शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

भन्नाट! कोरोनामुळं Google Meet वर लग्नसोहळा; ४५० पाहुण्यांना Zomato वरुन मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 19:45 IST

कोरोना काळात काही ठिकाणी व्हर्चुअलच्या माध्यमातून लग्न केले जात आहेत. पश्चिम बंगालमध्ये एका जोडप्याने लग्नासाठी तब्बल ४५० लोकांना आमंत्रित केले आहे.

गेल्या २ वर्षापासून कोरोना व्हायरसमुळे अनेक सोहळ्यांवर निर्बंध आले आहे. कोरोनामुळे गर्दी करु नये, सोशल डिस्टेसिंगचं पालन करावं अशी वारंवार सूचना सरकारकडून केली जातेय. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी विवाह सोहळे इतर समारंभावर निर्बंध आणले. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पाडावा लागत आहेत. त्यात काही मंडळ या निर्बंधामध्ये हटके पर्याय निवडत आहेत.

कोरोना काळात काही ठिकाणी व्हर्चुअलच्या माध्यमातून लग्न केले जात आहेत. पश्चिम बंगालमध्ये एका जोडप्याने लग्नासाठी तब्बल ४५० लोकांना आमंत्रित केले आहे. आता तुम्ही म्हणाल कोरोना काळात इतक्या लोकांना लग्नाला बोलवण्याची गरज काय? पण थांबा, या जोडप्याने कोरोनाचा भान राखत व्हर्चुअल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लग्न करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे कोरोनाच्या कुठल्याही निर्बंधांचे उल्लंघन होणार नाही याची खात्री आहे.

कोरोनामुळे पश्चिम बंगालमध्ये लग्नासाठी केवळ २०० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु सदीपन सरकार आणि आदिती दास या जोडप्याने लोकांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. संदीपन आणि आदितीनं लग्नसोहळा हटके करण्याच्या प्रयत्नात ४५० जणांना गुगल मिटद्वारे लग्नात उपस्थित राहण्याचं आमंत्रण धाडलं आहे.

येत्या २४ जानेवारीला हे जोडपे लग्न करणार असून लग्नाबाबत संदीपननं न्यूज १८ शी संवाद साधला. तेव्हा तो म्हणाला की, मागील वर्षभरापासून आम्ही लग्न करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. परंतु कोरोनामुळे ते शक्य झालं नाही. अलीकडेच मलाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली. त्यामुळे आपल्या लग्नात कुणाचाही जीव धोक्यात घालायचा नाही असा चंग संदीपननं बांधला. त्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत Google Meet लिंक पाठवून पाहुण्यांना लग्नात उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं आहे.

इतक्यावरच संदीपन आणि आदिती थांबले नाहीत तर लग्नात उपस्थित राहणाऱ्या ४५० पाहुण्यांना ई मेजवाणीही दिली जाणार आहे. आता ई मेजवाणी हा काय प्रकार आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. लग्नाची गुगल लिंक पाठवून पाहुण्यांना उपस्थित राहता येईल मग मेजवानी कशी द्यायची असा विचार सुरु झाला. तेव्हा व्हर्चुअल पद्धतीने एकाच वेळी सर्व पाहुण्यांना जेवणाची डिलिव्हरी होणार आहे. त्यासाठी या जोडप्याने फूड डिलिव्हरी App झोमॅटोची मदत घेतली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये सध्या या हटके लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या