शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

कबड्डी स्पर्धेसाठी भारताचा संघ पाकिस्तानमध्ये गेल्याने वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 04:43 IST

क्रीडामंत्री व राष्टÑीय संघटनेने या स्पर्धेसाठी कोणत्याही खेळाडूला परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : जागतिक कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. क्रीडामंत्री व राष्टÑीय संघटनेने या स्पर्धेसाठी कोणत्याही खेळाडूला परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतातून एक पथक वाघा बॉर्डरमार्गे लाहोरमध्ये पोहोचले आहे. पाकिस्तानमध्ये प्रथमच आयोजित केलेल्या या स्पर्धेत भारत सहभागी झाल्याचे सोशल मीडियाद्वारे समजले.

या स्पर्धेतील सामने लाहोर, फैसलाबाद व गुजरात येथे होणार आहेत. क्रीडा मंत्रायलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही खेळाडूला पाकिस्तानमध्ये जाण्याची परवानगी दिलेली नाही. भारतीय हौशी कबड्डी संघटनेचे प्रशासक निवृत्त न्या. एस. पी. गर्ग यांनीही संघटनेने कोणत्याही संघाला पाकिस्तानमध्ये जाण्याची परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले,‘आम्हाला पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या कोणत्याही संघाची कल्पना नाही.’ कबड्डी संघटनेने पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी कोणत्याही संघाला परवानगी दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

परदेशात होणाºया स्पर्धेची सूचना राष्टÑीय संघटना क्रीडा मंत्रालयाला देते. त्यानंतर या दौºयाला मंजूरी देण्यासाठी परराष्टÑ व गृह मंत्रालयाला पत्र लिहिले जाते. पाकिस्तानच्या पंजाबचे क्रीडामंत्री राय तैमूर खान भट्टी यांनी लाहोर येथील एका हॉटेलमध्ये भारतीय पथकाचे स्वागत केले. जागतिक कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा २०१० व २०१९ मध्ये भारतात आयोजित करण्यात आली होती. भारताने आतापर्ययत झालेल्या सहाही स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. यात २०१०, २०१२, २०१३ व २०१४ मध्ये या स्पर्धेत भारताने पाकला नमवले. या स्पर्धेतील विजेत्याला एक कोटी तर उपविजेत्याला ७५ लाखांचे बक्षिस देण्यात येईल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Pakistanपाकिस्तान