शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

मुसळधार पावसाने 400 पेक्षा जास्त घरात शिरले पाणी; रहिवाशांची रात्र दुसऱ्याच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 17:07 IST

यंदाच्या पावसात गेल्या महिन्याभरात शहाड येथील आंबिकानगरचा नाला वारंवार तुंबल्याने सगळे पाणी रस्त्यावर येऊन वाहतूक कोंडी होत होती.

ठाणे/कल्याण - कल्याण पूर्व भागातील आडीवली ढोकळी परिसरास मूसळधार पावसाचा फटका बसला आहे. या भागातील ऑगस्टीनगरातील जवळपास 400 पेक्षा जास्त नागरीकांच्या घरांमध्ये काल रात्री पावसाचे पाणी शिरल्याने नागरीकांना रात्र दुसऱ्यांच्या घरी अथवा घरातील खाटेवर काढावी लागली. पावसाचे पाणी घरात शिरल्याने त्यांच्या घरातील जीवनाश्यक आणि गृहोपयोगी वस्तुंचे नुकसान झाले आहे. 

आडीवली ढोकळी हा परिसर 27 गावांमध्ये समाविष्ट होता. 27 गावांपैकी 18 गावे महापालिकेतून वगळण्यात आल्याने आडीवली ढोकळी परिसर महापालिकेतून वगळण्यात आला. या परिसराचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी या भागासाठी निधीची मागणी केली होती. आडीवली ढोकळी परिसरात ज्या नाल्यामुळे पाणी तुंबते, ते नागरिकांच्या घरात शिरते. या परिसरातील एक मोठा नाला अरुंद आहे. त्याचे रुंदीकरण करण्यात यावे यासाठी महापालिकेकडून निधीची मागणी पाटील यांनी केली होती. महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदी संदीप गायकर सभापती असताना पाटील यांच्या मागणीनुसार महापालिकेने 1 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, हा निधी वापरला गेला नाही. त्यामुळे नाल्यांचे रुंदीकरण रखडले आहे. या भागात एका बांधकाम व्यावसायिकाने संरक्षक भिंतही बांधली आहे. त्यामुळे नैसर्गिक प्रवाह खुंटला आहे. ही संरक्षक भिंत नागरीकांच्या पुढाकाराने तोडण्यात आली होती. मात्र, पावसाला संपल्यावर पुन्हा त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली. अतिवृष्टी आणि जोरदार मूसळधार पाऊस झाला की नाल्यामुळे या भागात चाळीतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरते. याप्रकरणी गेल्या पाच वर्षापासून पाटील यांचा पाठपुरावा सुरु आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना दरवर्षी पावसाच्या पाण्याचा फटका सहन करावा लागतो. 

दरम्यान, यंदाच्या पावसात गेल्या महिन्याभरात शहाड येथील आंबिकानगरचा नाला वारंवार तुंबल्याने सगळे पाणी रस्त्यावर येऊन वाहतूक कोंडी होत होती. हा नाला अंडरपास असल्याने त्यात जवळपास 100 फूटापर्यंत कचरा तुंबला होता. हा नाला महापालिकेने वरुन पंक्चर केल्याने आत्ता कुठे त्याठिकाणी थोडाफार दिलासा मिळाला आहे. त्याच धर्तीवर आडीवली ढोकळी परिसरातील नाल्यामुळे तुंबणाऱ्या पाण्याच्या समस्येकडे महापालिकेने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.  

टॅग्स :Rainपाऊसkalyanकल्याणWaterपाणी