शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

...तरीही जिद्द सोडली नाही! एकेकाळी भीक मागणारा मुलगा आज कोट्याधीश झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 12:44 IST

रेणुका यांचा जन्म बंगळुरु येथील एनेकाल तालुक्यातील गोपासंद्र गावात झाला. त्यांचे वडील राज्य सरकारकडून नियुक्त केलेल्या स्थानिक मंदिराचे पुजारी होते

मुंबई – मेहनत आणि जिद्द असली की यशाचं शिखर गाठण्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागत नाही, प्रत्येकाचं नशीब बदलतं असतं पण त्यासाठी त्याला मेहनतीची जोड असावी लागते. लहानपणी भिक्षा मागून खाणारा मुलगा आज कोट्यवधीच्या कंपनीचा मालक बनला आहे हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ही यशाची कहाणी आहे रेणुका आराध्य यांची, ते प्रवासी कॅब प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक आहेत.

रेणुका यांचा जन्म बंगळुरु येथील एनेकाल तालुक्यातील गोपासंद्र गावात झाला. त्यांचे वडील राज्य सरकारकडून नियुक्त केलेल्या स्थानिक मंदिराचे पुजारी होते. मात्र त्यांना कोणतंही आर्थिक मानधन दिलं जात नव्हतं. आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी रेणुका आराध्यच्या वडिलांना आसपासच्या गावात भिक्षा मागावी लागत असे, त्यांच्या या कामात रेणुकानेही साथ दिली. भिक्षेमध्ये लोकांनी दिलेल्या अन्नधान्यावर त्यांचे कुटुंब जगत होते.

घरची हालाखीची परिस्थिती असल्याने रेणुका यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. त्यानंतर त्याच्या वडिलांना रेणुकाला एका वृद्ध व्यक्तीची सेवा करण्याचं काम दिलं. जवळपास एक वर्ष हे काम सुरु होतं. त्यानंतर रेणुकाला एका आश्रमात टाकण्यात आले. ज्याठिकाणी त्याला दिवसातून दोनदा जेवण दिलं जात असे, सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान त्यांना जेवण मिळत असे, पण याच आश्रमात त्यांच्या डोक्यात काहीतरी करण्याची जिद्द निर्माण झाली. दहावीत शिकत असताना वडिलांचे निधन झाले त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी रेणुकावर आली. यावेळी त्यांनी शिक्षण सोडून विविध कंपन्यांमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली.

३ वर्ष वेगवेगळ्या कंपनीत काम करत असताना त्यांच्या डोक्यात काहीतरी सुरु करण्याचा विचार घोंगावत होता. अशातच त्यांनी सुटकेस, वॅनिटी बॅग बनवण्याचा उद्योग सुरु केला. मात्र काही काळानंतर हा उद्योग बंद पडला. गुंतवणूक केलेले सर्व पैसे बुडाले. त्यानंतर मोठ्या भावाने ६०० रुपये पगारावर एका ठिकाणी सुरक्षा गार्ड म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पण घरची जबाबदारी आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांनी ड्रायव्हर बनण्याचं निश्चित केले. लग्नाची अंगठी विकून त्यांनी वाहन शिकवण्याचं प्रशिक्षण घेतले. त्यानंतर एके ठिकाणी नोकरी करत त्यांनी मृतदेह वाहतूक करण्याचं काम सुरु केले. निष्ठा आणि जिद्द या जोरावर त्याने ग्राहकांसोबत संबंध चांगले ठेवले. काही पैसे जमवल्यानंतर त्यांनी २००१ मध्ये सिटी सफारी म्हणून कंपनीची सुरुवात केली.

बँक लोन घेऊन त्यांनी इंडिका गाडी खरेदी केली, त्यानंतर दीड वर्षाच्या काळात दुसरी गाडी खरेदी केली. हळूहळू गाड्यांच्या संख्येत वाढ झाली. त्यानंतर इंडियन सिटी टॅक्सी नावाची कंपनी विकत आहे अशी माहिती त्याला मिळाली. ही संधी न सोडता रेणुकाने सर्व गाड्या विकून, मार्केटमधून उधारी घेऊन ही कंपनी खरेदी करण्याची जोखीम पत्करली. यानंतर त्यांनी आपल्या आयुष्यात कधीच मागे वळून पाहिलं नाही.

त्यांची प्रवासी कॅब प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नावारुपाला आली. एकेकाळी ४ गाड्या असताना आज त्याची संख्या ३०० झाली आहे. बंगळुरुनंतर चेन्नई येथे त्यांनी आपली शाखा उघडली आहे. एमेझोन, गुगल, वॉलमार्ट, जनरल मोटर्ससारख्या बड्या कंपन्या त्यांच्या ग्राहक आहेत. ग्राहकांशी चांगले संबंध आणि विश्वास कमावल्यामुळे ओला, उबेरसारख्या कंपन्यांनाही आजतागायत त्यांनी मागे ठेवले आहे. त्यांच्या कंपनीत १ हजारपेक्षा जास्त लोक काम करतात. वर्षाला ४०-५० कोटींची आर्थिक उलाढाल होते. त्यामुळे तुम्हीही लक्षात ठेवा, अपयश आलं म्हणून खचून न जाता त्यावर मात करून यश गाठण्याचं स्वप्न बाळगा, नक्कीच यश मिळेल.   

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी