शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

पृथ्वीवरून मानव कधी आणि कसा नामशेष होणार? शास्त्रज्ञांनी दिली मोठी माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 15:12 IST

शास्त्रज्ञांनी मानवाच्या नामशेष होण्याची भविष्यवाणी केली आहे.

आतापर्यंत पृथ्वीवरुन हजारो-लाखो प्राणी नामशेष झाले आहेत. दरम्यान, आता मानवाच्या नामशेषाचा मुद्दाही शास्त्रज्ञांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. शास्त्रज्ञांनी मानव नष्ट होण्याची शक्यता वर्तवली आहे. आपल्या भविष्यवाणीत त्यांनी याचे कारण आणि वर्षाची माहितीदेखील दिली आहे. इंग्लंडच्या ब्रिस्टर युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात हा दावा केला आहे.

संशोधकांचे म्हणणे आहे की, पुढील 250 मिलियन वर्षांत मानव आणि इतर सर्व सस्तन प्राणी नामशेष होतील. हवामान बदलाचा परिणाम समजून घेऊन वैज्ञानिकांनी त्यावर आधारित एक मॉडेल तयार केले आहे, ज्याच्या मदतीने मानव आणि इतर सस्तन प्राणी पृथ्वीवर किती काळ टिकतील, हे सांगण्यात आले आहे.

नामशेष होण्याचे कारणसंशोधक अलेक्झांडर फर्न्सवर्थ यांच्या मते, पृथ्वीवरील मानव आणि इतर सस्तन प्राण्यांना 40 ते 70 अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागेल. जर आपण भविष्याकडे पाहिले तर ते अंधकारमय असेल, कारण कार्बन डायऑक्साइडची पातळी सध्याच्या पातळीपेक्षा दुप्पट होऊ शकते. मानव आणि इतर प्रजाती उष्णतेशी लढण्यास आणि शरीराला थंड ठेवण्यास असमर्थ होतील.

परिस्थिती का आणि कशी बिघडणार?संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, पृथ्वी एक महाखंड बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पुढील 250 वर्षांत केवळ 8 ते 16 टक्के क्षेत्रच राहण्यासयोग्य असेल. ते Pangea Ultima म्हणून ओळखले जाईल. येथील तापमान झपाट्याने वाढेल. आर्द्रतेचा परिणाम दिसून येईल. जगभरातील तापमान किमान 15 अंशांनी वाढेल. भविष्यात पृथ्वी राहण्यास योग्य असणार नाही. 

अहवालात म्हटले आहे की, केवळ त्याच प्रजाती टिकून राहतील, ज्या तापमानाच्या प्रभावापासून स्वतःला दूर ठेवण्यास सक्षम असतील. हवामान बदलावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, सरकारांनी हवामान बदलाच्या सर्वात वाईट परिस्थितीशी संबंधित परिणामांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तापमान अपेक्षेपेक्षा जास्त वाढले, तर पृथ्वीवरील सर्व मानवी जीवन संपण्याची शक्यताही वाढेल. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सDeathमृत्यूEarthपृथ्वी