शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

डोंबिवली : पावसाळ्याच्या शुभारंभालाच नांदिवली, म्हात्रेनगर, महात्मा फुले पथ पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 19:37 IST

Heavy Rainfall : रहिवाशांना करावा लागला समस्यांचा सामना. आयुक्तांकडून पाहणी का नाही, नागरिकांचा सवाल

ठळक मुद्देरहिवाशांना करावा लागला समस्यांचा सामना.आयुक्तांकडून पाहणी का नाही, नागरिकांचा सवाल

डोंबिवली: हवामान खात्याने जाहीर केल्यानुसार बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांची दाणादाण उडवून दिली. पहाटेपासून पावसाचा जोर कायम होता, तो दुपारी ३ वाजेनंतर काहीसा कमी झाला. त्या कालावधीत पडलेल्या या मोसमातील पहिल्याच पावसाने म्हात्रेनगर, नांदिवली, महात्मा फुले पथ आणि ठाकुर्लीचा काही भाग पाण्याखाली गेला. नालेसफाई असेल अथवा महापालिकेने केलेली नाल्याची अर्धवट कामे यामुळे ही स्थिती ओढवली असून नागरिकांना मात्र त्याचा थेट फटका बसला आहे. 

म्हात्रेनगर येथे कोपर रेल्वे स्थानकालगत पूर्वेला असलेल्या नाल्याचे तोंड अरुंद असल्याने पहिल्याच पावसात त्या भागात बहुतांशी सोसायट्यांची एंट्री पाण्याखाली होती,जर पावसाचा जोर सतत तीन दिवस असाच राहिला तर मात्र अनेकांची घर पाण्याखाली जातील अशी भीती माजी नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी व्यक्त केली. नांदीवली भागात देखील श्री स्वामी समर्थ नगरमध्ये अशीच स्थिती असल्याने गतवर्षी प्रमाणेच रस्त्यावर पाणी भरले आणि नागरिकांची पायवाट बंद झाली. शेकडो रहिवाशांचे त्यात हाल झाले. अनेकांनी आमदार राजू पाटील यांना संपर्क साधून पावसाच्या पाण्यामुळे जे हाल सुरू आहेत त्याचे फोटो, व्हिडिओ पाठवून या गैरसोयीतून सोडवण्याची मागणी केली. वर्षानुवर्षे केवळ आश्वासन मिळत असून महापालिका काहीही उपाययोजना करत नसल्याने आमच्या घरांचे नुकसान होत असल्याची भावना रहिवाशांमध्ये आहे. 

तर सदोष मनुष्यवधाचा दाखल करू

आता तर पहिलाच पाऊस होता, आणखी साडेतीन महिने जायचे आहेत, कसे होणार याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली. महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी हे पाहणीसाठी का आले नाही? असा सवाल त्रस्त नागरिकांनी केला. पश्चिमेला देखील पाच महिन्यांपासून महात्मा फुले रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटचे काम सुरू आहे. सुरुवातीपासूनच काम संथ गतीने सुरू असल्याने बुधवारच्या पावसात तेथे नदीचे स्वरूप आल्यासारखी स्थिती होती. त्यावर मनपाच्या उपभियंत्याना नागरिकांनी प्रश्न विचारले पण ते निरुत्तर होते. कंत्राटदार घटनास्थळी नव्हता, त्याचे कामगार नागरिकांना उडवाउडवीची उत्तर देत असल्याने वातावरण तापले असल्याची माहिती रहिवासी आणि पश्चिमेकडिल रिक्षा चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष शेखर जोशी यांनी दिली. जर या स्थितीमुळे कोणाचा अपघात झाला तर मात्र कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जोशी म्हणाले. 

अनेक रस्ते जलमय

वेळोवेळी सूचना देऊनही महापालिका, संबंधित कंत्राटदार आदीनी न ऐकल्याने गंभीर स्थिती ओढवल्याची टीका जोशी यांनी केली. तसेच जर तात्काळ उपाययोजना करून पाणी साठू नये असे नियोजन न केल्यास पावसातच त्या पाण्यात बसून रिक्षा चालक आंदोलन करतील असा इशारा देखील त्यांनी दिला. अशाच पद्धतीने मानपाडा रस्त्यावर ग, फ प्रभाग समिती कार्यालयाजवळ पाणी साचले होते. ठाकुर्ली भागात देखील सखल भागात पाणी साचल्याने चिखल झाला होता. एमआयडीसीत अंतर्गत रस्त्यावर तळे साचले होते, त्यामुळे नागरिक, वाहनचालक त्रस्त झाले. तेथील सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी त्याबाबतचे दृश्य, छायाचित्र ठिकठिकाणी पाठवून जनजागृती करून मदतीची अपेक्षा केली. तेथे एम्स हॉस्पिटल रस्ता, हायवेचा सर्व्हिस रस्ता, वंदे मातरम् उद्यान, स्टरलींग पॅलेस सोसायटी समोर इत्यादी ठिकाणी पाणी तुंबले होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची असुविधा झाली होती. भोपरमध्ये देखील पाणी साचले होते, सामाजिक कार्यकर्ते अमर माळी आणि त्यांच्या सहकार्यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले, तसेच मनपाला पाणी साचल्यासंदर्भात सूचित केले होते. 

नांदीवली भागात पाणी समस्या होऊ नये यासाठी मी स्वतः आयुक्तांना भेटून माझा कोट्यवधी रुपयांचा आमदार निधी देण्यात येईल असे सांगितले. पण त्यांनी नकार दिला. पण त्यांनीही वर्षभरात काही केलेले नाही, त्यामुळे आता पहिल्या पावसात नागरिकांचे हाल सुरू झाले, त्यांच्या नुकसानीची जबाबदारी आयुक्त घेणार आहेत का? त्यांच्याकडे निधीची कमतरता समजू शकतो, पण मग माझा निधी नाकारण्याचे कारणच काय होते?राजू पाटील, आमदार 

म्हात्रे नगर मध्ये पुन्हा एकदा पंपिंग स्टेशनमधील यंत्रणा बंद पडल्याचे दिसून आले. दोन वर्षांपूर्वी स्वतः महापौर विनीता राणे, विश्वनाथ राणे तेथे येऊन पंप सुरू केले होते, पण आता ते बंद असल्याने शहरातून पावसाच्या आलेल्या पाण्याचा निचरा वेगाने होत नसल्याने त्यात नव्याने केलेल्या नाल्याच्या कामातील चुकांचा फटका रहिवाश्यांना बसत आहे. आयुक्त सूर्यवंशी वेळीच याची दखल घेतील का? 

विशू पेडणेकर, माजी नगरसेवक

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMNSमनसेRaju Patilराजू पाटीलRainपाऊसkdmcकल्याण डोंबिवली महापालिका