शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

डोंबिवलीचा श्वास असलेल्या उंबार्ली टेकडीवर घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 15:04 IST

Dombivali News : पर्यावरणाने समृद्ध असलेली टेकडी तोडून घरे उभारण्यात काय अर्थ असा संतप्त सवाल मनसेच्या वतीने उपस्थित केला आहे

कल्याण - डोंबिवली नजीक असलेली उंबार्ली टेकडी ही शहराच्या श्वास आहे. या टेकडीला पोखरुन त्याठिकाणी म्हाडाच्या वतीने केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेतील घरकूल सुरू आहे. पर्यावरणाने समृद्ध असलेली टेकडी तोडून घरे उभारण्यात काय अर्थ असा संतप्त सवाल मनसेच्या वतीने उपस्थित केला आहे. या प्रकल्पाला स्थगिती देण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. येत्या ५ जानेवारी रोजी या ठिकाणी मनसेच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे.

मनसेचे राजेश कदम यांनी सांगितले की, उंबार्ली टेकडीवर एकूण ४० हजार वृक्ष लागवड आहे. ही वृक्ष लागवड वनखाते, स्थानिक भूमीपूत्र, पक्षी निसर्ग प्रेमींकडून करण्यात आली आहे. या टेकडीवर नागरीक फेरफटका मारायला जातात. त्याठिकाणी वन प्रेमींकडून झाडांना पाणी घातले जाते. या टेकडीला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भेट दिली होती. टेकडी परिसराचा फेरफटका मारुन या टेकडीवरील वनराईचे जतन करण्यात येणार आहे. तसेच ठीबक पद्धतीने या झाडांना पाणी देण्याचा विचार समोर आला. त्याचबरोबर या टेकडीवर नाशिकच्या धर्तीवर बॉटीनिकल गार्डन उभारण्याचा मानस पाटील यांनी व्यक्त केला होता. 

म्हाडाच्या वतीने या टेकडीनजिक पंतप्रधान आवास योजनेतील घरे बांधली जात आहे. टेकडीचा डोंगर पोखरला जात आहे. टेकडीला धोका निर्माण झाला आहे. या प्रकल्पास स्थगिती देण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. युती सरकारच्या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी डोंगर टेकडय़ा पोखरुन दगड माती काढू नये असे आदेश दिले होते. सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आहेत. त्यांच्याकडून म्हाडातर्फे टेकडी पोखरण्याचे सुरू असलेल्या काम दुर्लक्षित आहे. उंबार्ली टेकडी वाचविण्यासाठी आरेच्या धर्तीवर मनसे आंदोलन करणार असल्याचा इशारा कदम यांनी दिला आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMNSमनसे