शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

By मुरलीधर भवार | Updated: July 6, 2025 07:23 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या मानसिकदृष्ट्या खचलेल्या नेत्यांना उभारी मिळू शकते. उद्धवसेना व मनसे यांनी एकत्र यावे, याकरिता पलावा उड्डाणपुलाचे आंदोलन कारणीभूत ठरले होते.

मुरलीधर भवार 

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या मानसिकदृष्ट्या खचलेल्या नेत्यांना उभारी मिळू शकते. उद्धवसेना व मनसे यांनी एकत्र यावे, याकरिता पलावा उड्डाणपुलाचे आंदोलन कारणीभूत ठरले होते. कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या स्थापनेनंतर शिवसेनेला फारसा फरक पडला नव्हता. मात्र, मनसेने बाळसे धरल्यावर भाजपला फटका बसला होता. जेव्हा भाजप वाढला, तेव्हा मनसे घटली. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनानंतर मनसे महापालिकेत वाढली तर त्याचा फटका भाजपला बसून शिंदेसेनेशी युती करून सत्ता स्थापन करणे अडचणीचे ठस शकते. अशावेळी कल्याण-डोंबिवलीतील सत्तेच्या चाव्या राज ठाकरे यांच्या हातात येऊ शकतात.

शिवसेनेत उद्धव व राज ठाकरे यांच्यात संघर्ष सुरू असताना कल्याणमध्ये परप्रांतीय परीक्षार्थीना मारहाणीचे प्रकरण घडले. त्यानंतर महापालिकेच्या २०१० साली पार पडलेल्या निवडणुकीत मनसेचे २८ नगरसेवक निवडून आले. तेव्हा भाजपचे जेमतेम नऊ नगरसेवक विजयी झाले.

तेव्हा मनसेमुळे शिवसेनेला नव्हे तर भाजपला फटका बसला. मनसे सत्तेत सहभागी न होता तटस्थ राहिली. पुन्हा शिवसेना-भाजपची सत्ता आली. २०१५ मध्ये महापालिका निवडणुकीत मनसेचा टक्का घसरला. त्यांना केवळ नऊ जागांवर समाधान मानावे लागले.

शिवसेनेच्या त्यावेळी ५२ जागा निवडून आल्या. भाजपच्या ४२ जागा निवडून आल्या. राज्यात आणि केंद्रातील सत्ता परिवर्तनाचा परिणाम महापालिका निवडणुकीतही दिसला होता. शिवसेना फुटीनंतर शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक शिंदेसेनेत गेले. आता केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतके ८ ते १० नगरसेवक उद्धवसेनेत आहेत.

डोंबिवली हा रा. स्व. संघ, भाजपचा बालेकिल्ला आहे. कल्याणमध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. सध्या येथे शिंदेसेना प्रबळ आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्थानिक राजकारणावर वर्चस्व आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही जुन्या शिवसैनिकांना व शिंदेसेनेत अस्वस्थ असलेल्या मंडळींना पुन्हा गळाला लावण्याकरिता उद्धवसेना प्रयत्न करू शकते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उद्धव व आदित्य ठाकरे यांनी येथे फारसे लक्ष दिले नव्हते. मनसेचे नेते व कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्याकरिता आतूर आहेत. अशा परिस्थितीत मनसे वाढल्याने भाजपला यापूर्वी २०१० मध्ये बसला तसा फटका बसला तर शिंदेसेनेच्या भाजपसोबत सत्ता स्थापनेच्या स्वप्नाला धक्का बसू शकतो.