शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

जेव्हा शैतान सिंह यांच्या नेतृत्वातील १२४ भारतीय जवानांनी १३०० चीनी सैनिकांचा केला होता खात्मा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 2:23 PM

१८ नोव्हेंबर १९६२ या दिवशी देशाचे वीर मेजर शैतान सिंह भाटी शहीद झाले होते. शैतान सिंह हे एक लढवय्ये होते की, ज्यांच्या नेतृत्वातील १२० भारतीय जवानांनी १३०० चीनी सैनिकांचा खात्मा केला होता.

(Image Credit : bhaskar.com)

१८ नोव्हेंबर १९६२ या दिवशी देशाचे वीर मेजर शैतान सिंह भाटी शहीद झाले होते. शैतान सिंह हे एक लढवय्ये होते की, ज्यांच्या नेतृत्वातील १२० भारतीय जवानांनी १३०० चीनी सैनिकांचा खात्मा केला होता. आजपासून ५७ वर्षांपूर्वी कंपनी कमांडर शैतान सिंह यांनी रेजांगलामधील युद्धात केवळ लडाखला वाचवले नाही तर चीनला मात देऊन आपलं नाव नेहमीसाठी इतिहासाच्या पानांवर अमर केलं.

लडाखच्या चुशूल घाटीची जबाबदारी १३ कुमाऊंच्या एक तुकडीकडे होती. १२४ जवानांच्या या तुकडीचं नेतृत्व मेजर शैतान सिंह करत होते. शैतान सिंहाकडे जवान कमी होते. पण त्यांच्याकडे ध्येर्य कमी नव्हतं. १८ नोव्हेंबर १९६२ ला लडाखच्या चुशुल घाटीवर बर्फाची चादर पसरलेली होती. सगळीकडे शांतता होती. भारतीय जवान नेहमीप्रमाणे आपापल्या जागी तैनात होते. अशाच अचानक तोफांचा धमाका झाला.

(Image Credit : bhaskar.com)

चीनच्या पीपुल्स लिबरेशन आर्मीच्या जवळपास ५ ते ६ हजार जवानांनी हल्ला केला होता. यादरम्यान शैतान सिंह यांनी हुशारी दाखवत आपल्या जवानांना सतर्क केलं. जवान कमी असूनही शैतान सिंह यांनी जीवाची पर्वा न करता चीनी जवानांचा सामना केला. चीनकडून भारतीय जवानांवर गोळ्यांचा मोठ्या प्रमाणाच हल्ला चढवला, पण भारतीय जवान डगमगले नाही.

चीनकडून लागोपाठ होत असलेल्या फायरिंगमुळे शैतान सिंह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आपल्या जवानांना प्रोत्साहन देत होते. यादरम्यान शैतान सिंह यांनी जवानांना चीनी सैनिकांवर हलका गोळीबार करण्यास आणि त्यांना गुंतवून ठेवण्यास तसेच त्यांचा गोळा-बारूद संपेपर्यंत वाट बघण्याचा आदेश दिला. जवानांनी तसंच केलं.

(Image Credit : bhaskar.com)

जेव्हा चीनी सैनिकांचा गोळा-बारूद कमी झाला तेव्हा शैतान सिंह यांच्या तुकडीने चीनी जवानांवर जोरदार हल्ला केला. भारतीय जवानांनी आपलं शौर्य दाखवत चीनच्या १३०० चीनी जवानांचा खात्मा केला. पण यादरम्यान ३ कुमाऊं बटालियनच्या ११४ जवानही शहीद झाले. यात शैतान सिंह यांचाही समावेश होता.

(Image Credit : thelallantop.com)

भारतीय सैनिकांसमोर यावेळी केवळ चीनचे मोठ्या प्रमाणातील सैनिक नव्हते, तर भौगोलिक परिस्थिती आणि बर्फाची समस्या देखील होती. तरी सुद्धा भारतीय सैनिकांनी चीनच्या सेनेसोबत दमदार मात दिली. १८ हजार फूट उंच पोस्टवर झालेल्या या युद्धात भारतीय सैनिकांच्या शौर्यासमोर चीनी सैनिकांनी हार मानली होती.

(Image : jagran.com)

लडाखला वाचवण्यासाठी रेजांगला पोस्टवर दाखवलेल्या शौर्यासाठी भारत सरकारने कंपनी कमांडर मेजर शैतान सिंह यांना मरणोत्तर परमवीर चक्र पुरस्काने सन्मानित केले. याच बटालियनमधील ८ जवानांना 'वीर चक्र', तर ४ जवानांना 'सेना मेडल' आणि एका जवानाला 'मॅंशन इन डिस्पेच'ने सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीनladakhलडाखInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स