शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

Indian Railway: रेल्वे रुळांच्या मधोमध का टाकलेली असते खडी? यामागे दडलीय एक रंजक गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 15:26 IST

रेल्वे आणि रेल्वे ट्रॅकची (Railway Track) रचना बघता, रेल्वेच्या ट्रॅकमध्ये खडी का असतात, असा प्रश्न तुम्हाला केव्हा न केव्हा पडला असेलच.

देशातील कोट्यवधी लोक दररोज रेल्वेनं (Indian Railway) प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. लोकल (Mumbai Local) ही तर मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते. तुम्ही देखील अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. रेल्वे आणि रेल्वे ट्रॅकची (Railway Track) रचना बघता, रेल्वेच्या ट्रॅकमध्ये खडी का असतात, असा प्रश्न तुम्हाला केव्हा न केव्हा पडला असेलच. खरंतर जेव्हापासून रेल्वेचा शोध लागला तेव्हापासूनच ट्रॅकदरम्यान खडीचा वापर केला जात आहे. यामागे विशेष असं कारण आहे. रेल्वेची एकूण रचना गृहित धरून रेल्वे ट्रॅकची निर्मिती करण्यात आलेली असते. ट्रॅकची निर्मिती करताना प्रत्येक बाबीचा काटेकोर विचार केलेला असतो.

रेल्वेचा ट्रॅक दिसायला साधा असला तरी प्रत्यक्षात त्याची रचना तशी नसते. ट्रॅकच्या खाली कॉंक्रिटचे स्तर (Concrete layers) असतात, त्याला स्लिपर (Sleeper) असं म्हणतात. या स्लिपरच्या खाली खडी असतात, त्याला बलास्ट (Ballast) म्हणतात. या बलास्टच्या खाली मातीचे दोन थर असतात आणि सर्वांत खाली जमीन असते. जेव्हा या ट्रॅकवरून रेल्वे धावते तेव्हा कंपनं निर्माण होतात. त्यामुळे रूळ विलग होण्याची शक्यता असते. त्यामुळे कंपनं कमी करण्यासाठी तसेच रूळ वेगळे होऊ नयेत यासाठी दोन रुळांदरम्यान खडी किंवा लहान अथवा मध्यम आकाराचे दगड टाकले जातात.

जेव्हा रेल्वे रुळावरून धावते तेव्हा तिचा सर्व भार कॉंक्रिटच्या स्लिपरवर पडतो. आजूबाजूला असलेल्या खडींमुळे क्रॉंक्रिट स्थिर राहण्यास मदत होते. या खडींमुळे स्लीपर घसरत नाही. रेल्वेच्या रुळांदरम्यान पाणी साचू नये, यासाठी देखील रुळांदरम्यान खडी टाकलेली असते. पावसाचे पाणी रुळावर पडल्यानंतर ते खडींमधून जमिनीत जाते. त्यामुळे रुळांदरम्यान पावसाचे पाणी साचून राहत नाही. याशिवाय रुळांदरम्यान टाकलेली खडी पाण्यात वाहूनही जात नाही.

लोखंडापासून बनवलेल्या एका रेल्वेचे वजन सुमारे 10 लाख किलोंपर्यंत असते. केवळ ट्रॅक हे वजन पेलू शकत नाहीत. एवढ्या अवजड रेल्वेचं वजन पेलण्यात लोखंडाचे रुळ, कॉंक्रिटची स्लिपर आणि खडी अशा सर्वांचा हातभार लागतो. तसं पाहायला गेलं तर रेल्वेचं बहुतांश वजन या खडींवरच असतं. या खडींमुळे स्लिपर जागचे हलू शकत नाहीत. जर रेल्वे ट्रॅकवर अशी खडी टाकली नाहीत तर संपूर्ण ट्रॅकवर गवत आणि झाडं-झुडपं उगवतील. असं झाल्यास रेल्वे धावण्यात अडचणी निर्माण होतील. त्यामुळे या अडचणी टाळण्यासाठी रेल्वे रुळांदरम्यान खडी टाकली जातात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेrailwayरेल्वे