शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

लग्नाच्या 20व्या दिवशी नवरीने प्रियकरासोबत राहण्याची मागितली परमिशन, नवरदेवाने दिली आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 09:05 IST

इथे नवरदेवाने लग्नाच्या 20व्या दिवशी नवरीचा हात तिच्या बॉयफ्रेंडच्या हातात दिला. चला जाणून घेऊ नवरदेवाने असं का केलं?

सध्या लग्नाचा सीझन सुरू असल्याने अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असतात. कुठे नवरी पळून जाते तर कुठे नवरदेव अजब कारणाने लग्नास नकार देतो. पण झारखंडच्या पलामूमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे नवरदेवाने लग्नाच्या 20व्या दिवशी नवरीचा हात तिच्या बॉयफ्रेंडच्या हातात दिला. चला जाणून घेऊ नवरदेवाने असं का केलं?

लग्न झाल्यावर सामान्यपणे नवरी आनंदात असते. तिच्या नव्या आयुष्याला सुरूवात झालेली असते. पण ही नवरी शांत आणि एकटी राहत होती. कुणाला भेटत नव्हती आणि कुणाशी बोलत नव्हती. पण लपून आपल्या प्रियकरासोबत बोलत होती. हे काही दिवसातच नवरदेवाला समजलं. त्याच्याही लक्षात आलं की, वडिलांचा मान ठेवण्यासाठी त्याने या मुलीशी लग्न तर केलं पण ती खूश नाहीये.

अशात लग्नाच्या 20व्या दिवशी ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून जात होती. तेव्हाच गावातील लोकांनी दोघांना पकडलं आणि पोलिसांकडे घेऊन गेले. पतीला माहिती मिळताच तो पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. यावेळी त्याने सगळ्याना हैराण करणारं असं काही केलं. त्याने नवरीचा हात तिच्या बॉयफ्रेंडच्या हातात दिला. तिथे असलेल्या लोकांना त्याने सांगितलं की, त्याच्या परवानगीनेच पत्नी घरातून पळून जात होती.

ही घटना पलामू जिल्ह्याच्या बीचकिला गावातील आहे. इथे मनोर कुमार सिंहचं लग्न 10 मे रोजी प्रियंकासोबत झालं होतं. काही दिवसातच मनोज कुमार सिंह याला समजलं की, पत्नीचं तिच्या गावातील तरूणासोबत अफेअर सुरू आहे. दोघेही 10 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. पण त्यांची जात वेगळी असल्याने लग्न होऊ शकलं नाही.

लग्नानंतरही तिला तिच्या प्रियकराकडे जायचं होतं. यासाठी तिने पतीची परवानगी घेतली होती. पोलीस अधिकारी कमलेश कुमार म्हणाले की, नवरदेव आणि नवरीच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली आहे. पण तरूणीचे कुटुंबिय आले नाहीत. या बुधवारी मनोजने आनंदाने त्याच्या पत्नीचा हात तिच्या प्रियकराच्या हातात दिला.

याबाबत मनोज म्हणाला की, 10 मे रोजी त्याचं लग्न झालं होतं. लग्नानंतर त्याची नवी नवरी खूश नव्हती. मग समजलं की, प्रियंकाचा एक प्रियकर आहे आणि तिला त्याच्यासोबत रहायचं आहे. यासाठी त्याने परवानगी दिली. पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून जात होती तेव्हा गावातील लोकांनी त्यांना पकडलं आणि पोलिसांकडे घेऊन गेले.

तेच प्रियंका म्हणाली की, ती तिच्या या लग्नाने खूश नव्हती. हे तिने तिच्या पतीलाही सांगितलं होतं. तिला तिच्या प्रियकरासोबत रहायचं होतं. तिने प्रियकर जितेंद्रसोबत आधी लग्नही केलं आहे. हे तिने कुटुंबियांनाही सांगितलं होतं. पण त्यांनी जबरदस्ती तिचं लग्न मनोजसोबत लावून दिलं.

टॅग्स :JharkhandझारखंडLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarriageलग्नJara hatkeजरा हटके