शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

बिहारमध्ये लग्नात असा वाद पेटला की अंधारात पळून गेले पाहुणे, नवरदेवाला ठेवलं बांधून....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 11:52 IST

ही घटना वाचून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. ही घटना आहे चाचोपाली गावातील. इथे खोट्या दागिन्यांवरून लग्नात इतका वाद झाला की, लग्न मोडावं लागलं.

लग्न म्हटलं की, अनेक विचित्र घटना समोर येत असतात. कधी लग्नातच हुंड्यावरून गोंधळ होतो तर कधी नवरदेवाच्या शिक्षणावरून. पण बिहारच्या एका लग्नातून एक वेगळाच किस्सा समोर आला आहे. ही घटना वाचून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. ही घटना आहे चाचोपाली गावातील. इथे खोट्या दागिन्यांवरून लग्नात इतका वाद झाला की, लग्न मोडावं लागलं.

मीडिया रिपोर्टनुसार, चाचोपाली गावात गुरूवारी सतवार गावातून वरात आली होती. यावेळी एका रिवाजादरम्यान नवरदेवाकडील लोकांनी खऱ्या दागिन्यांऐवजी खोटे दागिने दिले गेले. यावरून नवरी-नवरदेव दोन्हीकडील लोकांमध्ये वाद झाला. ज्यानंतर हे लग्न मोडलं आणि वरातीत आलेले लोक कसेतरी तिथून पळून घरी पोहोचले. (हे पण वाचा : प्रेयसीला सासरी जाताना बघू शकला नाही माथेफिरू प्रियकर, रस्त्यात अडवून झाडली तिच्यावर गोळी)

रिपोर्टनुसार, अभिषेक कुमार नावाच्या नवरदेवाचं लग्न हुंड्यात एक लाख रूपये नगदी आणि बाइक देऊन ठरलं होतं. तेच नवरदेवाचे वडील लग्नात ९० हजारांचे दागिने देतील असंही ठरलं होतं. पण त्यांनी ९०० रूपयांचे खोटे दागिने दिले. यावरून वाद पेटला तर नवरीकडील लोकांनी हुंड्यात बाईक देण्यास नकार दिला. (हे पण वाचा : बहिणीच्या सासरी गेला होता भाऊ, तिथे असं काही घडलं की चक्क बहीण-भावाचं लग्न लावून देण्यात आलं!)

यानंतर वाद इतका पेटला की, नवरीकडील लोकांनी नवरदेवाकडील काही लोकांनी बंदी बनवलं. यातील काही लोक रात्रीच्या अंधारात पळून गेले. या घटनेची माहिती संपूर्ण गावात आगीसारखी पसरली. त्यानंतर गावातील प्रमुख लोक तिथे पोहोचले आणि त्यांनी वाद मिटवला. यानंतर संपूर्ण गावासमोर दोन्ही पक्षाकडील लोकांनी एकमेकांना दिलेलं साहित्य आणि हुंडा परत करण्याचं ठरलं. तेव्हा कुठं हा वाद मिटला. 

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्नJara hatkeजरा हटके