शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील सीमेवरील गावात गुजरातची घुसखोरी; सीमांकन हळूहळू वाढवत असल्याचा स्थानिकांचा दावा
2
लुथरा बंधूंचे थायलंडमधून फोटो आले, पासपोर्टसह घेतले ताब्यात; कारवाईपासून वाचण्यासाठी पळाले खरे पण...
3
पुढील वर्षात १ तोळा सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? ब्रोकरेज फर्मने सांगितला मोठा आकडा
4
Gold Silver Price Today: यावर्षी सोनं ₹५२,७९५ आणि चांदी ₹१००९३६ रुपयांनी महागली; आजही दरानं तोडले सर्व विक्रम, पाहा किंमत
5
व्हॉट्सअप चॅट्स वाचण्यासाठी...! डीएसपी 'कल्पना वर्मा' यांच्या 'लव्ह ट्रॅप' प्रकरणात 'Love U यार...' ची एन्ट्री...
6
Geminid Meteor Shower: १३,१४ डिसेंबर ठरणार इच्छापूर्तीची रात्र; आकाशाकडे बघून करा 'हे' काम!
7
'एसी-थ्री टियर'मध्ये प्रवाशासोबत कुत्रा! रेल्वेतून नेता येतो का? व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे 'सेवा' झाली सक्रिय
8
३ महिन्यांतच गमावलेलं दुसरं बाळ, पहिल्यांदाच व्यक्त झाली सुनीता अहुजा, म्हणाली- "तिला श्वास घ्यायला त्रास व्हायचा..."
9
म्यानमारमध्ये गृहयुद्धामुळे हाहाकार; रुग्णालयातील एअर स्ट्राईकमध्ये ३० जणांचा मृत्यू, ७० जखमी
10
अमेरिकेच्या संसदेत मोदी-पुतिन यांच्या 'त्या' फोटोवर खळबळ; महिला खासदाराचा ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावर हल्लाबोल
11
FD चे व्याजदर कमी झाल्याने बॉन्डमध्ये गुंतवणूक करताय? 'हे' ५ मोठे धोके तुम्हाला माहीत असायलाच हवेत
12
"इथं येऊन तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर..."; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
सीसीटीव्ही फोटो, व्हायरल व्हॉट्सअॅप चॅट्स; DSP कल्पना वर्मांनी सांगितलं मूळ प्रकरण काय?
14
सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून विराट-रोहितचं होणार डिमोशन? BCCI देणार मोठा धक्का, तर ‘या’ खेळाडूंना मिळणार प्रमोशन
15
"मला गुन्हा कबूल नाही." राज ठाकरेंचं कोर्टात उत्तर; न्यायाधीश म्हणाले, सहकार्य करा, काय घडलं?
16
ठंडा-ठंडा, कूल-कूल! मुंबई माथेरानपेक्षा थंड, राज्यातील बहुतांशी शहरं १० अंशावर
17
Mumbai Airport: मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल, 'या' विमानांत स्फोटकं, दर अर्ध्या तासाला उडवून देणार!
18
भयंकर! पूर्वांचल एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात; कॉन्स्टेबलच्या कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
'धुरंधर' पाहून भारावला हृतिक रोशन; म्हणाला, "सिनेमाचा विद्यार्थी म्हणून खूप काही शिकलो..."
20
"पाकिस्तानात मॉल कुठून आला?", 'धुरंधर'मधील 'ती' चूक नेटकऱ्यांनी पकडली, व्हिडीओ होतोय व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सुर्य गोठण्याची शक्यता, नासाच्या शास्त्रज्ञांनी दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 18:08 IST

सूर्य ज्या प्रकारे प्रज्वलित होत आहे, त्यानुसार एक दिवस असा येईल जेव्हा सूर्य जळून राखेचा एक थंड गोळा होईल. येत्या ५ अब्ज वर्षांत ही वेळ येईल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

सूर्याशिवाय (The Sun) आपल्या विश्वाची कल्पनाच करणं शक्य नाही. सूर्य हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत (Source of Energy) मानला जातो. सूर्य नसता तर या जीवसृष्टीची निर्मितीच झाली नसती. पृथ्वीवरची (The Earth) सर्व जीवसृष्टी आपल्या अस्तित्वासाठी सूर्यावरच अवलंबून आहे. मानवाला सूर्याच्या ऊर्जेचे अनेक फायदे मिळतात. दररोज सूर्यप्रकाशात फिरल्यामुळे शरीराला अत्यावश्यक असणाऱ्या व्हिटॅमिन डीची (Vitamin D) पूर्तता होते. त्यामुळे अनेक आजारांपासून माणूस दूर राहू शकतो. तसंच वीजनिर्मितीतही सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा मोठा वाटा आहे. हाच सूर्य एक दिवस नाहीसा झाला तर? कधी कोणी कल्पना केली आहे?

अत्यंत भीतिदायक अशी ही कल्पना आहे. सूर्य नाही म्हणजे सर्वत्र अंधार. जीवसृष्टीच्या ऱ्हासाची ती सुरुवात असेल. शास्त्रज्ञांनी हीच भीती व्यक्त केली आहे. सध्या सूर्य ज्या प्रकारे प्रज्वलित होत आहे, त्यानुसार एक दिवस असा येईल जेव्हा सूर्य जळून राखेचा एक थंड गोळा होईल. येत्या ५ अब्ज वर्षांत ही वेळ येईल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. आता सूर्य मधल्या टप्प्यात आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

स्मिथसॉनियन अस्ट्रोफिजिकल ऑब्झर्व्हेटरी (Smithsonian Astrophysical Observatory), हार्वर्ड कॉलेज ऑब्झर्व्हेटरी (Harvard College Observatory) आणि सेंटर फॉर अस्ट्रोफिजिक्सच्या ( Centre for Astrophysics) शास्त्रज्ञांनी याबाबत सखोल संशोधन केलं असून, सूर्यामध्ये होणाऱ्या अणुविघटन प्रक्रियेच्या आधारे त्यांनी हा निष्कर्ष नोंदवला आहे.

या प्रकल्पावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञ पाओला टेस्टा यांच्या मते, 'ही गणना अणूच्या विघटन प्रक्रियेच्या आधारे करण्यात आली आहे. जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याचं गूढ विज्ञानाला (Science) आजही उलगडलेलं नाही. १९३० पूर्वी असं मानलं जात होतं, की सूर्याची शक्ती गुरुत्वाकर्षण (Gravitational force) शक्तीपासून येते; पण आता आपल्याला अणुऊर्जेची (Atomic Energy) माहिती मिळाली आहे. सूर्य त्याच्या अणुऊर्जेमुळे जळतो. ज्या दिवशी ही ऊर्जा संपेल त्या दिवशी सूर्याचाही अंत होईल.'

नासा या अमेरिकेतल्या अंतराळ संशोधन संस्थेने (NASA) म्हटल्याप्रमाणे, सूर्य हा आपल्या सौरमालेचा केंद्रबिंदू असला तरी प्रत्यक्षात विश्वात अनेक मोठे तारे आहेत. सूर्यापेक्षा १०० पट मोठे अनेक तारे सापडले आहेत; मात्र ज्या दिवशी सूर्य संपेल, त्या दिवशी पृथ्वीही संपेल. अर्थात हे व्हायला अजून ५ अब्ज वर्षं बाकी आहेत, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. तेव्हा कोण पृथ्वीवर असेल माहिती नाही. त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही; मात्र सूर्याविना पृथ्वीवरचं जीवन शून्य आहे. त्यामुळे सूर्य संपेल तेव्हा पृथ्वीही संपेल हे नक्की.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके