शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

डोंबिवलीचा श्वास असलेल्या उंबार्ली टेकडीवर घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 15:04 IST

Dombivali News : पर्यावरणाने समृद्ध असलेली टेकडी तोडून घरे उभारण्यात काय अर्थ असा संतप्त सवाल मनसेच्या वतीने उपस्थित केला आहे

कल्याण - डोंबिवली नजीक असलेली उंबार्ली टेकडी ही शहराच्या श्वास आहे. या टेकडीला पोखरुन त्याठिकाणी म्हाडाच्या वतीने केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेतील घरकूल सुरू आहे. पर्यावरणाने समृद्ध असलेली टेकडी तोडून घरे उभारण्यात काय अर्थ असा संतप्त सवाल मनसेच्या वतीने उपस्थित केला आहे. या प्रकल्पाला स्थगिती देण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. येत्या ५ जानेवारी रोजी या ठिकाणी मनसेच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे.

मनसेचे राजेश कदम यांनी सांगितले की, उंबार्ली टेकडीवर एकूण ४० हजार वृक्ष लागवड आहे. ही वृक्ष लागवड वनखाते, स्थानिक भूमीपूत्र, पक्षी निसर्ग प्रेमींकडून करण्यात आली आहे. या टेकडीवर नागरीक फेरफटका मारायला जातात. त्याठिकाणी वन प्रेमींकडून झाडांना पाणी घातले जाते. या टेकडीला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भेट दिली होती. टेकडी परिसराचा फेरफटका मारुन या टेकडीवरील वनराईचे जतन करण्यात येणार आहे. तसेच ठीबक पद्धतीने या झाडांना पाणी देण्याचा विचार समोर आला. त्याचबरोबर या टेकडीवर नाशिकच्या धर्तीवर बॉटीनिकल गार्डन उभारण्याचा मानस पाटील यांनी व्यक्त केला होता. 

म्हाडाच्या वतीने या टेकडीनजिक पंतप्रधान आवास योजनेतील घरे बांधली जात आहे. टेकडीचा डोंगर पोखरला जात आहे. टेकडीला धोका निर्माण झाला आहे. या प्रकल्पास स्थगिती देण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. युती सरकारच्या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी डोंगर टेकडय़ा पोखरुन दगड माती काढू नये असे आदेश दिले होते. सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आहेत. त्यांच्याकडून म्हाडातर्फे टेकडी पोखरण्याचे सुरू असलेल्या काम दुर्लक्षित आहे. उंबार्ली टेकडी वाचविण्यासाठी आरेच्या धर्तीवर मनसे आंदोलन करणार असल्याचा इशारा कदम यांनी दिला आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMNSमनसे