शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

कल्याणमध्ये पहिलीच ट्रान्सकॅथेटर आरोर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लान्टेशन शस्त्रक्रिया

By सचिन सागरे | Updated: May 17, 2023 15:58 IST

नाशिकच्या ज्येष्ठ नागरिकाला मिळाला नवा जन्म

कल्याण : दोन आठवड्यांपासून अत्यंत गंभीर तब्येत असलेल्या नीलम देशमुख (७८, रा. नाशिक) यांच्यावर येथील फोर्टिस हॉस्पिटल येथे पार पडलेल्या ट्रान्सकॅथेटर आओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लान्टेशन (तावी) शस्त्रक्रियेनंतर त्यांना एक नवा जन्म मिळाला आहे. फोर्टिस हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट-इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी डॉ. विवेक महाजन व त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया पार पाडली. या शस्त्रक्रियेला मिळालेले यश हे वैद्यकीय आघाडीवर कल्याणसाठी एक महत्त्वाचे यश आहे.

देशमुख यांना शस्त्रक्रियेआधी महिनाभरापासून धाप लागणे, अशक्तपणा, अंधारी येणे, थोड्याफार श्रमांनीही छातीत अस्वस्थ वाटणे आणि झोपेतून सतत जाग येणे अशी लक्षणे जाणवत होती. नाशिक येठ्ठील रुग्णालयात त्यांच्या अनेक चाचण्या करून घेण्यात आल्या; त्यांचा अँजिओग्राम नॉर्मल आला. पण टूडी एकोकार्डिओग्राफीच्या रिपोर्टमध्ये त्यांना तीव्र स्वरूपाचे आओर्टिंक स्टेनोसिस असल्याचे निदान झाले. या स्थितीमध्ये महारोहिणीच्या झडपेच्या झापा काही अडथळ्यामुळे नीट उघडत नाहीत. रक्तप्रवाहामध्ये आलेल्या या अडथळ्यामुळे हृदय थकले होते व कमकुवत झाले होते. यालाच हृदयातील डावे नीलय निकामी होणे असेही म्हणतात.  

शरीराभर अपुरे रक्ताभिसरण होत असल्याने रुग्णाला कमी रक्तदाबाची समस्या सतत जाणवत होती. याचा त्यांच्या किडन्यांवर विपरित परिणाम झाला होता.  त्यांची तब्येत वेगाने ढासळत होती. अशा परिस्थितीत त्यांना पुढील उपचारांसाठी फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. आओर्टिक व्हॉल्व्हमध्ये असलेल्या अडथळ्यामुळे आणि डावे नीलय निकामी झाल्याने फुफ्फुसामध्ये रक्त साठत होते व त्याला सूज आली होती, ज्याच्या परिणामी शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती आणि त्यांना प्रचंड धाप लागत होती. आओर्टिक स्टेनॉसिसची समस्या दूर करणे अत्यावश्यक असल्याने ओपन हार्ट सर्जरी आणि शरीराचा कमीत-कमी छेद घेऊन करण्यात येणारी तावी शस्त्रक्रिया असे दोन पर्याय डॉ. महाजन यांनी रुग्णाच्या कुटुंबियांसमोर ठेवले.

रुग्णाच्या स्थितीमधील गुंतागूंत लक्षात घेता ओपन सर्जरीच्या तुलनेत तावी प्रक्रियेमध्ये कमी जोखीम होती. यावेळी नवी झडप बसवली गेली नसती तर रुग्णाचा मृत्यू ओढावण्याची शक्यता होती.याबाबत डॉ. विवेक महाजन यांनी सांगितले की, रुग्णाला अनेक गुंतागूंतीच्या समस्या होत्या व आम्हाला शस्त्रक्रियेआधी व शस्त्रक्रियेदरम्यान अनेक आव्हाने सामोरी आली. त्यांना पूर्वी स्ट्रोक येऊन गेला होता, ज्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दीर्घकाळासाठी वास्तव्य करावे लागले होते. ज्याचा परिणाम रुग्णाच्या मानसिक स्वास्थ्यावरही झाला होता. त्यांची मन:स्थिती स्थिर नव्हती. तावी प्रक्रियेनंतर दोन दिवसांनी कायमस्वरूपी पेसमेकर बसविण्यात आला. दोन्ही शस्त्रक्रिया पूर्ण झाल्याबरोबर त्यांचे हृदय नीट काम करू लागले कारण आता नवीन व्हॉल्व्हमुळे हृदयाकडून पम्प होणारे रक्त विविध अवयवांपर्यंत पोहोचण्यास कोणताही अडथळा येत नव्हता.

किडनीच्या अकार्यक्षमतेची समस्याही सोडविण्यात आली आणि फुफ्फुसांमध्ये जमा झालेले रक्त काढून टाकण्यात आले. अनेक गुंतागूंतीच्या समस्या असलेल्या या रुग्णाला TAVI प्रक्रियेमुळे एक नवा जन्म मिळाला, ज्यांच्यासाठी ओपन हार्ट सर्जरीचा पर्याय बऱ्यापैकी धोकादायक ठरू शकला असता. तावी ही आओर्टिक स्टेनॉसिसने गंभीररित्या आजारी रुग्णांसाठी, विशेषत: ओपन हार्ट शस्त्रक्रियेमध्ये मृत्यूचा व गुंतागूंतीचा धोका लक्षणीयरित्या अधिक असल्यास चांगला पर्याय ठरू शकणारी एक सुरक्षित आणि प्राणरक्षक प्रक्रिया असल्याचेही डॉ. महाजन यांनी सांगितले. 

फॅसिलिटी डिरेक्टर डॉ. सुप्रिया अमेय म्हणाल्या की, वैद्यकीयदृष्ट्या मैलाचा टप्पा ठरू शकेल अशा या शस्त्रक्रियेमधून नेहमीच्या प्रक्रियांच्या सोबतीनेच गुंतागूंतीच्या, जीव वाचविणारे हृदयोपचार पुरविण्यासाठी आम्ही करत असलेल्या कार्याची खोली दिसून आली व यामुळे कल्याण आणि डोंबिवलीतील रुग्णांना अशाप्रकारची सेवा देणे आम्हाला आता शक्य आहे. रुग्णाचे पुत्र निलेश म्हणाले की, माझ्या आईच्या वैद्यकीय पूर्वतिहासामुळे आणि तिच्या तब्येतीमधील गुंतागूंतींमुळे आम्ही तावी प्रक्रियेचा पर्याय स्वीकारला. तिला आता चालता येते व ती बरी आहे.

टॅग्स :kalyanकल्याणhospitalहॉस्पिटल