शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

Jitendra Awhad: "मर जायेंगे, जान देंगे, लेकीन घर नही देंगे"; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 17:49 IST

'मी येऊन गेल्यावर आता बाकीचे नेते येतील', असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

कल्याण: रेल्वेच्या जागेतील झोपडीधारकांना सात दिवसात घरे खाली करण्याच्या नोटीसा रेल्वेने बजावल्याने हवालदिल झालेल्या कल्याणच्या झोपडीधारकांची आज गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली. यावेळी "मर जायेंगे, जान देंगे, लेकीन घर नही देंगे. झोपडीधारकांच्या पाठीशी मी आहे. या लढ्याचे नेतृत्व मीच करणार आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, 'मी येऊन गेल्यावर आता बाकी नेते इथे येतील', असा खोचक टोला त्यांनी लगावला.

"निवडणूका आल्या आहेत. सगळेच लोक तुमच्याकडे हात जोडायला येतील. आधी अनेक वेळा घरं वाचवली तरी मतं मागितली नाही. आताही घरं वाचवेन पण मतं मागायला येणार नाही," असं म्हणत आव्हाडांनी भाजपला टोला लगावला. आनंदवाडी येथील सरस्वती शाळेसमोर झोपडीधारक मोठया संख्येने जमले होते. यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी हजर होते.

"हा केवळ कल्याणच्या झोपडीधारकांचा प्रश्न नाही. कळवा, मुंब्रा, कल्याण अन्य ठिकाणासह पाच लाख झोपडीधारकांचा प्रश्न आहे. पाच लाख झोपडीधारक एकाच वेळी रस्त्यावर उतरतील. तसं व्हायला नको असेल तर केंद्र आणि राज्य सरकारला ही समस्या सोडवावी लागेल. जेव्हा पोटावर आणि छातीवर येतं, तेव्हा गरीब माणूस ते सहन करु शकत नाही. नोटिसा पाठवणारी रेल्वे इतक्या वर्षे झोपली होती का?" असा सवाल मंत्री आव्हाड यांनी प्रशासनाला केला.

"रेल्वे रोको आंदोलन त्यांनी काही वर्षापूर्वी केले होते. तेव्हा मध्य रेल्वेसह देशभरात जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. ती वेळ पुन्हा रेल्वेला आणायची आहे का? राज्य सरकारचा एसआरएचा कायदा जसाच्या तसा उचलून या जमिनीवर टाका. २०११ पर्यंतच्या सगळया झोपड्या संरक्षित आहेत. सरकारची भूमिका लोकाभिमुख असली पाहिजे. लोकविरोधी भूमिका घेऊन चालणार नाही. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनाही लक्ष घालावे लागेल", असेही आव्हाड यांनी नमूद केले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडkalyanकल्याणrailwayरेल्वे