शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कबड्डी स्पर्धेसाठी भारताचा संघ पाकिस्तानमध्ये गेल्याने वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 04:43 IST

क्रीडामंत्री व राष्टÑीय संघटनेने या स्पर्धेसाठी कोणत्याही खेळाडूला परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : जागतिक कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. क्रीडामंत्री व राष्टÑीय संघटनेने या स्पर्धेसाठी कोणत्याही खेळाडूला परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतातून एक पथक वाघा बॉर्डरमार्गे लाहोरमध्ये पोहोचले आहे. पाकिस्तानमध्ये प्रथमच आयोजित केलेल्या या स्पर्धेत भारत सहभागी झाल्याचे सोशल मीडियाद्वारे समजले.

या स्पर्धेतील सामने लाहोर, फैसलाबाद व गुजरात येथे होणार आहेत. क्रीडा मंत्रायलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही खेळाडूला पाकिस्तानमध्ये जाण्याची परवानगी दिलेली नाही. भारतीय हौशी कबड्डी संघटनेचे प्रशासक निवृत्त न्या. एस. पी. गर्ग यांनीही संघटनेने कोणत्याही संघाला पाकिस्तानमध्ये जाण्याची परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले,‘आम्हाला पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या कोणत्याही संघाची कल्पना नाही.’ कबड्डी संघटनेने पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी कोणत्याही संघाला परवानगी दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

परदेशात होणाºया स्पर्धेची सूचना राष्टÑीय संघटना क्रीडा मंत्रालयाला देते. त्यानंतर या दौºयाला मंजूरी देण्यासाठी परराष्टÑ व गृह मंत्रालयाला पत्र लिहिले जाते. पाकिस्तानच्या पंजाबचे क्रीडामंत्री राय तैमूर खान भट्टी यांनी लाहोर येथील एका हॉटेलमध्ये भारतीय पथकाचे स्वागत केले. जागतिक कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा २०१० व २०१९ मध्ये भारतात आयोजित करण्यात आली होती. भारताने आतापर्ययत झालेल्या सहाही स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. यात २०१०, २०१२, २०१३ व २०१४ मध्ये या स्पर्धेत भारताने पाकला नमवले. या स्पर्धेतील विजेत्याला एक कोटी तर उपविजेत्याला ७५ लाखांचे बक्षिस देण्यात येईल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Pakistanपाकिस्तान