शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

Jitendra Awhad: "मर जायेंगे, जान देंगे, लेकीन घर नही देंगे"; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 17:49 IST

'मी येऊन गेल्यावर आता बाकीचे नेते येतील', असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

कल्याण: रेल्वेच्या जागेतील झोपडीधारकांना सात दिवसात घरे खाली करण्याच्या नोटीसा रेल्वेने बजावल्याने हवालदिल झालेल्या कल्याणच्या झोपडीधारकांची आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली. यावेळी "मर जायेंगे, जान देंगे, लेकीन घर नही देंगे. झोपडीधारकांच्या पाठीशी मी आहे. या लढ्याचे नेतृत्व मीच करणार आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, 'मी येऊन गेल्यावर आता बाकी नेते इथे येतील', असा खोचक टोला त्यांनी लगावला.

"निवडणूका आल्या आहेत. सगळेच लोक तुमच्याकडे हात जोडायला येतील. आधी अनेक वेळा घरं वाचवली तरी मतं मागितली नाही. आताही घरं वाचवेन पण मतं मागायला येणार नाही," असं म्हणत आव्हाडांनी भाजपला टोला लगावला. आनंदवाडी येथील सरस्वती शाळेसमोर झोपडीधारक मोठया संख्येने जमले होते. यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी हजर होते.

"हा केवळ कल्याणच्या झोपडीधारकांचा प्रश्न नाही. कळवा, मुंब्रा, कल्याण अन्य ठिकाणासह पाच लाख झोपडीधारकांचा प्रश्न आहे. पाच लाख झोपडीधारक एकाच वेळी रस्त्यावर उतरतील. तसं व्हायला नको असेल तर केंद्र आणि राज्य सरकारला ही समस्या सोडवावी लागेल. जेव्हा पोटावर आणि छातीवर येतं, तेव्हा गरीब माणूस ते सहन करु शकत नाही. नोटिसा पाठवणारी रेल्वे इतक्या वर्षे झोपली होती का?" असा सवाल मंत्री आव्हाड यांनी प्रशासनाला केला.

"रेल्वे रोको आंदोलन त्यांनी काही वर्षापूर्वी केले होते. तेव्हा मध्य रेल्वेसह देशभरात जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. ती वेळ पुन्हा रेल्वेला आणायची आहे का? राज्य सरकारचा एसआरएचा कायदा जसाच्या तसा उचलून या जमिनीवर टाका. २०११ पर्यंतच्या सगळया झोपड्या संरक्षित आहेत. सरकारची भूमिका लोकाभिमुख असली पाहिजे. लोकविरोधी भूमिका घेऊन चालणार नाही. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनाही लक्ष घालावे लागेल", असेही आव्हाड यांनी नमूद केले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडkalyanकल्याणrailwayरेल्वे