शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

लग्नाच्या 20व्या दिवशी नवरीने प्रियकरासोबत राहण्याची मागितली परमिशन, नवरदेवाने दिली आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 09:05 IST

इथे नवरदेवाने लग्नाच्या 20व्या दिवशी नवरीचा हात तिच्या बॉयफ्रेंडच्या हातात दिला. चला जाणून घेऊ नवरदेवाने असं का केलं?

सध्या लग्नाचा सीझन सुरू असल्याने अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असतात. कुठे नवरी पळून जाते तर कुठे नवरदेव अजब कारणाने लग्नास नकार देतो. पण झारखंडच्या पलामूमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे नवरदेवाने लग्नाच्या 20व्या दिवशी नवरीचा हात तिच्या बॉयफ्रेंडच्या हातात दिला. चला जाणून घेऊ नवरदेवाने असं का केलं?

लग्न झाल्यावर सामान्यपणे नवरी आनंदात असते. तिच्या नव्या आयुष्याला सुरूवात झालेली असते. पण ही नवरी शांत आणि एकटी राहत होती. कुणाला भेटत नव्हती आणि कुणाशी बोलत नव्हती. पण लपून आपल्या प्रियकरासोबत बोलत होती. हे काही दिवसातच नवरदेवाला समजलं. त्याच्याही लक्षात आलं की, वडिलांचा मान ठेवण्यासाठी त्याने या मुलीशी लग्न तर केलं पण ती खूश नाहीये.

अशात लग्नाच्या 20व्या दिवशी ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून जात होती. तेव्हाच गावातील लोकांनी दोघांना पकडलं आणि पोलिसांकडे घेऊन गेले. पतीला माहिती मिळताच तो पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. यावेळी त्याने सगळ्याना हैराण करणारं असं काही केलं. त्याने नवरीचा हात तिच्या बॉयफ्रेंडच्या हातात दिला. तिथे असलेल्या लोकांना त्याने सांगितलं की, त्याच्या परवानगीनेच पत्नी घरातून पळून जात होती.

ही घटना पलामू जिल्ह्याच्या बीचकिला गावातील आहे. इथे मनोर कुमार सिंहचं लग्न 10 मे रोजी प्रियंकासोबत झालं होतं. काही दिवसातच मनोज कुमार सिंह याला समजलं की, पत्नीचं तिच्या गावातील तरूणासोबत अफेअर सुरू आहे. दोघेही 10 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. पण त्यांची जात वेगळी असल्याने लग्न होऊ शकलं नाही.

लग्नानंतरही तिला तिच्या प्रियकराकडे जायचं होतं. यासाठी तिने पतीची परवानगी घेतली होती. पोलीस अधिकारी कमलेश कुमार म्हणाले की, नवरदेव आणि नवरीच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली आहे. पण तरूणीचे कुटुंबिय आले नाहीत. या बुधवारी मनोजने आनंदाने त्याच्या पत्नीचा हात तिच्या प्रियकराच्या हातात दिला.

याबाबत मनोज म्हणाला की, 10 मे रोजी त्याचं लग्न झालं होतं. लग्नानंतर त्याची नवी नवरी खूश नव्हती. मग समजलं की, प्रियंकाचा एक प्रियकर आहे आणि तिला त्याच्यासोबत रहायचं आहे. यासाठी त्याने परवानगी दिली. पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून जात होती तेव्हा गावातील लोकांनी त्यांना पकडलं आणि पोलिसांकडे घेऊन गेले.

तेच प्रियंका म्हणाली की, ती तिच्या या लग्नाने खूश नव्हती. हे तिने तिच्या पतीलाही सांगितलं होतं. तिला तिच्या प्रियकरासोबत रहायचं होतं. तिने प्रियकर जितेंद्रसोबत आधी लग्नही केलं आहे. हे तिने कुटुंबियांनाही सांगितलं होतं. पण त्यांनी जबरदस्ती तिचं लग्न मनोजसोबत लावून दिलं.

टॅग्स :JharkhandझारखंडLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarriageलग्नJara hatkeजरा हटके