शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

अक्कल दाढ आल्याने खरंच अक्कल वाढते का? संशोधकांनी दिलं मजेशीर उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 15:11 IST

खरंच अक्कल दाढ आल्यावर अक्कल येते का? तुम्हाला काय वाटतं? संशोधकांनी मात्र याचं उत्तर दिलं आहे. अन् ते उत्तर मजेशीर आहे.

दात म्हणजे तुमच्या व्यक्तीमत्वाचा आरसा आहेत. सुंदर दातांमुळे तुमचे हास्य अधिक आकर्षक होते. दातांबाबत अनेक समज गैरसमज आहेत. काहीजण असं म्हणतात की अक्कल दाढ आली की अक्कल येते. असं बरेचदा एखाद्याची मस्करी करतानाही म्हटलं जातं. पण खरंच अक्कल दाढ आल्यावर अक्कल येते का? तुम्हाला काय वाटतं? संशोधकांनी मात्र याचं उत्तर दिलं आहे. अन् ते उत्तर मजेशीर आहे.

जेव्हा माणसाला अक्कलदाढ येते, तेव्हा त्या व्यक्तीची बुध्दिमत्ता आणि विचार करण्याची क्षमता वाढते, असा सर्वसामान्य समज या दाढेविषयी दिसून येतो. अक्कलदाढ आल्यावर माणूस अधिक बुद्धिमान (Intelligent) होतो, असंही बोललं जातं. यावर संशोधकांनी संशोधन केलं असता, अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. अक्कलदाढ आल्यावर माणसाच्या हुशारीत वाढ होत नसल्याचं या संशोधनांमधून समोर आलं आहे. असं असतानाही आपल्याकडे अक्कलदाढेविषयी असलेला समज कायम आहे.

अक्कलदाढ येणं म्हणजे हुशारी, विचार करण्याची क्षमता वाढणं हा, समज पूर्णतः चुकीचा आहे. ही हिरडीच्या सर्वात शेवटच्या म्हणजे तोंडाच्या आतल्या भागात येत असल्याने प्रौढ व्यक्तींना तिची विशेष काळजी घ्यावी लागते. अक्कलदाढ आलेल्या भागात थोडाशी जरी समस्या निर्माण झाली तरी तिचे रुपांतर तीव्र वेदनांमध्ये होते.

'वेबएमडी'च्या रिपोर्टनुसार, अक्कलदाढ ही तिच्यासोबत अनेक समस्याही घेऊन येते. दरवर्षी अमेरिकेत (America) अक्कलदाढ काढून टाकण्यासाठी सुमारे एक कोटी शस्त्रक्रिया होतात. अक्कलदाढेमुळे अनेक समस्या निर्माण होतात. यात कॅव्हिटी, संसर्ग, दातांच्या आसपासचा भाग खराब होणं आणि हाडांमुळे आसपासच्या भागाचं नुकसान होणं आदी समस्यांचा समावेश आहे.

प्रत्येक प्रौढ व्यक्तीच्या तोंडात एकूण ३२ दात असतात. यात ४ (२ वरच्या बाजूस आणि २ खालच्या बाजूस) अक्कलदाढा येतात. चारही कोपऱ्यात अगदी शेवटी या दाढा येतात. या दाढा व्यक्तीला वयाच्या १७ ते २१ दरम्यान येत असल्याने त्यांचा संबंध समजूतदारपणा आणि बुध्दिमत्तेशी जोडला जातो. परंतु, अक्कलदाढेमुळे समजूतदारपणा, विचार करण्याची क्षमता किंवा बुध्दिमत्ता वाढत नसल्याचं संशोधनातून स्पष्ट झालं आहे, असं 'वेबएमडी'च्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

जर तुम्ही अक्कलदाढ काढून टाकली तर पहिल्या दिवशी रक्तस्त्राव (Bleeding) होण्याची शक्यता असते. तसंच काही काळ त्या भागात सूज जाणवते. अशा समस्या जाणवल्यास ब्रशने दात न घासण्याचा सल्ला दिला जातो. किमान २४ तास असं न करण्याचं सांगितलं जातं. पण या कालावधीत तुम्ही मिठाच्या पाण्याने गुळण्या करू शकता, असं या अहवालात म्हटलं आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सJara hatkeजरा हटके