शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

डासांच्या झुंडीने एमआयडीसीचे रहिवासी त्रस्त, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

By अनिकेत घमंडी | Updated: February 27, 2024 12:06 IST

एमआयडीसी निवासी भागात धुळीने आणि रासायनिक प्रदूषणाने नागरिक त्रासलेले असताना त्यात मच्छरांच्या झुंडी रोज सायंकाळी ते सकाळ पर्यंत अंगावर येऊन चावा घेतल्याचा त्रासदायक अनुभव नागरिक घेत आहेत.

डोंबिवली: एमआयडीसी निवासी भागात धुळीने आणि रासायनिक प्रदूषणाने नागरिक त्रासलेले असताना त्यात मच्छरांच्या झुंडी रोज सायंकाळी ते सकाळ पर्यंत अंगावर येऊन चावा घेतल्याचा त्रासदायक अनुभव नागरिक घेत आहेत. गेल्या कित्येक महिन्यात निवासी परिसरात कीटक नाशक फवारणी/धुरिकरण झालेली नाही. महापालिका करतेय काय? असा सवाल रहिवाश्यांनी केला. उघड्या पावसाळी गटारातून सांडपाणी वाहत असल्याने डासांच्या उत्पतीत वाढ होऊन त्यांच्या झुंडी घरात प्रवेश करून नागरिकांना चावत आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांना त्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. केडीएमसीकडे तक्रार करूनही काही त्याची दखल घेतली जात नाही अशी टीका दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी केली.

जे तक्रारदार पाठपुरावा करतात त्या रहिवाशांचा इमारती पुरते फवारणी केली जाते. तरीही डासांचा प्रभाव कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून डासांपासून निर्माण होणारे संसर्ग नागरिकांना होऊन आजार झाल्यास त्यास जबाबदार कोण?असा सवाल नलावडे यांनी केला. जो पर्यंत उघड्या पावसाळी गटार/नाल्यातून सांडपाणी वाहण्याचे बंद होत नाही तोपर्यंत हा डासांचा त्रास कमी होणार नाही. डास पैदास होण्याचे हे मुख्य कारण असून हे सांडपाणी बंदिस्त भूमिगत वाहिन्यांमधून न जाता उघड्या पावसाळी गटार/नाल्यातून जाण्यापासून रोखले गेले पाहिजे. एमआयडीसी निवासी मधील भूमिगत सांडपाणी वाहिन्या या जुन्या झाल्याने ठिकठिकाणी फुटलेल्या अवस्थेत आहेत. आता एमआयडीसी कडून नवीन सांडपाणी वाहिन्या टाकण्याचे काम चालू असून ते काम पूर्ण होण्यास आणखी वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत केडीएमसीने दिवसाआड चांगल्या दर्जाची कीटकनाशक फवारणी/धुरीकरण करणे हा एकमेव उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांना अपेक्षित आहे. कोरोना काळात काही राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नगरसेवक पदाच्या इच्छुक उमेदवारांनी कमी दर्जाची कीटकनाशक फवारणी करून आणि त्याचे फोटो समाजमाध्यमांवर टाकून श्रेय घेतले होते ते आता कुठे गेले असा सवाल नागरिकांनी केला. आता निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे त्यांनी चांगल्या दर्जाची कीटकनाशक फवारणी केडीएमसी कडून करून घ्यावी किंवा स्वखर्चाने करून मतदारांना दिलासा द्यावा असेही नलावडे म्हणाले.