शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Jitendra Awhad: "मर जायेंगे, जान देंगे, लेकीन घर नही देंगे"; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 17:49 IST

'मी येऊन गेल्यावर आता बाकीचे नेते येतील', असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

कल्याण: रेल्वेच्या जागेतील झोपडीधारकांना सात दिवसात घरे खाली करण्याच्या नोटीसा रेल्वेने बजावल्याने हवालदिल झालेल्या कल्याणच्या झोपडीधारकांची आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली. यावेळी "मर जायेंगे, जान देंगे, लेकीन घर नही देंगे. झोपडीधारकांच्या पाठीशी मी आहे. या लढ्याचे नेतृत्व मीच करणार आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, 'मी येऊन गेल्यावर आता बाकी नेते इथे येतील', असा खोचक टोला त्यांनी लगावला.

"निवडणूका आल्या आहेत. सगळेच लोक तुमच्याकडे हात जोडायला येतील. आधी अनेक वेळा घरं वाचवली तरी मतं मागितली नाही. आताही घरं वाचवेन पण मतं मागायला येणार नाही," असं म्हणत आव्हाडांनी भाजपला टोला लगावला. आनंदवाडी येथील सरस्वती शाळेसमोर झोपडीधारक मोठया संख्येने जमले होते. यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी हजर होते.

"हा केवळ कल्याणच्या झोपडीधारकांचा प्रश्न नाही. कळवा, मुंब्रा, कल्याण अन्य ठिकाणासह पाच लाख झोपडीधारकांचा प्रश्न आहे. पाच लाख झोपडीधारक एकाच वेळी रस्त्यावर उतरतील. तसं व्हायला नको असेल तर केंद्र आणि राज्य सरकारला ही समस्या सोडवावी लागेल. जेव्हा पोटावर आणि छातीवर येतं, तेव्हा गरीब माणूस ते सहन करु शकत नाही. नोटिसा पाठवणारी रेल्वे इतक्या वर्षे झोपली होती का?" असा सवाल मंत्री आव्हाड यांनी प्रशासनाला केला.

"रेल्वे रोको आंदोलन त्यांनी काही वर्षापूर्वी केले होते. तेव्हा मध्य रेल्वेसह देशभरात जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. ती वेळ पुन्हा रेल्वेला आणायची आहे का? राज्य सरकारचा एसआरएचा कायदा जसाच्या तसा उचलून या जमिनीवर टाका. २०११ पर्यंतच्या सगळया झोपड्या संरक्षित आहेत. सरकारची भूमिका लोकाभिमुख असली पाहिजे. लोकविरोधी भूमिका घेऊन चालणार नाही. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनाही लक्ष घालावे लागेल", असेही आव्हाड यांनी नमूद केले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडkalyanकल्याणrailwayरेल्वे