शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

डासांच्या झुंडीने एमआयडीसीचे रहिवासी त्रस्त, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

By अनिकेत घमंडी | Updated: February 27, 2024 12:06 IST

एमआयडीसी निवासी भागात धुळीने आणि रासायनिक प्रदूषणाने नागरिक त्रासलेले असताना त्यात मच्छरांच्या झुंडी रोज सायंकाळी ते सकाळ पर्यंत अंगावर येऊन चावा घेतल्याचा त्रासदायक अनुभव नागरिक घेत आहेत.

डोंबिवली: एमआयडीसी निवासी भागात धुळीने आणि रासायनिक प्रदूषणाने नागरिक त्रासलेले असताना त्यात मच्छरांच्या झुंडी रोज सायंकाळी ते सकाळ पर्यंत अंगावर येऊन चावा घेतल्याचा त्रासदायक अनुभव नागरिक घेत आहेत. गेल्या कित्येक महिन्यात निवासी परिसरात कीटक नाशक फवारणी/धुरिकरण झालेली नाही. महापालिका करतेय काय? असा सवाल रहिवाश्यांनी केला. उघड्या पावसाळी गटारातून सांडपाणी वाहत असल्याने डासांच्या उत्पतीत वाढ होऊन त्यांच्या झुंडी घरात प्रवेश करून नागरिकांना चावत आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांना त्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. केडीएमसीकडे तक्रार करूनही काही त्याची दखल घेतली जात नाही अशी टीका दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी केली.

जे तक्रारदार पाठपुरावा करतात त्या रहिवाशांचा इमारती पुरते फवारणी केली जाते. तरीही डासांचा प्रभाव कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून डासांपासून निर्माण होणारे संसर्ग नागरिकांना होऊन आजार झाल्यास त्यास जबाबदार कोण?असा सवाल नलावडे यांनी केला. जो पर्यंत उघड्या पावसाळी गटार/नाल्यातून सांडपाणी वाहण्याचे बंद होत नाही तोपर्यंत हा डासांचा त्रास कमी होणार नाही. डास पैदास होण्याचे हे मुख्य कारण असून हे सांडपाणी बंदिस्त भूमिगत वाहिन्यांमधून न जाता उघड्या पावसाळी गटार/नाल्यातून जाण्यापासून रोखले गेले पाहिजे. एमआयडीसी निवासी मधील भूमिगत सांडपाणी वाहिन्या या जुन्या झाल्याने ठिकठिकाणी फुटलेल्या अवस्थेत आहेत. आता एमआयडीसी कडून नवीन सांडपाणी वाहिन्या टाकण्याचे काम चालू असून ते काम पूर्ण होण्यास आणखी वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत केडीएमसीने दिवसाआड चांगल्या दर्जाची कीटकनाशक फवारणी/धुरीकरण करणे हा एकमेव उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांना अपेक्षित आहे. कोरोना काळात काही राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नगरसेवक पदाच्या इच्छुक उमेदवारांनी कमी दर्जाची कीटकनाशक फवारणी करून आणि त्याचे फोटो समाजमाध्यमांवर टाकून श्रेय घेतले होते ते आता कुठे गेले असा सवाल नागरिकांनी केला. आता निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे त्यांनी चांगल्या दर्जाची कीटकनाशक फवारणी केडीएमसी कडून करून घ्यावी किंवा स्वखर्चाने करून मतदारांना दिलासा द्यावा असेही नलावडे म्हणाले.