शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

जगातील सगळ्यात महागडे अश्रू, जे मनुष्यांना देतील जीवनदान अन् सापांसाठी ठरतील कर्दनकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 16:27 IST

World's Most Expensive Tear: अश्रू विकले जातात किंवा त्यांना मोठी किंमत मिळते, असं कुणी सांगितलं तर सहजपणे विश्वास बसणार नाही. मात्र, असं होत आहे. पण ही किंमत मनुष्यांच्या नाही तर उंटाच्या अश्रूंना मिळत आहे. 

World's Most Expensive Tear: दु:खं झालं किंवा आनंद झाला तर डोळ्यातून अश्रू येतात. अश्रू येणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. अश्रू निघाल्यानं डोळे साफ होतात आणि मन हलकं होतं. पण अश्रू विकले जातात किंवा त्यांना मोठी किंमत मिळते, असं कुणी सांगितलं तर सहजपणे विश्वास बसणार नाही. मात्र, असं होत आहे. पण ही किंमत मनुष्यांच्या नाही तर उंटाच्या अश्रूंना मिळत आहे. 

राजस्थानची शान असणारे उंट आता केवळ शेतीच्या कामासाठी किंवा ओझं वाहण्यासाठी राहिले नाहीत. कारण बिकानेरच्या नॅशनल रिसर्च सेंटर ऑन कॅमल (NRCC) च्या एका रिपोर्टमधून आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. या रिसर्चनुसार, उंटाचे अश्रू आणि त्यांच्या  इम्यून सिस्टीममधून मिळणारे अ‍ॅंटी-बॉडी आता मनुष्यांचा जीव वाचण्यासाठी कामात येऊ शकतात. खासकरून सापाच्या विषाच्या उपचारात.

NRCC च्या अभ्यासकांनी उंटांना सॉ-स्केल्ड वायपर या विषारी सापाच्या विषानं इम्युनाइज करण्यात आलं. त्यानंतर उंटाचे अश्रू आणि रक्तातून काढण्यात आलेल्या अ‍ॅंटीबॉडीज टेस्ट करण्यात आल्या. याचा प्रभाव सकारात्मक दिसून आला. या अ‍ॅंटीबॉडीज रक्त वाहणं आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याची प्रक्रिया सामान्य करण्यात फायदेशीर दिसल्या.  

दरवर्षी मरतात ५८,००० लोक

भारतात दरवर्षी ५८ हजारांपेक्षा जास्त लोक सापाच्या विषानं आपला जीव गमावतात. जवळपास १.४ लाख लोक अपंग होतात. हे प्रमाण जगात सगळ्यात जास्त आहे. गाव आणि खेड्यापाड्यांमध्ये योग्य वेळेवर उपचार मिळत नसल्यानं हे जीव जातात. अशात उंटातून मिळत असलेला हा नवा उपाय स्वस्त, सुरक्षित आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो.

हा रिसर्च केवळ उपचारासाठी महत्वाचा नाही तर उंट पालक शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर आहे. बिकानेर, जैसलमेर आणि जोधपूरसारख्या भागांमधील उंट पालक उंटाच्या अश्रूचे आणि रक्ताचे सॅम्पल देण्याच्या बदल्यात ५ हजार ते १० हजार रूपये महिना कमाई करत आहेत.

उंट आता केवळ वाळवंटात ओझं वाहणारा प्राणी नाही तर जीवनदान देणारा प्राणी ठरत आहे. या शोधानं ग्रामीण भागात विकास आणि स्थानिक जीवांचं महत्वही दाखवलं आहे. येत्या काळात उंट हजारो भारतीयांचा जीव वाचवू शकतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेHealthआरोग्यResearchसंशोधन