शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

पृथ्वीवरून मानव कधी आणि कसा नामशेष होणार? शास्त्रज्ञांनी दिली मोठी माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 15:12 IST

शास्त्रज्ञांनी मानवाच्या नामशेष होण्याची भविष्यवाणी केली आहे.

आतापर्यंत पृथ्वीवरुन हजारो-लाखो प्राणी नामशेष झाले आहेत. दरम्यान, आता मानवाच्या नामशेषाचा मुद्दाही शास्त्रज्ञांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. शास्त्रज्ञांनी मानव नष्ट होण्याची शक्यता वर्तवली आहे. आपल्या भविष्यवाणीत त्यांनी याचे कारण आणि वर्षाची माहितीदेखील दिली आहे. इंग्लंडच्या ब्रिस्टर युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात हा दावा केला आहे.

संशोधकांचे म्हणणे आहे की, पुढील 250 मिलियन वर्षांत मानव आणि इतर सर्व सस्तन प्राणी नामशेष होतील. हवामान बदलाचा परिणाम समजून घेऊन वैज्ञानिकांनी त्यावर आधारित एक मॉडेल तयार केले आहे, ज्याच्या मदतीने मानव आणि इतर सस्तन प्राणी पृथ्वीवर किती काळ टिकतील, हे सांगण्यात आले आहे.

नामशेष होण्याचे कारणसंशोधक अलेक्झांडर फर्न्सवर्थ यांच्या मते, पृथ्वीवरील मानव आणि इतर सस्तन प्राण्यांना 40 ते 70 अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागेल. जर आपण भविष्याकडे पाहिले तर ते अंधकारमय असेल, कारण कार्बन डायऑक्साइडची पातळी सध्याच्या पातळीपेक्षा दुप्पट होऊ शकते. मानव आणि इतर प्रजाती उष्णतेशी लढण्यास आणि शरीराला थंड ठेवण्यास असमर्थ होतील.

परिस्थिती का आणि कशी बिघडणार?संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, पृथ्वी एक महाखंड बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पुढील 250 वर्षांत केवळ 8 ते 16 टक्के क्षेत्रच राहण्यासयोग्य असेल. ते Pangea Ultima म्हणून ओळखले जाईल. येथील तापमान झपाट्याने वाढेल. आर्द्रतेचा परिणाम दिसून येईल. जगभरातील तापमान किमान 15 अंशांनी वाढेल. भविष्यात पृथ्वी राहण्यास योग्य असणार नाही. 

अहवालात म्हटले आहे की, केवळ त्याच प्रजाती टिकून राहतील, ज्या तापमानाच्या प्रभावापासून स्वतःला दूर ठेवण्यास सक्षम असतील. हवामान बदलावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, सरकारांनी हवामान बदलाच्या सर्वात वाईट परिस्थितीशी संबंधित परिणामांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तापमान अपेक्षेपेक्षा जास्त वाढले, तर पृथ्वीवरील सर्व मानवी जीवन संपण्याची शक्यताही वाढेल. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सDeathमृत्यूEarthपृथ्वी