शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पाठवणी झाल्यावर तासाभरात नवरीला घेऊन वरात मागे फिरली; कुटुंबियांची धाकधूक वाढली; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 7:06 PM

पाठवणीनंतर वरात मुलीच्या घरातून निघाली; पण तासाभरानं वरात माघारी परतली

शिमला: लग्न सोहळा आटोपल्यावर मुलीकडच्यांकडून मुलीला निरोप दिला जातो. त्यानंतर मुलगी वरातीसह सासरी जाण्यास निघते. पण नवऱ्यासह तासाभरापूर्वी कुटुंबियांचा निरोप घेऊन गेलेली मुलगी संपूर्ण वरातीसह परत आली तर..? हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये असा प्रकार घडला आहे. संपूर्ण वरात माघारी आल्यानं कुटुंबाला धक्का बसला. सगळ्यांची धाकधूक वाढली. पण वरात माघारी फिरण्याचं कारण समजताच सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. सध्या या घटनेची सोशल मीडियात खूप चर्चा आहे.

मंडी जिल्ह्यातल्या रोपा गावात एक विवाह सोहळा संपन्न झाला. साग्रसंगीत लग्न झाल्यावर सगळे रिती रिवाज पूर्ण करून नवदाम्पत्याची पाठवणी करण्यात आली. संध्याकाळ झाली असल्यानं लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी घरातल्या सामानाची आवराआवर सुरू केली. वरात गावातून निघून जवळपास तास उलटला होता. तितक्यात संपूर्ण वरात गावी परत आली. वरात माघारी फिरल्यानं मुलीच्या कुटुंबाला धक्काच बसला. त्यानंतर वरातीतल्या मंडळींनी रस्त्यात घडलेला संपूर्ण प्रकार मुलीकडच्यांना सांगितला आणि त्यांच्या जीवात जीव आला. 

नवरा नवरीला आणि वरातीला घेऊन त्याच्या घरी परतत असताना बल्ह भागात भूस्खलन झालं. त्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला. मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं रस्ता सुरू करण्यात अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे वाहतूककोंडी झाली. त्यामुळे वरातीतल्या मंडळींनी मुलीच्या घरी परतण्याचं ठरवलं. वरात अचानक माघारी आल्यानं मुलीकडच्यांना त्यांची व्यवस्था कशी करायची असा प्रश्न पडला. मात्र ग्रामस्थ त्यांच्या मदतीला धावले. त्यांना संपूर्ण वऱ्हाडाची उत्तम व्यवस्था केली.