शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
2
काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
3
वेदा‍ंता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन
4
अमेरिका-रशियात तणाव वाढला! व्हेनेझुएलाहून जाणारा रशियन तेल टँकर US नौदलाने जप्त केला
5
उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
6
मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
7
मासेमारी करताना समुद्रात पडला खलाशी; ४ दिवसांनी मध्यरात्री 'असं' काय घडलं, कुटुंबाला बसला शॉक
8
पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
9
"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट
10
Maharashtra Government: सर्व पक्षांच्या प्रतोदांची पॉवर वाढली! आता थेट मंत्रिपदाचा दर्जा; अलिशान सुविधाही मिळणार
11
रक्षकच बनला भक्षक! चालत्या गाडीत पोलिस निरीक्षकाचा 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
12
Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ४ जण ठार, ६ गंभीर जखमी
13
Shirdi Crime: 'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक; सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात दहशतवाद्यांना घेरले
15
AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
16
Plastic Water Bottle: गाडीत ठेवलेल्या बाटलीतील पाणी पिता का? तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा!
17
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
18
"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले
19
किंग कोहलीभोवती चाहत्यांचा गराडा; 'विराट' गर्दीतून कसा बसा कारपर्यंत पोहोचला! व्हिडिओ व्हायरल
20
बापाचे काबाडकष्ट! १५ वर्षे दोन नोकऱ्या करून लेकीला दिलं शिक्षण; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील एक असं रेल्वे स्टेशन, जिथे रविवारी रेल्वेचा हॉर्न वाजत नाही, पाहा नेमकं कारण आणि कोणतं आहे स्टेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:04 IST

Railway Interesting Facts : एका अशा रेल्वे स्टेशनबाबत आज आपण जाणून घेणार आहोत, जिथे रविवारी रेल्वेचा हॉर्न वाजवला जात नाही. चला तर मग पाहुयात यामागचं कारण काय आहे.

Railway Interesting Facts: भारतीय रेल्वे दिवसेंदिवस आधुनिक सोयी-सुविधा वाढवण्यावर भर देत आहे. भारतीय रेल्वेने आतापर्यंत अनेक आव्हानात्मक कामे केली आहेत. ज्यामुळेच भारतीय रेल्वे जगातील सगळ्यात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. देशभरात रेल्वे स्टेशनांचा विस्तार, जुन्या रेल्वे स्टेशनांचा चेहरामो-मोहरा बदलून टाकला आहे. पण आजही असे काही रेल्वे स्टेशन असे आहेत, जे जुन्या दिवसांची आठवण करून देतात. एका अशाच रेल्वे स्टेशनबाबत आज आपण जाणून घेणार आहोत, जिथे रविवारी रेल्वेचा हॉर्न वाजत नाही. चला तर मग पाहुयात यामागचं कारण काय आहे.

रेल्वे सेवा आणि रविवार अनेकदा असं बघितलं जातं की, रविवारी काही रेल्वे उशिराने येतात किंवा कॅन्सल होतात. त्यामुळे रविवारी रेल्वेने प्रवास करण्याआधी रेल्वेचं स्टेटस आधी चेक करणं गरजेचं मानलं जातं. कारण भारतीय रेल्वेकडून दर रविवारी ट्रॅकच्या दुरूस्तीचं काम करण्यासाठी मोठे ब्लॉक घेतले जातात. ज्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर याचा प्रभाव पडतो. पण या ब्लॉकचा उद्देश इतर दिवसांमध्ये सेवा सुरळीत मिळावी हा असतो.

कोणत्या स्टेशनवर रविवारी हॉर्न वाजत नाही?

भारतात एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथे रविवारी रेल्वे हॉर्न किंवा शिटी वाजत नाही. हे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यात आहे. रिपोर्ट्सनुसार, वर्धमानपासून साधारण ३५ किलोमीटर अंतरावरील या स्टेशनवर केवळ बांकुडा-मासाग्राम पॅसेंजर रेल्वे थांबते, पण रविवारी ही रेल्वे सुद्धा येत नाही आणि स्टेशनवर पूर्णपणे पिन ड्रॉप सायलेन्स राहतो, म्हणजे ना रेल्वेचा हॉर्न वाजत ना कोणती सूचना दिली जात.

रविवारी स्टेशन बंद का असतं?

रविवारी स्टेशन मास्टरला रेल्वेचे तिकीट खरेदी करण्यासाठी वर्धमान शहरात जावं लागतं. त्यामुळेच स्टेशनवर तिकीट काउंटर आणि सगळ्या सेवा या दिवशी बंद राहतात. या स्टेशनचं आणखी एक वेगळेपण म्हणजे या स्टेशनला नावच नाहीये. नाव नसूनह सुद्धा हे स्टेशन प्रवाशांसाठी खूप महत्वाचं ठरतं. कारण हे स्टेशन बांकुडा आणि मासाग्राम दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाचा दुवा आहे. स्थानिक लोक दावा करतात की, असे छोटे स्टेशन आधई दूर राहणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी बनवले जात होते.

पहाटे ३ वाजता रेल्वेचा हॉर्न का वाजतो?

रिपोर्ट्सनुसार, रेल्वेचा हॉर्न पहाटे ३ वाजताही प्रामुख्याने सुरक्षेच्या कारणांसाठी वाजवला जातो. उदा. रुळांवर असलेली माणसं किंवा प्राणी यांना सावध करण्यासाठी, लेव्हल क्रॉसिंग ओलांडताना, स्टेशनवरून निघताना आवश्यक सिग्नल देण्यासाठी. रात्री किंवा पहाटे अनेकदा लोक किंवा प्राणी अनवधानाने रुळांच्या जवळ असतात. अशावेळी हॉर्न त्यांना सावध करतो आणि सुरक्षित अंतर ठेवण्याचा इशारा देतो. मुख्यपणे लोको पायलटला नियंत्रण ठेवायचे असेल किंवा एखादी आपत्कालीन स्थिती असेल, तर हॉर्न देणे अत्यावश्यक ठरते.

हॉर्न वाजवण्याची इतर मुख्य कारणे समजून घ्या

रात्री किंवा पहाटे रुळांच्या जवळ माणसं किंवा प्राणी (हत्ती, जनावरे इ.) असू शकतात. हॉर्नमुळे अपघात टळतो. ज्या ठिकाणी फाटक नसलेली लेव्हल क्रॉसिंग असते, तिथे हॉर्न वाजवणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. लोको पायलट आणि गार्ड यांच्यातील संवादासाठी हॉर्न वापरला जातो. उदा. तीन छोटे हॉर्न = आपत्कालीन स्थिती, तर इतर पॅटर्न ब्रेक चेक किंवा रेल्वे सुरू करण्यासाठी असतात. स्टेशनवरून निघण्यापूर्वी गार्डला सिग्नल देण्यासाठीही हॉर्न वाजवला जातो.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian Railway Station: No Horns on Sundays, Know the Reason

Web Summary : West Bengal's unnamed station sees no train horns on Sundays. The station master travels to purchase tickets, halting services. This station connects Bankura and Masagram, aiding remote travelers. Horns prevent accidents, signal crossings, and communicate between crew.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सIndian Railwayभारतीय रेल्वेJara hatkeजरा हटके