शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

सामान्य प्रवाशांसाठी सुरु झाली रेल्वे सेवा; महिलांनी पेढे वाटून साजरा केला आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 15:38 IST

कामकाजाशी न जुळणारे वेळापत्रक बदलण्याची मागणी

कल्याण-कोरोनामुळे बंद असलेली रेल्वे लोकल सेवा आज सामान्य प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. दहा महिन्यानंतर सुरु करण्यात आलेल्या लोकलसेवेचे आनंद महिला वर्गाने पेढे वाटून साजरा केला. मात्र रेल्वेने सामान्य प्रवाशांकरीता दिलेले वेळापत्रक हे त्यांच्या कामकाजाशी न जुळणारे आहे. वेळापत्रकात बदल व्हावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. प्रवाशांनी नियम मोडू आणि गर्दी होऊ नये याकरीता रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

कल्याण रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेवरील जंक्शन आहे. या रेल्वे स्थानकातून दररोज तीन ते चार लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. कोरोनाच्या लॉकडाऊननंतर आज सर्व सामान्यांकरीता प्रवास खुला करण्यात आला. आज पहाटे ४.४१ वाजता कल्याण रेल्वे स्थानकातून पहिली लोकल गाडी सामान्य प्रवाशाकरीता सोडण्यात आली. गाडीला पहाटेची पहिली गाडी असल्याने गाडीला फारशी गर्दी नव्हती. मात्र प्रवासी सोशल डिस्टसिंग ठेवून गाडीत प्रवासाकरीता बसलेले दिसून आले. सामान्य प्रवाशांकरीता पहाटे ते सकाळी ७ वाजेर्पयत, दुपारी १२ ते ४ वाजेर्पयत आणि रात्री ९ वाजल्यानंतर प्रवास करता येणार आहे. मात्र ज्या चाकरमान्याची डय़ूटी १० वाजताची आहे. त्याला पहाटे सहा वाजताची गाडी पकडून मुंबई गाठावी लागणार आहे. कामाच्या दोन तास आधीच मुंबईत प्रवासी दाखल होईल.

तसेच कामावरुन तो सहा वाजता सुटल्यावर दोन तास त्याला मुंबईत थांबून त्यानंतर त्याला ९ वाजताची गाडी पकडावी लागेल. त्यामुळे पहाटे लवकर उठून रात्री उशिरा १२ वाजता घरी पोहचावे लागेल. एकीकडे गाडय़ा सुरु झाल्या त्याचा आनंद प्रवासी वर्गात होता. मात्र वेळापत्रक जूळून येत नसल्याने ते गैरसोयीचे आहे. दुसरीकडे दररोज रस्ते प्रवासीने वाहतूक कोंडीचा सामना करीत जास्तीचे प्रवास भाडे देत प्रवास करावा लागत होता. आत्ता रेल्वे सुरु झाल्याने वेळ आणि पैसा वाचणार अशीही प्रतिक्रिया प्रवासी वर्गाकडून व्यक्त करण्यात आली. ७ वाजेर्पयत तिकीट खिडकीवर तिकीट देणो बंधनकारक होते. मात्र ७ नंतरही प्रवाशांना तिकीट दिले जात होते. त्याविषयी तिकीट खिडकीवर विचारणा केली असता प्रवासांची गैरसोय होऊ नये यासाठी तिकीट दिले जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र स्थानकातील एव्हीएम मशीनद्वारे तिकीट देण्याची सेवा बंद करण्यात आली होती.

कल्याण रेल्वे पोलिसांची हद्द ८४ किलोमीटर र्पयतची आहे. या  हद्दीत अंतर्गत येणा:या प्रत्येक रेल्वे स्थानकात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. कल्याण ते बदलापूर, कल्याण ते कसारा दरम्यान पोलिस बंदोबस्त आहे. प्रवाशांनी नियमांचे पालन करावे यावर पोलिस नजर ठेवून आहेत. त्यासाठी १९० पोलिस व १५ पोलिस अधिकारी कार्यरत आहेत. प्रवाशांनी नियमांचे पालन करुन प्रवास करावा असे आवाह पोलिस निरिक्षक वाल्मीक शार्दुल यांनी केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वे