शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कल्याण तळोजा मेट्रो रेल्वे मार्गाला गती द्या; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By मुरलीधर भवार | Updated: August 18, 2022 13:30 IST

कल्याण-कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याची आग्रही मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मुरलीधर भवार

कल्याण-कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याची आग्रही मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. कल्याण तळोजा हा मेट्रो रेल्वे मार्ग ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो रेल्वे मार्गाचा विस्तारीत मार्ग आहे. त्यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण हे तळोजाला थेट जोडले जाईल. त्याचा फायदा शहरी भागासह ग्रामीण भागालाही होईल याकडे खासदार शिंदे यांनी लक्ष वेधले आहे.

कल्याण-डोंबिवली-तळोजा या मार्गाला मंजूरी देण्यात आलेली आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून विविध मेट्रो मार्गाची उभारणी केली जात आहे. प्रवास सुखकर आणि जलद व्हावा यासाठी हे मार्ग तयार केले जात आहेत. सध्या तळोजा ते नवी मुंबई मेट्रो रेल्वे मार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे कल्याण तळोजा मेट्रो रेल्वेच्या मार्गाला महत्व आहे. हा मार्ग जवळपा २१ किलोमीटर अंतराचा आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीपासून हा मार्ग सुरु होऊन पुढे तो डोंबिवली, मानपाडा कल्याण ग्रामीणमधील विविध गावे जोडणारा ठरणार आहे. या मार्गावरील तळोजा हे अंतिम स्थानक राहणार आहे. या प्रकल्पाकरीता यापूर्वीच सल्लागार समितीची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पाला गती देण्यासाठी सल्लागार समितीला तातडीने योग्य ते निर्देश द्यावेत. कामाला सुरुवात करण्यात यावी. या आशयाचे लेखी निवेदन मुख्यमंत्री शिंदे यांना खासदार शिंदे यांनी दिले आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण हा मेट्रो मार्ग पुढे कल्याण-डोंबिवली-तळोजा असा विस्तारीत होणार आहे. तळोजो ते नवी मुंबई हा मार्ग आहे. त्यामुळे मेट्रोने ठाण्याहून निघालेला प्रवासी थेट नवी मुंबईला जाऊ शकतो. तसेच नवी मुंबईहून निघालेला प्रवासी थेट ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी गाठू शकतो. भिवंडी-कल्याण हे रेल्वेने जोडले गेले नसल्याने आत्ता भिवंडी शहर थेट ठाणे आणि कल्याणसह तळोजा-नवी मुंबईशी जोडले जाणार आहे. 

टॅग्स :Metroमेट्रोkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाShrikant Shindeश्रीकांत शिंदेEknath Shindeएकनाथ शिंदे