शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

...म्हणून ३० वर्षांपासून महिलेच्या वेशात राहते 'ही' व्यक्ती, कारण वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 12:24 IST

मृत्युची भिती ही सर्वात भयानक भिती मानली जाते आणि यापासून वाचण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात.

(Image Credit : amarujala.com)

मृत्युची भीती ही सर्वात भयानक भीती मानली जाते आणि यापासून वाचण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. याच भीतीमुळे उत्तर प्रदेशातील जौनपूरच्या जलालपूरमधील हौज खास येथील राहणारा चिंता हरण चौहान हैराण झाला आहे.  त्याचं नाव तर चिंता हरण आहे, पण त्याला मृत्युच्या भीतीने असं काही पछाडलं आहे की, तो गेल्या ३० वर्षांपासून स्त्री बनून फिरत आहे.

amarujala.com ने दिलेल्या वृत्तानुसार, चिंता हरण ऊर्फ करियाला मृत्युची भिती असण्याचा कारण फारच विचित्र आहे. हे कारण वाचून तुम्हीही विचारात पडाल. ६६ वर्षीय चिंता हरणनुसार, प्रेत आत्मेच्या नादात त्याच्या घरातील १४ लोकांचा मृत्यू झाला होता. आता त्याला स्वत:च्या मरणाची भीती सतावत आहे. चिंता हरण जेव्हा १४ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या घरातील लोकांनी त्याचं लग्न लावून दिलं. पण लग्नाच्या काही दिवसांनंतर त्यांच्या पत्नीचं निधन झालं. यानंतर काही वर्ष तो एकटाच होता आणि २१ व्या वर्षी काम करण्यासाठी पश्चिम बंगालच्या दिनाजपूर येथे गेला.

चिंता हरणवर खाण्याच्या सामानाची जबाबदारी होती. इथे एका बंगाली व्यक्तीचं दुकान होतं. चिंता हरण याच दुकानातून नेहमी वस्तू विकत घ्यायचा. हळूहळू त्याची दुकानदारासोबत चांगली ओळख झाली. त्यानंतर दुकानदाराने चिंता हरणला त्याच्या मुलीसोबत लग्न करण्याबाबत विचारले. आणि चिंता हरणने काहीही विचार न करता दुकानदाराच्या मुलीशी लग्न केलं.

पण या लग्नाला चिंता रहणच्या घरच्या लोकांनी विरोध केला. त्यामुळे पत्नीला न सांगता चिंता हरण गावी परत आला. तिकडे बंगाली परिवाराला चिंता हरणच्या घराचा पत्ता माहीत नव्हता. त्यामुळे ही फसवणूक समजून त्याच्या पत्नीने विरहात आत्महत्या केली.

एका वर्षाने चिंता हरण कोलकाताला आला तेव्हा त्याला कळाले की, त्याच्या पत्नीने आत्महत्या केली. तो पुन्हा गावी परत गेला. इकडे घरच्या लोकांनी चिंता हरणचं तिसरं लग्न लावून दिलं. पण लग्नाच्या काही दिवसातच चिंता हरण आजारी पडला. त्यानंतर त्याच्या घरातील व्यक्तीचं निधनाचा सिलसिला सुरू झला. चिंता हरणने सांगितले की, त्याचे वडील राम जीवन, मोठा भाऊ छोटाउ, भावाची पत्नी आअणि त्याची दोन मुले, लहान भाऊ बडाऊ आणि तिसऱ्या पत्नीपासून झालेल्या तीन मुली आणि चार मुलांचं निधन झालं. 

चिंता हरणने सांगितले की, त्याची मृत बंगाली पत्नी नेहमी त्याच्या स्वप्नात येत होती आणि त्याने तिच्यासोबत जे केलं त्यासाठी खूप रडायची. आता चिंता हरण एकटाच पडला होता आणि खचला होता. त्याने एक दिवस मृत बंगाली पत्नीला परिवारातील इतर सदस्यांना काही न करण्याची विनंती केली. ती तयार झाली. पण तिने चिंता हरणला सांगितले की, मला श्रृंगार करून तुझ्यासोबत ठेव, तेव्हाच मी इतरांना काही करणार नाही.

याच भीतीमुळे गेल्या ३० वर्षांपासून चिंता हरण श्रृंगार करून एका महिलेच्या वेशात जगत आहे. त्याने सांगितले की, त्या घटनेनंतर त्याचा आजार बरा झाला आणि परिवारातील लोकांच्या मृत्युचा सिलसिलाही बंद झाला. सध्या चिंता हरणची दोन मुले जिवंत आहेत. ते त्यांच्या महिला झालेल्या वडिलांना मजुरीत मदत करतात. चिंता हरण आता एका छोट्या खोलीत राहतो, पण त्याच्या मनात भिती नेहमी असते. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटके