बनारसच्या या आंब्याचं नाव ‘लंगडा’ असं का पडलं असेल बरं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 05:58 AM2019-04-28T05:58:29+5:302019-04-28T05:59:03+5:30

अजब-गजब । ३०० वर्षांपासूनची कथा

Why should the name of this mango be called 'Langda'? | बनारसच्या या आंब्याचं नाव ‘लंगडा’ असं का पडलं असेल बरं?

बनारसच्या या आंब्याचं नाव ‘लंगडा’ असं का पडलं असेल बरं?

Next

जास्तीत जास्त लोक उन्हाळ्याची आतुरतेने वाट बघत असतात कारण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे गोड गोड आंबे खायला मिळतात. भारतात जवळपास १५०० प्रकारच्या आंब्यांच उत्पादन घेतलं जातं. कमाल म्हणजे या सर्वच आंब्यांची टेस्ट वेगळी आणि मोहात पाडणारी असते. जसे की, हापूस, लंगडा आंबा, बदामी आंबा, केशर आंबा हे जरा जास्तच लोकप्रिय आहेत.

यातील लंगडा आंबा हा अनेकांना जरा वेगळ्या कारणासाठी बुचकळ्यात टाकून जातो. तो असा की, या आंब्याचं नाव लंगडा आंबा का पडलं असावं? एखाद्या फळाचं नाव लंगडा कसं असू शकतं, हे नाव मिळालं तरी कसं? तुमच्याही मनात हा हे प्रश्न उपस्थित होत असतील तर चला जाणून घेऊ याचं उत्तर.

लंगडा आंब्याचा इतिहास
लंगडा आंब्याबद्दल जेव्हा पद्मश्री हाजी कलीमुल्लाह यांनी सांगितलं की, लंगडा आंब्याची शेती साधारण २५० ते ३०० वर्षांपूर्वी बनारसच्या काशीमध्ये सुरु करण्यात आली. खूप वर्षांपूर्वी बनारसमध्ये एक पायाने अपंग व्यक्ती राहत होती. त्याच्या जवळचे लोक त्याला लंगडा म्हणूणच हाक मारत. या व्यक्तीने एकदा एक आंबा खाल्ला आणि त्याला तो फारच आवडला. मग त्याने या आंब्याची गुठळी घरातील अंगणात लावली. काही वर्षांनी याला भरपूर आंबे येऊ लागले जे फारच स्वादिष्ट होते. अनेकांना या आंब्याची चव फारच आवडली. ज्यानंतर सर्वांनी मिळून त्या व्यक्तीच्या नावावर याचं नाव लंगडा आंबा असं ठेवलं. तसे भारतात अनेक नावाचे आंबे आहेत, पण लंगडा आंबा या कारणामुळेच खास आहे.
कलीमुल्लाह हे देशभरात आंब्याची शेती करण्यासाठी आणि सोबतच नवनवीन प्रजाती विकसित करण्यासाठी ओळखले जातात.

 

Web Title: Why should the name of this mango be called 'Langda'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.