शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

लग्नानंतर नवरीला घेऊन निघाला, अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरला; कारण वाचून बसेल धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 09:36 IST

Marriage Weird News : लग्नानंतर नवरदेव त्याच्या नवरीला घरी घेऊन जात होता. पण अचानक रस्त्यातून तो नवरीच्या घरी परत आला. त्यानंतर जे झालं ते वाचून बसेल धक्का.

Marriage Weird News : सध्या सगळीकडे लग्नाचा सीझन सुरू आहे. अशात लग्नात घडणाऱ्या अनेक अजब घटना रोज समोर येतात. ज्या वाचून सगळेच हैराण होतात. अशीच एक अजब घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या आजमगढमधून लग्नाबाबत एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. लग्नानंतर नवरदेव त्याच्या नवरीला घरी घेऊन जात होता. पण अचानक रस्त्यातून तो नवरीच्या घरी परत आला. त्यानंतर जे झालं ते वाचून बसेल धक्का.

नवरदेवाला लग्नात सोन्याची अंगठी आणि चेन मिळाली नाही म्हणून तो नाराज होता. सासरी परत गेल्यावर त्याचा सासरच्या लोकांसोबत वाद झाला. इतकंच नाही तर हे लग्न मोडण्याच्या बदल्यात नवरीकडील लोकांनी लग्नाचा पूर्ण खर्च मागितला. यानंतर नवरीकडील लोकांनी गिफ्ट म्हणून दिेलेल्या सर्व वस्तू ठेवून घेतल्या आणि नवरदेव व त्याच्या वडिलाला बंधक बनवलं. घटनेची सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि चौकशी सुरू केली. सध्या या घटनेची सगळीकडे चर्चा सुरू आहे. 

असं सांगण्यात आलं की, तुरकवली गावातून वरात आली होती. वरात साधारण 9 वाजता आलमपूर इथे पोहोचली आणि मोठ्या जल्लोषात वरातीचं स्वागत करण्यात आलं. रात्री उशीरा सगळे रितीरिवाज पार पडले. पण सोन्याची अंगठी आणि चेन न मिळाल्याने मुलगा नाराज होता. शेवटच्या एका रिवाजासाठी तो नवरीच्या घरात गेला नाही. तो गाडीमध्येच बसून होता. अशात नवरी त्याच्यासोबत बसून सासरी निघाली.

अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यावर अंगठी आणि चेन न मिळाल्याने तो चिडचिड करत होता. सासरच्या लोकांना फोन करून त्याने सांगितलं की, तो नवरीसोबत सासरी परत येत आहे. त्यानंतर तिथे पोहोचून तो अंगठी आणि चेनची डिमांड करू लागला. यामुळे दोन्हीकडील लोकांमध्ये वाद झाला. अशात नवरीनेही सासरी जाण्यास नकार दिला.

दरम्यान वाद इतका वाढला की, नवरीकडील लोकांनी नवरदेव आणि त्याच्या वडिलाला बंदी बनवलं. अशात मुलीकडील लोकांनी हे नातं तोडण्यासाठी लग्नात खर्च झालेल्या 6 लाख रूपयांची डिमांड केली. पण या घटनेची सूचना पोलिसांना मिळाली आणि त्यांनी दोन्हीकडील लोकांना पोलीस स्टेशनला नेलं.

पंचायत झाल्यानंतर देवाण-घेवाण करण्यात आलेल्या वस्तू परत घेतल्या गेल्या. यात ठरल्यानुसार लग्नात खर्च झालेले 1 लाख 95 हजार रूपये नवरीकडील लोकांना परत केले. यानंतर हे लग्न मोडण्यात आलं. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटकेmarriageलग्न