शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

डोंबिवलीतील 49 रिक्षा थांबे बंद करण्याचा आदेश धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:07 IST

मार्च २०१७ चा अहवाल : केडीएमसी, आरटीओ, पोलिसांचे सर्वेक्षण

अनिकेत घमंडीलोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कल्याण, डोंबिवलीसह महापालिका क्षेत्रातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्याचे स्वागत होत असले तरीही महापालिका, आरटीओ, ट्रॅफीक पोलीस या तिन्ही यंत्रणांनी संयुक्त पाहणी करून तीन वर्षांपूर्वी १८ मार्च २०१७ रोजी डोंबिवली शहरातील सुमारे ११३ पैकी ४९ रिक्षा थांबे हे वाहतुकीला बाधा आणत असून ते तातडीने बंद करावेत, असे संयुक्त अहवालात नमूद केले होते. परंतु, नेहमीप्रमाणेच हा अहवालदेखील धूळखात पडल्याने शहरांतर्गत कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे.रेल्वे स्थानक परिसरात पूर्व आणि पश्चिम दिशांना तर रिक्षाचालकांच्या मनमानी कारभारावर नियंत्रण मिळवणे हे वाहतूक पोलिसांच्या हाताबाहेर गेले आहे. रामनगर भागात पूर्वेकडील विविध भागातून येणाऱ्या रिक्षाचालकांमुळे वाहतूक पोलिसांच्या दालनासमोरच दिवस-रात्र कोंडी झालेली दिसून येते. त्या अहवालात पूर्वेला १८ आणि पश्चिमेला असलेले रिक्षाचे ३१ थांबे तातडीने बंद करावेत, असे म्हटले होते.त्यामध्ये चिमणी गल्ली, मदन ठाकरे थांबा, सरोवर बार गोग्रासवाडी, पाथरली गावठाण, मंजुनाथ स्कूल, जानकी हॉटेलनजीक, सावरकर पथ महादेव मंदिरजवळ, केळकर पथ वृंदावन हॉटेलजवळ, विवेकानंद सोसायटीसमोर, गावदेवी मंदिर चौक, शिव मंदिर चौक, स्नेहंकीत मित्रमंडळ चौक, कृष्णसुदामा थांबा, डीएनसी शाळेजवळ हुमाननगर थांबा, ओम बंगला आयरे पथ, स्वामी नारायण मंदिर, साईबाबा मंदिर आयरे पथ, राजगंगा थांबा आदींचा समावेश होता. पश्चिमेला अपूर्व हॉस्पिटल नजीक, म्हाळसाई रिक्षा थांबा, सखाराम थांबा, तुळशीराम जोशींच्या बंगल्याजवळ, श्रीराम मंदिर नं ३, नेमाडी गल्ली थांबा नं १, गिरिजामाता मंदिराजवळ, फुलेनगर रिक्षा थांबा, गावदेवी मंदिरा लागूनचा थांबा, गोपीनाथ चौकाच्या नाल्याजवळील, अनमोल नगरी, श्रीधर म्हात्रे चौक, गरिबाचा वाडा, नील कमळ बंगल्याजवळ, स्वामी शाळेसमोर फुले पथ, भरत भोईरनगर रिक्षा थांबा, महाराष्ट्रनगर अभिनंदन सोसायटीसमोर, योग संकुलासमोर, विजय सोसायटीनजीक, नवापाडा, करण बिल्डिंगजवळ, शंखेश्वर पाडा,  जोंधळे मंदिराजवळ, महात्मा गांधी उद्याननजीक, जयहिंद कॉलनी गुप्ते पथ, रोकडे बिल्डिंग जवळ, ट्रान्झिट कॅम्पसमोर,  त्रिभुवन सोसायटीसमोर, राजश्री बंगला, सम्राट चौक, लक्ष्मी डेअरी, फ्लेक्स जिमजवळ आदी रिक्षाथांब्यांचा समावेश आहे.

nपरिसरातील जागा अरुंद, रस्ते छोटे असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने बहुतांश थांबे बंद करावेत, अशा सूचना त्यावेळी देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याची अंमलबजावणी केली गेली नव्हती. आयुक्तांनी आवश्यक ते बदल करून वाहतुकीला शिस्त आणावी, अशी मागणी वाहतूककोंडीने त्रस्त प्रवासी करत आहेत.nशहरात ११३ थांबे असल्याची नोंद असून, त्यावेळच्या अंदाजानुसार पूर्वेला ३४ आणि पश्चिमेला २९ स्टॅण्ड असण्याची गरज होती, असेही नमूद केले होते. सध्या तर गल्लोगल्ली रिक्षा थांबे झाल्याचे निदर्शनास येत असून, हा आकडा ११३ हून अधिक असण्याची शक्यता प्रथमदर्शनी दिसून येत आहे.