शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

एक असं ठिकाण जिथे लग्नानंतर मुलीऐवजी मुलांची केली जाते पाठवणी, भारतातच आहे 'हे' ठिकाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 15:01 IST

A place where boys leave their home after marriage: एक ठिकाण असं आहे जिथे लग्नानंतर मुलींना नाही तर मुलांना आपलं घर सोडावं लागतं. चला तर पाहुया काय आहे ही प्रथा आणि कुठे आहे. 

A place where boys leave their home after marriage: जगात वेगवेगळ्या संस्कृती फॉलो करणारे लोक राहतात. त्यांचे रितीरिवाज वेगवेगळे असतात. मग ते सणावाराचे असो वा लग्न समारंभाचे असोत. पण गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल की, आपल्या देशात असो वा इतर कोणत्या देशात असो, प्रत्येक धर्मात मुलीला लग्नानंतर आपलं घर सोडून जावं लागतं. जास्तीत जास्त ठिकाणी हाच रिवाज आहे. पण तुम्हाला माहीत नसेल की, एक ठिकाण असं आहे जिथे लग्नानंतर मुलींना नाही तर मुलांना आपलं घर सोडावं लागतं. चला तर पाहुया काय आहे ही प्रथा आणि कुठे आहे. 

कुठे आहे ही प्रथा?

जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणाबाबत आणि या प्रथेबाबत माहीत नसेल. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, ही अनोखी प्रथा भारतातील मेघालय राज्यातील एका खास समाजात पाळली जाते. मेघालयाच्या चेरापुंजी भागातील खासी जमातीतील लोक ही प्रथा पाळतात. चेरापुंजी भागातील खासी जमातीमध्ये लग्न झाल्यावर मुलीऐवजी मुलाला घर सोडून मुलीसोबत रहायला जावं लागतं. पण पुढे काही दिवसांनी तो आपलं घर बदलतो.

महिलाच असतात मुख्य

या जमातीमध्ये आणखी एक जुनी परंपरा आहे. ज्या परंपरेनुसार सगळ्यात लहान मुलगी आई-वडिलांसोबत राहणार आणि त्यांची सेवा करणार. घरातील मोठ्या मुली घर सोडून वेगळ्या होऊ शकतात. पण त्यासाठीही एक निश्चित काळ ठरवण्यात आला आहे. त्यानंतरच त्या घर सोडू शकतात.

खासी जमातीमध्ये एक खास बाब अशीही आहे की, इथे घरात महिलाच मुख्य असतात. त्याशिवाय आणखी एक बाब म्हणजे जेव्हा संपत्तीची वाटणी होते, तेव्हा मुलांना कमी आणि मुलींना जास्त वाटा दिला जातो. यात सगळ्यात जास्त वाटा आई-वडिलांसोबत राहणाऱ्या लहान मुलीला मिळतो.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके