शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Indian Railway: रेल्वे रुळांच्या मधोमध का टाकलेली असते खडी? यामागे दडलीय एक रंजक गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 15:26 IST

रेल्वे आणि रेल्वे ट्रॅकची (Railway Track) रचना बघता, रेल्वेच्या ट्रॅकमध्ये खडी का असतात, असा प्रश्न तुम्हाला केव्हा न केव्हा पडला असेलच.

देशातील कोट्यवधी लोक दररोज रेल्वेनं (Indian Railway) प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. लोकल (Mumbai Local) ही तर मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते. तुम्ही देखील अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. रेल्वे आणि रेल्वे ट्रॅकची (Railway Track) रचना बघता, रेल्वेच्या ट्रॅकमध्ये खडी का असतात, असा प्रश्न तुम्हाला केव्हा न केव्हा पडला असेलच. खरंतर जेव्हापासून रेल्वेचा शोध लागला तेव्हापासूनच ट्रॅकदरम्यान खडीचा वापर केला जात आहे. यामागे विशेष असं कारण आहे. रेल्वेची एकूण रचना गृहित धरून रेल्वे ट्रॅकची निर्मिती करण्यात आलेली असते. ट्रॅकची निर्मिती करताना प्रत्येक बाबीचा काटेकोर विचार केलेला असतो.

रेल्वेचा ट्रॅक दिसायला साधा असला तरी प्रत्यक्षात त्याची रचना तशी नसते. ट्रॅकच्या खाली कॉंक्रिटचे स्तर (Concrete layers) असतात, त्याला स्लिपर (Sleeper) असं म्हणतात. या स्लिपरच्या खाली खडी असतात, त्याला बलास्ट (Ballast) म्हणतात. या बलास्टच्या खाली मातीचे दोन थर असतात आणि सर्वांत खाली जमीन असते. जेव्हा या ट्रॅकवरून रेल्वे धावते तेव्हा कंपनं निर्माण होतात. त्यामुळे रूळ विलग होण्याची शक्यता असते. त्यामुळे कंपनं कमी करण्यासाठी तसेच रूळ वेगळे होऊ नयेत यासाठी दोन रुळांदरम्यान खडी किंवा लहान अथवा मध्यम आकाराचे दगड टाकले जातात.

जेव्हा रेल्वे रुळावरून धावते तेव्हा तिचा सर्व भार कॉंक्रिटच्या स्लिपरवर पडतो. आजूबाजूला असलेल्या खडींमुळे क्रॉंक्रिट स्थिर राहण्यास मदत होते. या खडींमुळे स्लीपर घसरत नाही. रेल्वेच्या रुळांदरम्यान पाणी साचू नये, यासाठी देखील रुळांदरम्यान खडी टाकलेली असते. पावसाचे पाणी रुळावर पडल्यानंतर ते खडींमधून जमिनीत जाते. त्यामुळे रुळांदरम्यान पावसाचे पाणी साचून राहत नाही. याशिवाय रुळांदरम्यान टाकलेली खडी पाण्यात वाहूनही जात नाही.

लोखंडापासून बनवलेल्या एका रेल्वेचे वजन सुमारे 10 लाख किलोंपर्यंत असते. केवळ ट्रॅक हे वजन पेलू शकत नाहीत. एवढ्या अवजड रेल्वेचं वजन पेलण्यात लोखंडाचे रुळ, कॉंक्रिटची स्लिपर आणि खडी अशा सर्वांचा हातभार लागतो. तसं पाहायला गेलं तर रेल्वेचं बहुतांश वजन या खडींवरच असतं. या खडींमुळे स्लिपर जागचे हलू शकत नाहीत. जर रेल्वे ट्रॅकवर अशी खडी टाकली नाहीत तर संपूर्ण ट्रॅकवर गवत आणि झाडं-झुडपं उगवतील. असं झाल्यास रेल्वे धावण्यात अडचणी निर्माण होतील. त्यामुळे या अडचणी टाळण्यासाठी रेल्वे रुळांदरम्यान खडी टाकली जातात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेrailwayरेल्वे