Dayसंविधान दिन