शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

केडीएमसी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ३८२ जणांचा मृत्यू, तिसऱ्या लाटेची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 08:47 IST

कोरोनाची पहिली लाट मार्च २०२० मध्ये सुरू झाली. त्यावेळी मनपा हद्दीत दिवसाला ३०० ते ४५० रुग्ण आढळत होते.

कल्याण : केडीएमसी हद्दीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अवघ्या दोन महिने १० दिवसांत ३८२ जणांचा मृत्यू झाला आहे. ही लाट १५ मे नंतर ओसरणार असली तरी पुन्हा जुलै, ऑगस्टमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत.कोरोनाची पहिली लाट मार्च २०२० मध्ये सुरू झाली. त्यावेळी मनपा हद्दीत दिवसाला ३०० ते ४५० रुग्ण आढळत होते. मृत्यूचे प्रमाण आटोक्यात होते. जुलै २०२० मध्ये एका दिवसात ६६४ रुग्ण आढळले होते. दिवाळीनंतर रुग्णसंख्या घटू लागली होती. जानेवारीत पहिली लाट ओसरल्याने दिलासा मिळाला होता. मात्र, १७ फेब्रुवारी २०२१ पासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज एक ते दोन हजारांच्या संख्येने रुग्ण आढळत होते. त्यामुळे रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची उपलब्धता, पुरवठ्याच्या ऑडिटसाठी पथके नेमली गेली. मात्र, मागणी आणि पुरवठा यात तफावत होती. त्यामुळे अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले.

प्रशासनाची तयारी सुरू - तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची बाधा होण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे विभा कंपनीच्या जागेत उभारल्या जाणाऱ्या कोविड रुग्णालयात ५० टक्के बेड मुलांसाठी आरक्षित ठेवले जाणार आहेत, तसेच मुलांसाठी आणखी १०० बेडचे कोविड रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित आहे.- रुक्मिणीबाई व शास्त्रीनगर रुग्णालयात प्रत्येकी एक याप्रमाणे दोन बालरोगतज्ज्ञ आहेत; परंतु प्रत्येक रुग्णालयास प्रत्येकी दोन असे चार बालरोगतज्ज्ञ भरती केले जाणार आहेत. दोन्ही रुग्णालयांत १० बेड मुलांसाठी असतील. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस