शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

पृथ्वीवरून मानव कधी आणि कसा नामशेष होणार? शास्त्रज्ञांनी दिली मोठी माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 15:12 IST

शास्त्रज्ञांनी मानवाच्या नामशेष होण्याची भविष्यवाणी केली आहे.

आतापर्यंत पृथ्वीवरुन हजारो-लाखो प्राणी नामशेष झाले आहेत. दरम्यान, आता मानवाच्या नामशेषाचा मुद्दाही शास्त्रज्ञांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. शास्त्रज्ञांनी मानव नष्ट होण्याची शक्यता वर्तवली आहे. आपल्या भविष्यवाणीत त्यांनी याचे कारण आणि वर्षाची माहितीदेखील दिली आहे. इंग्लंडच्या ब्रिस्टर युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात हा दावा केला आहे.

संशोधकांचे म्हणणे आहे की, पुढील 250 मिलियन वर्षांत मानव आणि इतर सर्व सस्तन प्राणी नामशेष होतील. हवामान बदलाचा परिणाम समजून घेऊन वैज्ञानिकांनी त्यावर आधारित एक मॉडेल तयार केले आहे, ज्याच्या मदतीने मानव आणि इतर सस्तन प्राणी पृथ्वीवर किती काळ टिकतील, हे सांगण्यात आले आहे.

नामशेष होण्याचे कारणसंशोधक अलेक्झांडर फर्न्सवर्थ यांच्या मते, पृथ्वीवरील मानव आणि इतर सस्तन प्राण्यांना 40 ते 70 अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागेल. जर आपण भविष्याकडे पाहिले तर ते अंधकारमय असेल, कारण कार्बन डायऑक्साइडची पातळी सध्याच्या पातळीपेक्षा दुप्पट होऊ शकते. मानव आणि इतर प्रजाती उष्णतेशी लढण्यास आणि शरीराला थंड ठेवण्यास असमर्थ होतील.

परिस्थिती का आणि कशी बिघडणार?संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, पृथ्वी एक महाखंड बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पुढील 250 वर्षांत केवळ 8 ते 16 टक्के क्षेत्रच राहण्यासयोग्य असेल. ते Pangea Ultima म्हणून ओळखले जाईल. येथील तापमान झपाट्याने वाढेल. आर्द्रतेचा परिणाम दिसून येईल. जगभरातील तापमान किमान 15 अंशांनी वाढेल. भविष्यात पृथ्वी राहण्यास योग्य असणार नाही. 

अहवालात म्हटले आहे की, केवळ त्याच प्रजाती टिकून राहतील, ज्या तापमानाच्या प्रभावापासून स्वतःला दूर ठेवण्यास सक्षम असतील. हवामान बदलावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, सरकारांनी हवामान बदलाच्या सर्वात वाईट परिस्थितीशी संबंधित परिणामांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तापमान अपेक्षेपेक्षा जास्त वाढले, तर पृथ्वीवरील सर्व मानवी जीवन संपण्याची शक्यताही वाढेल. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सDeathमृत्यूEarthपृथ्वी