शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

खड्डे बुजविले नाही तर सरकार खड्ड्यात गेल्या शिवाय राहणार नाही; रामदास आठवले यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 17:07 IST

"या दोन वर्षांत सरकारने रस्त्यावरी खड्डे बुजविण्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यांचे लक्ष्य फक्त सत्ता टिकविण्याकडे आहे. त्यांचे लक्ष फक्त एकमेकावर आरोप करण्याकडे आहे."

कल्याण - राज्य सरकारला सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली. या दोन वर्षांत सरकारने रस्त्यावरी खड्डे बुजविण्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यांचे लक्ष्य फक्त सत्ता टिकविण्याकडे आहे. त्यांचे लक्ष फक्त एकमेकावर आरोप करण्याकडे आहे. खड्डे बुजविण्याचे काम केले जात नाही. खड्डे जर बुजविले नाही, तर हे सरकार खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांनी खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी लक्ष द्यावे, असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले म्हटले आहे. (Minister Ramdas Athawale Target Uddhav thackeray government over Potholes in kalyan) केंद्रीय मंत्री आठवले यांनी आज डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन डोंबिवली बलात्कार प्रकरणासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर ते पक्षकारांशी बोलत होते.

फिल्म इंडस्ट्रीला ड्रग्जची लागण -जहाजावर पार्टी सुरू असल्याची माहिती मिळताच एनसीबीने छापा टाकाला. कारवाई केली. या कारवाईत शहारुख खानचा मुलगा असो किंवा कुणीही असो. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. फिल्म इंडस्ट्रीजला ड्रग्जची लागण झालेली आहे. महाराष्ट्र आणि मुंबईही ड्रग्ज मुक्त झाली पाहिजे, अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

राज्यावर अनेक प्रसंग राज्य सरकारकडून केवळ आश्वासन -मराठवाड्याचे पावसामुळे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील पिके पावसामुळे उद्धवस्त झाली आहेत. शेतकऱ्यांना मोठी मदत देण्यासाठी राज्य सरकारने लक्ष दिले पाहिजे. कोकणातही अशा प्रकारचे संकट आले होते. नाशिकमध्येही द्राक्ष बागांचे नुकसान झालेले आहे. राज्यावर अनेक प्रसंग आले असताना राज्य सरकारकडून केवळ आश्वासनं दिले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याचा दौरा करुन भरीव मदत दिली पाहिजे याकडे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी  सरकारचे लक्ष वेधले आहे.  

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेPotholeखड्डे