शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

"मुलींच्या पालकांना जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल तर..."; देवेंद्र फडणवीसांनी दिले महत्त्वाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 15:00 IST

बदलापूर प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली

Badlapur School Case: बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरात बंद पुकारण्यात आला आहे. तर संतप्त नागरिकांकडून शाळेची तोडफोड करण्यात आली आहे. दुसरीकडे नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन करुन रेल्वेमार्ग रोखून धरला आहा. आता या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

दलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन लहान मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आलं आहे. त्यानंतर संतापलेल्या पालकांनी सोमवार बदलापूर रेल्वे स्थानक आणि आदर्श शाळेच्या बाहेर आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांनी शाळेत घुसून तोडफोड केली आहे. तर रेल्वे स्थानकावर असलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आरोपीला तात्काळ शिक्षा व्हावा यासाठी सरकार तात्काळ प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

"बदलापूर येथील घटना दुर्दैवी आहे. शाळेतील दोन लहान मुलींना सफाई कर्मचाऱ्याने ज्या प्रकार अत्याचार केला ते अतिशय निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. या घटनेचा लोकांमध्ये उद्रेक पाहायला मिळतो आहे. आम्ही तात्काळ वरिष्ठ आयपीएस अधिकारी भारती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. या प्रकरणात लवकरच आरोपपत्र तयार करण्यास सांगितले आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मागवण्यात आला आहे. कुठल्याही परिस्थितीत आरोपीला तात्काळ शिक्षा व्हावा हा सरकारचा प्रयत्न असेल. त्यासाठी कारवाईची सुरुवात वेगाने करण्यात आलेला आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

"लोकांचा जनसुमुदाय स्वयंस्फूर्तीने आला की कसा आला याच्यावर बोलणं मला योग्य वाटत नाही. भावनांचा उद्रेक असू शकतो. तिथे तात्काळ फाशीची मागणी केली जात आहे. मला असं वाटतं की, कायद्यानुसार जे तात्काळ करता येईल ते करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. ज्या संवेदनशिलतेने काम केले पाहिजे तसा प्रयत्न पोलिसांचा आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे दंगा होऊ यासाठी प्रयत्न करायला हवा. ही घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. तरीही त्यामध्ये कोणीही दिरंगाई केली आहे का किंवा कोणी काही लपवले का याची चौकशी एसआटीमार्फत होणार आहे. पीडितांच्या पालकांना जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल, एफआयआर दाखल करायला जाणीवपूर्वक उशीर केला असेल तर त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे," असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :badlapurबदलापूरCrime Newsगुन्हेगारीUddhav Thackerayउद्धव ठाकरे