शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुत्वानंतर पाणी प्रश्नावरही मनसे-भाजपची झाली ‘युती’, टंचाईच्या विरोधात केडीएमसीवर काढला तहान मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 12:53 IST

हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे भाजप एकत्रित आल्याने आता नागरिकांच्या प्रश्नावर मनसे भाजप एकत्रित आली. त्यात गैर काय आहे, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

कल्याण : कल्याण ग्रामीण पाणीटंचाईच्या विरोधात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयावर सोमवारी मनसे आणि भाजपने तहान मोर्चा काढला. यावेळी आयुक्त विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाली होत्या. काही महिलांनी डोक्यावर हंडा कळशी घेतली होती. सर्वोदय मॉलपासून काढलेल्या मोर्चात मनसेचे आमदार राजू पाटील आणि भाजप आमदार रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजप माजी नगरसेविका रविना माळी, संदीप माळी, मनसेच्या महिला आघाडी प्रमुख मंदा पाटील आदी असंख्य मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते. मोर्चेकरी यावेळी ‘ केडी यमसी ’, ‘ आयुक्त माणूस चांगला, मात्र ठाण्याच्या वेशीला टांगला ’, ‘ २५ वर्षे खुर्च्या उबविल्या, मात्र नागरिकांची तहान भागविली नाही,’ असे विविध फलक घेऊन सहभागी झाले होते.आमदार पाटील, चव्हाण यांच्यासह शिष्टमंडळ आयुक्तांच्या दालनात पोहचले. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांना पाहून दोन्ही आमदार संतापले. आयुक्तांना मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती असताना ते हजर का नाहीत ? लोकप्रतिनिधींना आयुक्त आणि प्रशासन फालतू समजतात का? असा संतापजनक सवाल केला. आयुक्त केवळ ठाण्यातील नेत्यांना भेटतात, असा आरोप आमदार पाटील यांनी केला. लोकप्रतिनिधींना हलक्यात घेणार असाल, तर महापालिकेस कुलूप लावणार आणि कोण आतमध्ये शिरतो हे पाहणार असा सज्जड इशारा आमदार पाटील यांनी प्रशासनाला दिला. तर, आमदार चव्हाण यांनी पोलिसांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत पोलिसांनी मोर्चाची कल्पना प्रशासनाला दिली नाही का? असा संतप्त सवाल केला. एक तासाच्या चर्चेनंतर एमआयडीसीचे अधिकारी प्रकट झाले. महापालिकेचे अधिकारी पाण्याचे टँकर विकतात असा आरोप आमदारांनी केला. त्यावरून अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली.या आहेत मागण्याटँकरवर जीपीएस यंत्रणा बसवा, नव्याने झालेल्या बड्या गृहसंकुलाचा पाणीपुरवठा बंद करा, गोरगरीब जनतेला पाणी द्या, पाणी वितरणाची व्यवस्था तातडीने सुधारा, या विविध मागण्यांची अंमलबजावणी तातडीने करून या बैठकीचे इतिवृत्त द्यावे, अशी  मागणी दोन्ही आमदारांनी यावेळी बैठकीत केली.

त्यात गैर काय?हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे भाजप एकत्रित आल्याने आता नागरिकांच्या प्रश्नावर मनसे भाजप एकत्रित आली. त्यात गैर काय आहे, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :MNSमनसेWaterपाणीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका