शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

'दि. बा. पाटील यांच्या नावाला नकार दिल्यास...'; भूमीपूत्रांचा राज्य सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 3:37 PM

Kalyan : मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वादाच्या वेळी जी परिस्थिती उद्भवली होती. तीच परिस्थिती उद्भवू शकते असा इशारा भूमीपूत्रांच्या वतीने देण्यात आला आहे.

कल्याणनवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत असताना या मागणीचा विचार राज्य सरकारकडून केला जात नाही. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वादाच्या वेळी जी परिस्थिती उद्भवली होती. तीच परिस्थिती उद्भवू शकते असा इशारा भूमीपूत्रांच्या वतीने देण्यात आला आहे.

ठाणे, पालघर, रायगड या परिसरात १० जून रोजी भू्मीपत्रांनी मानवी साखळी आंदोलन केले. त्यानंतर आत्ता सिडकोला घेराव घालण्यासाठी 24 जून रोजी आंदोलन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी भूमीपूत्रांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस भाजप नेते जगन्नाथ पाटील, खासदार कपिल पाटील, मनसे आमदार राजू पाटील, शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर, संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे, कॉग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी संतोष केणो , रिपाईचे अकुंश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विमानतळास देण्याच्या मुद्यावर ठाम आहे. आत्तार्पयत झालेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नेत्याचे नाव दिले नाही. उद्धव ठाकरे हे पहिले मुख्यमंत्री आहेत. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर वादाचा फटका तत्कालीन सरकारला बसला होता. दि. बांचे नाव देण्याचा लढा हा मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढय़ाचे स्वरुप धारण करु शकतो. आत्ता संयमाने घेतले जात असले तरी पुढे संयम ठेवला जाईल अशी आपेक्षा सरकारने आमच्याकडून ठेवू नये असा सूर या बैठकीतून व्यक्त केला गेला.

खासदार पाटील यांनी सांगितले की, आपला समाज एखादा विषय पकडतो आणि सोडन देतो. या आंदोलनात जो सहभागी होईल तोच खरा भूमीपूत्र आहे. ही भूमिका प्रत्येक भूमीपूत्रपर्यंत पोचविल्यास आंदोलनास व्यापक स्वरुप प्राप्त होऊ शकते. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे. त्यावेळी आमचा त्याला विरोध नव्हता. पण दि. बांच्या नावाला त्यांचा विरोध असण्याचे कारण नाही. सिडकोने पारित केलेल्या ठरावानंतर सिडको आली कूठून असा काही नेते मंडळी सवाल उपस्थित करीत असली तीर सिडकोला भूमीपूत्रांनी जागा दिली आहे म्हणून सिडको आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची भूमिका मांडलेली नाही.त्यांची भूमिका स्पष्ट होताच त्याचा प्रत्येक कार्यकर्ता या आंदोलनात सहभागी होईल. त्यामुळे आंदोलन व्यापक होईल.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईkalyanकल्याण