शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पत्रीपुलाच्या कार्यक्रमात दोन्ही काँग्रेस नेत्यांना कात्री; महाविकास आघाडीत धुसफूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 02:42 IST

भाजप नेत्यांना व्यासपीठावर स्थान

कल्याण : राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार असतानाही सोमवारी पार पडलेल्या पत्रीपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले नव्हते, अशी तक्रार त्यांनी केली. शिवसेनेकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला डावलण्यात आल्याने काँग्रेसने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. आगामी महापालिका निवडणूक महाविकास आघाडी करून लढवायची असल्यास या नाराजीचे पडसाद त्यावेळी उमटू शकतात, अशी दाट शक्यता आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने पत्रीपुलाचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. हा कार्यक्रम सरकारी असताना हा भेदभाव केल्याबद्दल राष्ट्रवादीने नाराजी प्रकट केली. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनाही बोलावले नव्हते. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत साधा नामोल्लेखही करण्यात आला नव्हता. काँग्रेसचे पोटे यांनी यासंदर्भात एक पत्र काढले. त्यात त्यांनी शिवसेनेला महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विसर पडला आहे. कल्याणमध्ये संजय दत्त हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनाही बोलावले नाही. भाजप नेते शिवसेनेवर नेहमी टीका करतात. त्या भाजपच्या आमदार व खासदारांना कार्यक्रमास बोलावून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा शिवसेनेकडून अपमान करण्यात आल्याचा मुद्दा पोटे यांनी उपस्थित केला.

कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे. राज्यातील महापालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा सरकारमधील घटक पक्षांचा प्रयत्न आहे. मात्र पत्रीपुलाच्या सोहळ्यात शिवसेनेने मित्र पक्षांना डावलून भाजप नेत्यांना व्यासपीठावर बसवल्याने महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी आकाराला येण्यात अडथळे येऊ शकतात. या दोन्ही शहरांत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत असल्याने शिवसेनेने त्यांना गृहीत धरल्याचे बोलले जात आहे.

पत्रीपुलाच्या कार्यक्रमात भाजप खासदार कपिल पाटील यांनी पत्रीपुलाचे काम पूर्णत्वास आले असले तरी भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याची तक्रार केली. त्याचबरोबर ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम ठाणे ते भिवंडी दरम्यान प्रगतीपथावर आहे. मात्र भिवंडी ते कल्याण दरम्यान मेट्रो रेल्वेच्या कामाची निविदाच निघाली नाही. हे मुद्दे पाटील यांनी उपस्थित केले. 

पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी या दिरंगाईकडे लक्ष देण्याची मागणी पाटील यांनी केली. स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्राचा ५० टक्के निधी मिळत असल्याने या प्रकल्पात केंद्र सरकारचे अर्थात भाजपचे योगदान असल्याचा मुद्दा पाटील यांनी उपस्थित केला. निवडणूक आल्यावर वाटप सुरू करू नका, असा टोला शिवसेनेला लगावला. 

या कार्यक्रमास उपस्थित पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. यापूर्वी भाजपच्या सत्ताकाळात कल्याण-डोंबिवलीस ६ हजार ५०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीपूर्वी वचन देणारे वचन देऊन निघून गेले. त्यामुळे निवडणुकीपुरते गाजर वाटप न करता चांगली कामे करा, असा सल्ला ठाकरे यांनी भाजपला दिला. आम्ही केलेली चांगली कामे जनतेसमोर आहेत, अशा शब्दांत पाटील यांना उत्तर दिले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा