शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावाच लागेल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 17:24 IST

विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण.

ठळक मुद्देविविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण

"कल्याण-स्कायवॉक फेरीवाला मुक्त हा महत्त्वाचा विषय आहे. ठाण्यात मध्यंतरती जी घटना घडली. महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपली आहे. त्यात महिला पोलीस देखील आल्या. जो कोणी कायदा हातात घेत असेल त्याच्या बाबतीत दया माया दाखवून चालणार नाही. फेरीवाल्यांच्या उच्छाद आटोक्यात आणण्यासाठी कायदा राबवावा लागेल," असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवार केले.

कल्याणडोंबिवली महापालिकेच्या विविध विकास कामांचे ऑनलाइन लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटय़गृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमास ऑनलाईनद्वारे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना आमदार रविंद्र फाटक, विश्वनाथ भोईर, भाजप आमदार रविंद्र चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस भाजप आमदार चव्हाण यांनी व्यथा मांडली. "मुख्यमंत्र्यांनी कल्याण डोंबिवलीच्या विकासाकडे लक्ष द्यावे. निधी द्यावा. मंदिरे उघडी करावी," असे ते म्हणाले. या मुद्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, "कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता आरोग्याची मंदिरे उभारणे गरजेचे आहे." चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारत माता की जयच्या घोषणा दिल्या होत्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आम्ही सुद्धा घोषणा देतो. मात्र ज्या भारत मातेच्या घोषणा दिल्या जातात. त्याच भारत मातेची मुले सोयी सुविधांपासून वंचित राहणार असतील तर केवळ घोषणा देऊन काय उपयोग, असा प्रश्न उपस्थित केला. कल्याण डोंबिवलीचा विकासासाठी काय हवे आहे. एकदा या आणि बसा पूल, रस्ते, रुग्णालय काय हवे आहे. जनतेच्या सोयी सुविधांसाठी सर्व काही तयारी करण्याची तयारी आहे असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले.

६५०० कोटीचा बॅकलॉग कशामुळे राहिला..?आमदार चव्हाण यांनी बॅकलॉगचा मुद्दा यादरम्यान उपस्थित केला. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी साडे सहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहिर केले होते. हा बॅकलॉग कशामुळे राहिला असा सवालही मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस यांचा नामोल्लेख न करता उपस्थित केला.

कोपर रेल्वे उड्डाणपूल, रुक्णीबाई रुग्णालय प्राणवायू प्रकल्प, सावळाराम क्रीडा संकुल प्राणवायू प्रकल्प, शास्त्रनगर रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह, नागरी आरोग्य केंद्र, जैव विविधता उद्दान, महिलांसाटी तेजस्वीनी बस आणि अग्नीशमन केंद्र या कामाचे लोकार्पण करण्यात आले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्रीMaharashtraमहाराष्ट्रkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीhawkersफेरीवाले