शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

समाजवादी पक्षातील भांडणाचा काँग्रेसला फायदा

By नितीन पंडित | Updated: January 19, 2026 09:00 IST

नितीन पंडित महापालिका निवडणुकीत काँग्रेसने ३० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा आपले अस्तित्व सिद्ध केले. ९० ...

नितीन पंडित

महापालिका निवडणुकीत काँग्रेसने ३० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा आपले अस्तित्व सिद्ध केले. ९० नगरसेवक जागा असलेल्या या महापालिकेत काँग्रेस ३०, भाजप २२, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, शिंदेसेना १२, समाजवादी ६, कोणार्क विकास आघाडी ४, भिवंडी विकास आघाडी ३, तर अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) करू शकतो. मात्र, याबाबत दोघांनी अधिकृत भूमिका घेतलेली नाही. कारण, निवडणुकीत काँग्रेस आणि  राष्ट्रवादी (शरद पवार) स्वतंत्र लढले होते.

महापालिकेत काँग्रेसला जे यश मिळाले त्यामागे  भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आ. रईस शेख यांचा हात असल्याचे उघड आहे. समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी आणि आ.  शेख यांच्यातील वाद निवडणुकीच्या तोंडावरच उफाळला होता. आझमींनी शेख यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारल्याचे म्हटले जाते. त्यामुळे शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली. सुरुवातीला शेख यांनी काँग्रेस उमेदवारांचा छुपा प्रचार केला. मात्र, मतदानाच्या काही दिवस आधी त्यांनी जाहीर प्रचारही केला.  

भिवंडी पूर्व या आपल्या मतदारसंघात आ. शेख यांनी केलेल्या विकास कामांवरच त्यांनी मते मागितली. तर, समाजवादीच्या उमेदवारांनी शेख यांचा जाहीर अपमान केल्याने मतदार नाराज होते. त्यामुळे समाजवादी पक्षाचा आमदार असलेल्या पूर्व मतदारसंघात त्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. समाजवादीचे निवडून आलेले ६ नगरसेवक भिवंडी पश्चिम मतदारसंघातील असल्याने पूर्वेत आ. शेख यांचा प्रभाव पुन्हा सिद्ध झाला आहे. समाजवादीच्या अंतर्गत वादाचा फायदा काँग्रेसला झाला. त्यामुळे बंडखोरी आणि लोकसभा व विधानसभेत झालेल्या वाताहतीनंतरही मनपा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले आहे.

मुस्लीम बहुल मतदारांचे शहर अशी भिवंडीची ओळख आहे. त्यामुळे येथे काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचा विजय झाला. तर, विधानसभा निवडणुकीतही पूर्वेत शिवसेना, तर पश्चिममध्ये भाजपला विजय मिळाला. तेव्हापासून शहरात काँग्रेसला उतरती कळा लागली होती. २०१७च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा उभारी घेत ९० पैकी ४७ जागा जिंकल्या आणि एकहाती सत्ता स्थापन केली होती. तरीही दगाफटका नको, म्हणून शिवसेनेशी युती करत महापौरपद आपल्याकडे, तर उपमहापौरपद शिवसेनेला दिले. त्यांनतर अडीच वर्षांतच काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी कोणार्क विकास आघाडीत प्रवेश केला अवघे ४ नगरसेवक असलेल्या कोणार्ककडे महापौरपद, तर बंडखोरांना उपमहापौरपद मिळाले होते. काँग्रेसने १८ नगरसेवकांची तक्रार केल्यानंतर नगरविकास विभागाने १८ नगरसेवकांना बडतर्फ केले, मात्र तोपर्यंत मनपाचा कार्यकाळ संपला होता.  तर, ४७ पैकी १८ नगरसेवक फुटल्याने काँग्रेसकडे २९ नगरसेवक होते. या निवडणुकीत काँग्रेसने ३० जागा जिंकत अस्तित्व पुन्हा सिद्ध केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Infighting in Samajwadi Party Benefits Congress in Bhiwandi Election

Web Summary : Congress gained in Bhiwandi due to Samajwadi Party's internal conflict. Rais Shaikh's support helped Congress win 30 seats, emerging as the largest party. This victory revives Congress after previous electoral setbacks in the region.
टॅग्स :Bhiwandi Nizampur Municipal Corporation Electionभिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६congressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टी