शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

शट डाऊन घेतल्याने पाणी नाही आणि आता कमी दाबाने पाणीपुरवठा

By अनिकेत घमंडी | Updated: February 24, 2024 10:55 IST

एमआयडीसीमध्ये जलवाहिनीतून मधून  गळती सुरूच

डोंबिवली: एमआयडीसी आणि 27 गाव परिसरात असलेल्या एमआयडीसीच्या पाइपलाइन फुटणे किंवा त्यातील व्हॉल्व मधील गळती ही नेहमीचीच झाली आहे. आज शनिवारी पहाटे पासून निवासी भागातील डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय जवळ सर्व्हिस रोडवर पाइपलाइन वरील व्हॉल्व मधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती चालू होती.याबद्दल एमआयडीसी अधिकाऱ्यांना कळविले असता एमआयडीसी कर्मचाऱ्यांनी सकाळी नऊ वाजता दुरुस्ती करून पाणी गळती थांबवली. ही गळती अंदाजे चार पाच तास चालू होती. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याने परिसरातील रहिवाश्यांनी नाराजी व्यक्त केली.

शुक्रवारी पूर्ण दिवस पाइपलाइन दुरुस्ती इत्यादी कारणांसाठी शट डाऊन एमआयडीसी कडून घेण्यात आला होता. तरीही योग्य देखभाल दुरुस्ती अभावी अशा पाण्याच्या गळती होत आहेत. साधारण महिन्याभरात एकदा तरी मोठी पाइपलाइन फुटते आणि व्हॉल्व वरील अशा गळती आठवड्याभरात एकदा तरी होत असते. हे असे होण्याचे कारण म्हणजे अनधिकृत पाणी जोडण्या, पाइपलाइनला भोक पाडून चोरीने पाणी घेणे आणि समाजकंटकाकडून व्हॉल्ववर छेडछाड  करणे हे असे आहे.

सद्या महाराष्ट्रातील सर्व धरणात पाण्याच्या साठा कमी झाल्याचे दिसून येत आहे. एप्रिल/मे महिन्यात पाण्याची कमतरता भासणार आहे. काही जिल्ह्यात पाण्याअभावी दुष्काळ पडणार आहे. एमआयडीसीच्या बारवी धरणात पण पाणी हे मागील वर्षापेक्षा कमी आहे. त्यामुळे एमआयडीसी आणि केडीएमसी यांनी पाणी गळती कडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. या सर्व बाबी प्रशासनाला माहिती असूनही याकडे प्रशासन जाणून बुजून लक्ष देत नाही असे दिसते आहे. पाणी गळती वर कडक कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी केली आहे.