शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

पत्रीपुलाच्या कार्यक्रमात दोन्ही काँग्रेस नेत्यांना कात्री; महाविकास आघाडीत धुसफूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 02:42 IST

भाजप नेत्यांना व्यासपीठावर स्थान

कल्याण : राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार असतानाही सोमवारी पार पडलेल्या पत्रीपुलाच्या लोकार्पण सोहळ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले नव्हते, अशी तक्रार त्यांनी केली. शिवसेनेकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला डावलण्यात आल्याने काँग्रेसने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. आगामी महापालिका निवडणूक महाविकास आघाडी करून लढवायची असल्यास या नाराजीचे पडसाद त्यावेळी उमटू शकतात, अशी दाट शक्यता आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने पत्रीपुलाचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. हा कार्यक्रम सरकारी असताना हा भेदभाव केल्याबद्दल राष्ट्रवादीने नाराजी प्रकट केली. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनाही बोलावले नव्हते. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत साधा नामोल्लेखही करण्यात आला नव्हता. काँग्रेसचे पोटे यांनी यासंदर्भात एक पत्र काढले. त्यात त्यांनी शिवसेनेला महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विसर पडला आहे. कल्याणमध्ये संजय दत्त हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनाही बोलावले नाही. भाजप नेते शिवसेनेवर नेहमी टीका करतात. त्या भाजपच्या आमदार व खासदारांना कार्यक्रमास बोलावून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा शिवसेनेकडून अपमान करण्यात आल्याचा मुद्दा पोटे यांनी उपस्थित केला.

कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे. राज्यातील महापालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवण्याचा सरकारमधील घटक पक्षांचा प्रयत्न आहे. मात्र पत्रीपुलाच्या सोहळ्यात शिवसेनेने मित्र पक्षांना डावलून भाजप नेत्यांना व्यासपीठावर बसवल्याने महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी आकाराला येण्यात अडथळे येऊ शकतात. या दोन्ही शहरांत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष संघटनात्मकदृष्ट्या कमकुवत असल्याने शिवसेनेने त्यांना गृहीत धरल्याचे बोलले जात आहे.

पत्रीपुलाच्या कार्यक्रमात भाजप खासदार कपिल पाटील यांनी पत्रीपुलाचे काम पूर्णत्वास आले असले तरी भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याची तक्रार केली. त्याचबरोबर ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम ठाणे ते भिवंडी दरम्यान प्रगतीपथावर आहे. मात्र भिवंडी ते कल्याण दरम्यान मेट्रो रेल्वेच्या कामाची निविदाच निघाली नाही. हे मुद्दे पाटील यांनी उपस्थित केले. 

पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी या दिरंगाईकडे लक्ष देण्याची मागणी पाटील यांनी केली. स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्राचा ५० टक्के निधी मिळत असल्याने या प्रकल्पात केंद्र सरकारचे अर्थात भाजपचे योगदान असल्याचा मुद्दा पाटील यांनी उपस्थित केला. निवडणूक आल्यावर वाटप सुरू करू नका, असा टोला शिवसेनेला लगावला. 

या कार्यक्रमास उपस्थित पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. यापूर्वी भाजपच्या सत्ताकाळात कल्याण-डोंबिवलीस ६ हजार ५०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीपूर्वी वचन देणारे वचन देऊन निघून गेले. त्यामुळे निवडणुकीपुरते गाजर वाटप न करता चांगली कामे करा, असा सल्ला ठाकरे यांनी भाजपला दिला. आम्ही केलेली चांगली कामे जनतेसमोर आहेत, अशा शब्दांत पाटील यांना उत्तर दिले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा