शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

हिंदुत्वानंतर पाणी प्रश्नावरही मनसे-भाजपची झाली ‘युती’, टंचाईच्या विरोधात केडीएमसीवर काढला तहान मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 12:53 IST

हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे भाजप एकत्रित आल्याने आता नागरिकांच्या प्रश्नावर मनसे भाजप एकत्रित आली. त्यात गैर काय आहे, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

कल्याण : कल्याण ग्रामीण पाणीटंचाईच्या विरोधात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयावर सोमवारी मनसे आणि भाजपने तहान मोर्चा काढला. यावेळी आयुक्त विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाली होत्या. काही महिलांनी डोक्यावर हंडा कळशी घेतली होती. सर्वोदय मॉलपासून काढलेल्या मोर्चात मनसेचे आमदार राजू पाटील आणि भाजप आमदार रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजप माजी नगरसेविका रविना माळी, संदीप माळी, मनसेच्या महिला आघाडी प्रमुख मंदा पाटील आदी असंख्य मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते. मोर्चेकरी यावेळी ‘ केडी यमसी ’, ‘ आयुक्त माणूस चांगला, मात्र ठाण्याच्या वेशीला टांगला ’, ‘ २५ वर्षे खुर्च्या उबविल्या, मात्र नागरिकांची तहान भागविली नाही,’ असे विविध फलक घेऊन सहभागी झाले होते.आमदार पाटील, चव्हाण यांच्यासह शिष्टमंडळ आयुक्तांच्या दालनात पोहचले. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांना पाहून दोन्ही आमदार संतापले. आयुक्तांना मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती असताना ते हजर का नाहीत ? लोकप्रतिनिधींना आयुक्त आणि प्रशासन फालतू समजतात का? असा संतापजनक सवाल केला. आयुक्त केवळ ठाण्यातील नेत्यांना भेटतात, असा आरोप आमदार पाटील यांनी केला. लोकप्रतिनिधींना हलक्यात घेणार असाल, तर महापालिकेस कुलूप लावणार आणि कोण आतमध्ये शिरतो हे पाहणार असा सज्जड इशारा आमदार पाटील यांनी प्रशासनाला दिला. तर, आमदार चव्हाण यांनी पोलिसांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत पोलिसांनी मोर्चाची कल्पना प्रशासनाला दिली नाही का? असा संतप्त सवाल केला. एक तासाच्या चर्चेनंतर एमआयडीसीचे अधिकारी प्रकट झाले. महापालिकेचे अधिकारी पाण्याचे टँकर विकतात असा आरोप आमदारांनी केला. त्यावरून अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली.या आहेत मागण्याटँकरवर जीपीएस यंत्रणा बसवा, नव्याने झालेल्या बड्या गृहसंकुलाचा पाणीपुरवठा बंद करा, गोरगरीब जनतेला पाणी द्या, पाणी वितरणाची व्यवस्था तातडीने सुधारा, या विविध मागण्यांची अंमलबजावणी तातडीने करून या बैठकीचे इतिवृत्त द्यावे, अशी  मागणी दोन्ही आमदारांनी यावेळी बैठकीत केली.

त्यात गैर काय?हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे भाजप एकत्रित आल्याने आता नागरिकांच्या प्रश्नावर मनसे भाजप एकत्रित आली. त्यात गैर काय आहे, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :MNSमनसेWaterपाणीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका