शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

बोंबला! नवरीने दारात आलेली वरात परत पाठवली, कारण वाचून चक्रावून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 12:05 PM

अनेकदा दोन्ही परिवारातील काही वादामुळे लग्न मोडलं जातं. अशीच एक विचित्र कारण असलेली घटना समोर आली आहे.

अनेकदा वेगवेगळ्या विचित्र कारणांनी लग्न मोडल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. कधी काही सीरिअस कारण असतं तर कधी कधी कारण इतकं शुल्लक असतं की, डोकं चक्रावून जातं. अनेकदा दोन्ही परिवारातील काही वादामुळे लग्न मोडलं जातं. अशीच एक विचित्र कारण असलेली घटना समोर आली आहे. एका नवरीने घराच्या दारात आलेली वरात परत पाठवली. कारण नवरदेवाकडून दागिने दिले गेले नाही. 

उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधील पट्टी पोलीस क्षेत्रातील ही घटना आहे. मुलाकडून दागिने न मिळाल्यानं नवरीनं चक्क लग्नास नकार दिल्यामुळे नवरदेवाला दारातूनच आपली वरात माघारी घेऊन जावी लागली. हे इतक्यावरच थांबलं नाही. नंतर बोलवण्यात आलेल्या पंचायतमध्ये नवरदेवाकडील लोकांना लग्नाच्या जेवणासाठीच्या खर्चातील अर्धा खर्चही द्यावा लागला. (हे पण वाचा : काय सांगता! नव्या नवरीला पतीच्या घरात 'नो एन्ट्री'; नवदाम्पत्याचं घरासमोरच ठिय्या आंदोलन)

ही वरात सुल्तानपूरच्या मीरपूर क्षेत्रातील प्रतापूर येथून आली होती. वरातीमध्ये आलेल्या लोकांनी जेवणही केलं. यानंतर नवरदेवाकडून आणलेलं लग्नासाठीचं साहित्य नवरीच्या घरी पाठवण्यात आलं. इथेच सगळा गोंधळा झाला. मात्र, त्यात केवळ एकच दागिना होता. यावरूनच नवरीकडील मंडळी नाराज झाली. मग काय दोन्हीकडील मंडळीमध्ये वाद झाला. वाद इतका वाढला की, नवरीनं समोर येत लग्नाला नकार दिला. यानंतर वरात नवरीविनाच माघारी परतली.

गुरुवारी दोन्ही पक्षांमध्ये पंचायत झाली. यात नवरीकडच्या लोकांनी जेवणाच्या व्यवस्थेसाठी १.४० लाख रूपये खर्च झाल्याचे सांगितलं. यानंतर मुलाकडच्या लोकांनी यातील पन्नास टक्के खर्च देण्याचं ठरलं. यानंतर नवरदेवाच्या घरच्यांनी ६० हजार रुपये दिले. १० हजार नंतर देण्याचं सांगत ते निघून गेले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न