शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

हिंदुत्वानंतर पाणी प्रश्नावरही मनसे-भाजपची झाली ‘युती’, टंचाईच्या विरोधात केडीएमसीवर काढला तहान मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 12:53 IST

हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे भाजप एकत्रित आल्याने आता नागरिकांच्या प्रश्नावर मनसे भाजप एकत्रित आली. त्यात गैर काय आहे, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

कल्याण : कल्याण ग्रामीण पाणीटंचाईच्या विरोधात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयावर सोमवारी मनसे आणि भाजपने तहान मोर्चा काढला. यावेळी आयुक्त विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाली होत्या. काही महिलांनी डोक्यावर हंडा कळशी घेतली होती. सर्वोदय मॉलपासून काढलेल्या मोर्चात मनसेचे आमदार राजू पाटील आणि भाजप आमदार रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजप माजी नगरसेविका रविना माळी, संदीप माळी, मनसेच्या महिला आघाडी प्रमुख मंदा पाटील आदी असंख्य मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते. मोर्चेकरी यावेळी ‘ केडी यमसी ’, ‘ आयुक्त माणूस चांगला, मात्र ठाण्याच्या वेशीला टांगला ’, ‘ २५ वर्षे खुर्च्या उबविल्या, मात्र नागरिकांची तहान भागविली नाही,’ असे विविध फलक घेऊन सहभागी झाले होते.आमदार पाटील, चव्हाण यांच्यासह शिष्टमंडळ आयुक्तांच्या दालनात पोहचले. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांना पाहून दोन्ही आमदार संतापले. आयुक्तांना मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती असताना ते हजर का नाहीत ? लोकप्रतिनिधींना आयुक्त आणि प्रशासन फालतू समजतात का? असा संतापजनक सवाल केला. आयुक्त केवळ ठाण्यातील नेत्यांना भेटतात, असा आरोप आमदार पाटील यांनी केला. लोकप्रतिनिधींना हलक्यात घेणार असाल, तर महापालिकेस कुलूप लावणार आणि कोण आतमध्ये शिरतो हे पाहणार असा सज्जड इशारा आमदार पाटील यांनी प्रशासनाला दिला. तर, आमदार चव्हाण यांनी पोलिसांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत पोलिसांनी मोर्चाची कल्पना प्रशासनाला दिली नाही का? असा संतप्त सवाल केला. एक तासाच्या चर्चेनंतर एमआयडीसीचे अधिकारी प्रकट झाले. महापालिकेचे अधिकारी पाण्याचे टँकर विकतात असा आरोप आमदारांनी केला. त्यावरून अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली.या आहेत मागण्याटँकरवर जीपीएस यंत्रणा बसवा, नव्याने झालेल्या बड्या गृहसंकुलाचा पाणीपुरवठा बंद करा, गोरगरीब जनतेला पाणी द्या, पाणी वितरणाची व्यवस्था तातडीने सुधारा, या विविध मागण्यांची अंमलबजावणी तातडीने करून या बैठकीचे इतिवृत्त द्यावे, अशी  मागणी दोन्ही आमदारांनी यावेळी बैठकीत केली.

त्यात गैर काय?हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे भाजप एकत्रित आल्याने आता नागरिकांच्या प्रश्नावर मनसे भाजप एकत्रित आली. त्यात गैर काय आहे, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले. 

टॅग्स :MNSमनसेWaterपाणीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका