शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
3
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
4
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
5
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
6
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
7
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
8
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
9
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
10
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
11
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
12
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
13
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
14
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
15
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
16
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
17
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
18
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
19
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
20
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज

कल्याण डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी; आजपासून आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 18:31 IST

Aadharwadi dumping ground news: महापालिकेची स्थापना १९८३ साली झाली. तेव्हापासून महापालिका हद्दीतील कचरा हा आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर टाकला जात होता.

कल्याण-कल्याणमधील वादग्रस्त असलेले आधारवाडी डंपिंग गाऊंड आजपासून बंद करण्यात आले आहे. हे डंपिंग ग्राऊंड बंद करण्यात यावे अशी अनेक वर्षापासूनची नागरीकांची मागणी होती. नागरीकांची मागणी आज पूर्णत्वास आली आहे. डंपिंग ग्राऊंड बंद करण्यात प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Aadharwadi dumping ground closed from today.)

महापालिकेची स्थापना १९८३ साली झाली. तेव्हापासून महापालिका हद्दीतील कचरा हा आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर टाकला जात होता. दररोज ५७० मेट्रीक टन कचरा या डंपिंगवर टाकला जात होता. त्याचे वर्गिकरण केले जात नव्हते. त्यावर प्रक्रिया केली जात नव्हती. त्यामुळे हे डंपिंग ग्राऊंड आजाराचे आगार बनले होते. त्याचबरोबर या डंपिंगच्या दरुगधीचा नागरीकांना सातत्याने त्रस होता. याशिवाय या डंपिंगवरील कच:याला वारंवार आगी लागण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळेही नागरीकांच्या नाका तोंडात धूर जात होता.

आधारवाडी डंपिंग बंद करण्यासाठी न्यायालयात याचिका होती. हे प्रकरण राष्ट्रीय हरीत लवादाकडेही गेले होते. त्याठिकाणीही हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले होते. महापलिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मागच्या वर्षी पदभार स्विकारताच मे २०२० मध्ये आधारवाडी बंद करण्याचे आव्हान स्विकारले होते. मात्र कोरोनामुळे त्यांचा शब्द ते खरा करु शकले नाही. मे २०२० पासून महापालिकेने शून्य कचरा मोहिम राबविणो सुरु केले कचरा वर्गीकरण सुरु केले. त्यामुळे आज बरोबर एक वर्षानी २५ मे रोजी आधारवाडी बंद करण्यात प्रशासनाला यश आले आहे. आजपासून आधारवाडी डंपिंगवर कचरा टाकणो बंद करण्यात आलेले आहे.महापालिका २०० टन कच:यावर प्रक्रिया उंबर्डे घनकचरा प्रकल्पात करणार आहे. तर १०० मेट्रीक टन कच:यावर बारावे प्रकल्पात प्रक्रिया केली जाणार आहे. ५० टक्के ओल्या कच:यावल महापालिकेने उभारलेल्या आयरे, उंबर्डे, कचोरे, बारावे येथील पाच बायोगॅस प्रकल्पात प्रक्रिया केली जात आहे. तसेच महापालिकेतील काही बडय़ा गृह संकुलातील सोसायटय़ा ५० टन कच:यावर प्रक्रिया करीत आहेत अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यानी दिली आहे.

सध्या आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर असलेल्या कचरा हा बायो मायनिंग पद्धतीने नष्ट केला जाणार आहे. हा कचरा भिवंडी येथील एका गावाच्या दगडखाणीत नेऊन टाकला जाणार आहे. त्यावर बायो मायनिंगची प्रक्रिया केली जाणार आहे. हा प्रकल्प १३७ कोटी रुपये खर्चाचा असून त्याला सरकारने मान्यता दिली आहे. त्याच्या मंजूरी राज्य सरकारच्या तज्ञ समितीकडे अंतिम टप्प्यात आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdumpingकचरा