शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने 400 पेक्षा जास्त घरात शिरले पाणी; रहिवाशांची रात्र दुसऱ्याच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 17:07 IST

यंदाच्या पावसात गेल्या महिन्याभरात शहाड येथील आंबिकानगरचा नाला वारंवार तुंबल्याने सगळे पाणी रस्त्यावर येऊन वाहतूक कोंडी होत होती.

ठाणे/कल्याण - कल्याण पूर्व भागातील आडीवली ढोकळी परिसरास मूसळधार पावसाचा फटका बसला आहे. या भागातील ऑगस्टीनगरातील जवळपास 400 पेक्षा जास्त नागरीकांच्या घरांमध्ये काल रात्री पावसाचे पाणी शिरल्याने नागरीकांना रात्र दुसऱ्यांच्या घरी अथवा घरातील खाटेवर काढावी लागली. पावसाचे पाणी घरात शिरल्याने त्यांच्या घरातील जीवनाश्यक आणि गृहोपयोगी वस्तुंचे नुकसान झाले आहे. 

आडीवली ढोकळी हा परिसर 27 गावांमध्ये समाविष्ट होता. 27 गावांपैकी 18 गावे महापालिकेतून वगळण्यात आल्याने आडीवली ढोकळी परिसर महापालिकेतून वगळण्यात आला. या परिसराचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी या भागासाठी निधीची मागणी केली होती. आडीवली ढोकळी परिसरात ज्या नाल्यामुळे पाणी तुंबते, ते नागरिकांच्या घरात शिरते. या परिसरातील एक मोठा नाला अरुंद आहे. त्याचे रुंदीकरण करण्यात यावे यासाठी महापालिकेकडून निधीची मागणी पाटील यांनी केली होती. महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदी संदीप गायकर सभापती असताना पाटील यांच्या मागणीनुसार महापालिकेने 1 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, हा निधी वापरला गेला नाही. त्यामुळे नाल्यांचे रुंदीकरण रखडले आहे. या भागात एका बांधकाम व्यावसायिकाने संरक्षक भिंतही बांधली आहे. त्यामुळे नैसर्गिक प्रवाह खुंटला आहे. ही संरक्षक भिंत नागरीकांच्या पुढाकाराने तोडण्यात आली होती. मात्र, पावसाला संपल्यावर पुन्हा त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली. अतिवृष्टी आणि जोरदार मूसळधार पाऊस झाला की नाल्यामुळे या भागात चाळीतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरते. याप्रकरणी गेल्या पाच वर्षापासून पाटील यांचा पाठपुरावा सुरु आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना दरवर्षी पावसाच्या पाण्याचा फटका सहन करावा लागतो. 

दरम्यान, यंदाच्या पावसात गेल्या महिन्याभरात शहाड येथील आंबिकानगरचा नाला वारंवार तुंबल्याने सगळे पाणी रस्त्यावर येऊन वाहतूक कोंडी होत होती. हा नाला अंडरपास असल्याने त्यात जवळपास 100 फूटापर्यंत कचरा तुंबला होता. हा नाला महापालिकेने वरुन पंक्चर केल्याने आत्ता कुठे त्याठिकाणी थोडाफार दिलासा मिळाला आहे. त्याच धर्तीवर आडीवली ढोकळी परिसरातील नाल्यामुळे तुंबणाऱ्या पाण्याच्या समस्येकडे महापालिकेने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.  

टॅग्स :Rainपाऊसkalyanकल्याणWaterपाणी