शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

जगातील सगळ्यात महागडे अश्रू, जे मनुष्यांना देतील जीवनदान अन् सापांसाठी ठरतील कर्दनकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 16:27 IST

World's Most Expensive Tear: अश्रू विकले जातात किंवा त्यांना मोठी किंमत मिळते, असं कुणी सांगितलं तर सहजपणे विश्वास बसणार नाही. मात्र, असं होत आहे. पण ही किंमत मनुष्यांच्या नाही तर उंटाच्या अश्रूंना मिळत आहे. 

World's Most Expensive Tear: दु:खं झालं किंवा आनंद झाला तर डोळ्यातून अश्रू येतात. अश्रू येणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. अश्रू निघाल्यानं डोळे साफ होतात आणि मन हलकं होतं. पण अश्रू विकले जातात किंवा त्यांना मोठी किंमत मिळते, असं कुणी सांगितलं तर सहजपणे विश्वास बसणार नाही. मात्र, असं होत आहे. पण ही किंमत मनुष्यांच्या नाही तर उंटाच्या अश्रूंना मिळत आहे. 

राजस्थानची शान असणारे उंट आता केवळ शेतीच्या कामासाठी किंवा ओझं वाहण्यासाठी राहिले नाहीत. कारण बिकानेरच्या नॅशनल रिसर्च सेंटर ऑन कॅमल (NRCC) च्या एका रिपोर्टमधून आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. या रिसर्चनुसार, उंटाचे अश्रू आणि त्यांच्या  इम्यून सिस्टीममधून मिळणारे अ‍ॅंटी-बॉडी आता मनुष्यांचा जीव वाचण्यासाठी कामात येऊ शकतात. खासकरून सापाच्या विषाच्या उपचारात.

NRCC च्या अभ्यासकांनी उंटांना सॉ-स्केल्ड वायपर या विषारी सापाच्या विषानं इम्युनाइज करण्यात आलं. त्यानंतर उंटाचे अश्रू आणि रक्तातून काढण्यात आलेल्या अ‍ॅंटीबॉडीज टेस्ट करण्यात आल्या. याचा प्रभाव सकारात्मक दिसून आला. या अ‍ॅंटीबॉडीज रक्त वाहणं आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याची प्रक्रिया सामान्य करण्यात फायदेशीर दिसल्या.  

दरवर्षी मरतात ५८,००० लोक

भारतात दरवर्षी ५८ हजारांपेक्षा जास्त लोक सापाच्या विषानं आपला जीव गमावतात. जवळपास १.४ लाख लोक अपंग होतात. हे प्रमाण जगात सगळ्यात जास्त आहे. गाव आणि खेड्यापाड्यांमध्ये योग्य वेळेवर उपचार मिळत नसल्यानं हे जीव जातात. अशात उंटातून मिळत असलेला हा नवा उपाय स्वस्त, सुरक्षित आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो.

हा रिसर्च केवळ उपचारासाठी महत्वाचा नाही तर उंट पालक शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर आहे. बिकानेर, जैसलमेर आणि जोधपूरसारख्या भागांमधील उंट पालक उंटाच्या अश्रूचे आणि रक्ताचे सॅम्पल देण्याच्या बदल्यात ५ हजार ते १० हजार रूपये महिना कमाई करत आहेत.

उंट आता केवळ वाळवंटात ओझं वाहणारा प्राणी नाही तर जीवनदान देणारा प्राणी ठरत आहे. या शोधानं ग्रामीण भागात विकास आणि स्थानिक जीवांचं महत्वही दाखवलं आहे. येत्या काळात उंट हजारो भारतीयांचा जीव वाचवू शकतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेHealthआरोग्यResearchसंशोधन