शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

"मुलींच्या पालकांना जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल तर..."; देवेंद्र फडणवीसांनी दिले महत्त्वाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 15:00 IST

बदलापूर प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली

Badlapur School Case: बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरात बंद पुकारण्यात आला आहे. तर संतप्त नागरिकांकडून शाळेची तोडफोड करण्यात आली आहे. दुसरीकडे नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन करुन रेल्वेमार्ग रोखून धरला आहा. आता या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

दलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन लहान मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आलं आहे. त्यानंतर संतापलेल्या पालकांनी सोमवार बदलापूर रेल्वे स्थानक आणि आदर्श शाळेच्या बाहेर आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांनी शाळेत घुसून तोडफोड केली आहे. तर रेल्वे स्थानकावर असलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आरोपीला तात्काळ शिक्षा व्हावा यासाठी सरकार तात्काळ प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

"बदलापूर येथील घटना दुर्दैवी आहे. शाळेतील दोन लहान मुलींना सफाई कर्मचाऱ्याने ज्या प्रकार अत्याचार केला ते अतिशय निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. या घटनेचा लोकांमध्ये उद्रेक पाहायला मिळतो आहे. आम्ही तात्काळ वरिष्ठ आयपीएस अधिकारी भारती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. या प्रकरणात लवकरच आरोपपत्र तयार करण्यास सांगितले आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मागवण्यात आला आहे. कुठल्याही परिस्थितीत आरोपीला तात्काळ शिक्षा व्हावा हा सरकारचा प्रयत्न असेल. त्यासाठी कारवाईची सुरुवात वेगाने करण्यात आलेला आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

"लोकांचा जनसुमुदाय स्वयंस्फूर्तीने आला की कसा आला याच्यावर बोलणं मला योग्य वाटत नाही. भावनांचा उद्रेक असू शकतो. तिथे तात्काळ फाशीची मागणी केली जात आहे. मला असं वाटतं की, कायद्यानुसार जे तात्काळ करता येईल ते करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. ज्या संवेदनशिलतेने काम केले पाहिजे तसा प्रयत्न पोलिसांचा आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे दंगा होऊ यासाठी प्रयत्न करायला हवा. ही घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली आहे. तरीही त्यामध्ये कोणीही दिरंगाई केली आहे का किंवा कोणी काही लपवले का याची चौकशी एसआटीमार्फत होणार आहे. पीडितांच्या पालकांना जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल, एफआयआर दाखल करायला जाणीवपूर्वक उशीर केला असेल तर त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे," असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :badlapurबदलापूरCrime Newsगुन्हेगारीUddhav Thackerayउद्धव ठाकरे