शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

बोंबला! नवरीने दारात आलेली वरात परत पाठवली, कारण वाचून चक्रावून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 12:05 IST

अनेकदा दोन्ही परिवारातील काही वादामुळे लग्न मोडलं जातं. अशीच एक विचित्र कारण असलेली घटना समोर आली आहे.

अनेकदा वेगवेगळ्या विचित्र कारणांनी लग्न मोडल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. कधी काही सीरिअस कारण असतं तर कधी कधी कारण इतकं शुल्लक असतं की, डोकं चक्रावून जातं. अनेकदा दोन्ही परिवारातील काही वादामुळे लग्न मोडलं जातं. अशीच एक विचित्र कारण असलेली घटना समोर आली आहे. एका नवरीने घराच्या दारात आलेली वरात परत पाठवली. कारण नवरदेवाकडून दागिने दिले गेले नाही. 

उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधील पट्टी पोलीस क्षेत्रातील ही घटना आहे. मुलाकडून दागिने न मिळाल्यानं नवरीनं चक्क लग्नास नकार दिल्यामुळे नवरदेवाला दारातूनच आपली वरात माघारी घेऊन जावी लागली. हे इतक्यावरच थांबलं नाही. नंतर बोलवण्यात आलेल्या पंचायतमध्ये नवरदेवाकडील लोकांना लग्नाच्या जेवणासाठीच्या खर्चातील अर्धा खर्चही द्यावा लागला. (हे पण वाचा : काय सांगता! नव्या नवरीला पतीच्या घरात 'नो एन्ट्री'; नवदाम्पत्याचं घरासमोरच ठिय्या आंदोलन)

ही वरात सुल्तानपूरच्या मीरपूर क्षेत्रातील प्रतापूर येथून आली होती. वरातीमध्ये आलेल्या लोकांनी जेवणही केलं. यानंतर नवरदेवाकडून आणलेलं लग्नासाठीचं साहित्य नवरीच्या घरी पाठवण्यात आलं. इथेच सगळा गोंधळा झाला. मात्र, त्यात केवळ एकच दागिना होता. यावरूनच नवरीकडील मंडळी नाराज झाली. मग काय दोन्हीकडील मंडळीमध्ये वाद झाला. वाद इतका वाढला की, नवरीनं समोर येत लग्नाला नकार दिला. यानंतर वरात नवरीविनाच माघारी परतली.

गुरुवारी दोन्ही पक्षांमध्ये पंचायत झाली. यात नवरीकडच्या लोकांनी जेवणाच्या व्यवस्थेसाठी १.४० लाख रूपये खर्च झाल्याचे सांगितलं. यानंतर मुलाकडच्या लोकांनी यातील पन्नास टक्के खर्च देण्याचं ठरलं. यानंतर नवरदेवाच्या घरच्यांनी ६० हजार रुपये दिले. १० हजार नंतर देण्याचं सांगत ते निघून गेले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न