शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

मुसळधार पावसाने 400 पेक्षा जास्त घरात शिरले पाणी; रहिवाशांची रात्र दुसऱ्याच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 17:07 IST

यंदाच्या पावसात गेल्या महिन्याभरात शहाड येथील आंबिकानगरचा नाला वारंवार तुंबल्याने सगळे पाणी रस्त्यावर येऊन वाहतूक कोंडी होत होती.

ठाणे/कल्याण - कल्याण पूर्व भागातील आडीवली ढोकळी परिसरास मूसळधार पावसाचा फटका बसला आहे. या भागातील ऑगस्टीनगरातील जवळपास 400 पेक्षा जास्त नागरीकांच्या घरांमध्ये काल रात्री पावसाचे पाणी शिरल्याने नागरीकांना रात्र दुसऱ्यांच्या घरी अथवा घरातील खाटेवर काढावी लागली. पावसाचे पाणी घरात शिरल्याने त्यांच्या घरातील जीवनाश्यक आणि गृहोपयोगी वस्तुंचे नुकसान झाले आहे. 

आडीवली ढोकळी हा परिसर 27 गावांमध्ये समाविष्ट होता. 27 गावांपैकी 18 गावे महापालिकेतून वगळण्यात आल्याने आडीवली ढोकळी परिसर महापालिकेतून वगळण्यात आला. या परिसराचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी या भागासाठी निधीची मागणी केली होती. आडीवली ढोकळी परिसरात ज्या नाल्यामुळे पाणी तुंबते, ते नागरिकांच्या घरात शिरते. या परिसरातील एक मोठा नाला अरुंद आहे. त्याचे रुंदीकरण करण्यात यावे यासाठी महापालिकेकडून निधीची मागणी पाटील यांनी केली होती. महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदी संदीप गायकर सभापती असताना पाटील यांच्या मागणीनुसार महापालिकेने 1 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, हा निधी वापरला गेला नाही. त्यामुळे नाल्यांचे रुंदीकरण रखडले आहे. या भागात एका बांधकाम व्यावसायिकाने संरक्षक भिंतही बांधली आहे. त्यामुळे नैसर्गिक प्रवाह खुंटला आहे. ही संरक्षक भिंत नागरीकांच्या पुढाकाराने तोडण्यात आली होती. मात्र, पावसाला संपल्यावर पुन्हा त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली. अतिवृष्टी आणि जोरदार मूसळधार पाऊस झाला की नाल्यामुळे या भागात चाळीतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरते. याप्रकरणी गेल्या पाच वर्षापासून पाटील यांचा पाठपुरावा सुरु आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना दरवर्षी पावसाच्या पाण्याचा फटका सहन करावा लागतो. 

दरम्यान, यंदाच्या पावसात गेल्या महिन्याभरात शहाड येथील आंबिकानगरचा नाला वारंवार तुंबल्याने सगळे पाणी रस्त्यावर येऊन वाहतूक कोंडी होत होती. हा नाला अंडरपास असल्याने त्यात जवळपास 100 फूटापर्यंत कचरा तुंबला होता. हा नाला महापालिकेने वरुन पंक्चर केल्याने आत्ता कुठे त्याठिकाणी थोडाफार दिलासा मिळाला आहे. त्याच धर्तीवर आडीवली ढोकळी परिसरातील नाल्यामुळे तुंबणाऱ्या पाण्याच्या समस्येकडे महापालिकेने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.  

टॅग्स :Rainपाऊसkalyanकल्याणWaterपाणी