शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
4
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
5
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
6
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
7
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
8
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
9
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
10
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
11
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
12
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
13
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
14
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
15
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
16
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
17
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
18
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
19
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
20
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका

23 March Shaheed Diwas : फाशीआधी कुणाचं आत्मचरित्र वाचत होते भगत सिंह? नेमकं काय घडलं त्या दिवशी.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 12:26 IST

23 March Shaheed Diwas : १ वर्ष आणि ३५० दिवस तुरूंगात राहिल्यानंतरही भगत सिंह हे आनंदी होते. ते या गोष्टीने आनंदी होते की, ते देशासाठी आपला जीव गमावत आहेत.

आजच्याच दिवशी देशातील सर्वात मोठ्या क्रांतिकारकाने देशासाठी आपला जीव गमावला होता. आजच्या दिवशीच स्वतंत्र सेनानी भगत सिंह (Bhagat Singh), सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी (Shaheed Diwas) देण्यात आली होती. भगत सिंह यांना माहीत होते की, देशासाठी त्यांना आपली जीव द्यावा लागेल. असे म्हणतात की, १ वर्ष आणि ३५० दिवस तुरूंगात राहिल्यानंतरही भगत सिंह हे आनंदी होते. ते या गोष्टीने आनंदी होते की, ते देशासाठी आपला जीव गमावत आहेत. जेव्हा तिघांनाही फाशी देण्याचा निर्णय झाला तेव्हा तुरूंगातील कैदी रडत होते. 

एकीकडे भगत सिंह हे आनंदी होते तर दुसरीकडे देशात प्रदर्शन सुरू होते. लाहोरमध्ये मोठी गर्दी जमा झाली होती. इंग्रजांना माहीत होतं की, तिघांना फाशी देताना लोक रस्त्यावर येतील. त्यामुळे मिलिट्रीचा बंदोबस्त लावण्यात आला होता.देशात गोंधळ होऊ नये म्हणून भगत सिंह आणि त्यांच्या दोन साथिदारांना ठरलेल्या दिवसाच्या एक दिवसआधीच फासावर लटकवण्यात आले होते. तिघांनाही फाशी देण्यासाठी २४ मार्च हा दिवस ठरवण्यात आला होता. पण फाशी एक दिवसआधी देण्यात आली. सतलुज नदीच्या किनारी त्यांचे मृतदेह गपचूप नेण्यात आले होते.

ठरलेल्या वेळेआधी फाशी दिली जाणार होती. अशात फाशीची प्रक्रिया गुप्त ठेवण्यात आली होती. यावेळी फार कमी लोक उपस्थित होते. यात यूरोपचे डेप्युटी कमिश्नरही होते. जितेंदर सान्याल यांनी लिहिलेल्या 'भगत सिंह' नुसार, फाशी लावण्याच्या काही वेळेआधी भगत सिंहने डेप्युटी कमिश्नरकडे पाहिलं आणि हसत म्हणाले की, 'मिस्टर मॅजिस्ट्रेट, तुम्ही भाग्यशाली आहात की, तुम्हाला हे बघायला मिळत आहे की, भारताचे क्रांतिकारी कशाप्रकारे आपल्या आदर्शांसाठी फासावर चढतात'.

भगत सिंह यांना पुस्तके वाचण्याची फार आवड होती. त्यांचं पुस्तकांवरील प्रेम हैराण करणारं होतं. ते त्यांच्या जीवनाच्या अखेरपर्यंत नवनवीन पुस्तके वाचत राहिले. जेव्हाही ते पुस्तके वाचायचे तेव्हा नोट्स काढून ठेवायचे. तुरूंगातही त्यांनी अनेक पुस्तके वाचली.

जेव्हा त्यांना फाशी दिली जात होती तेव्हा ते लेनिनचं आत्मचरित्र वाचत होते. तुरूंगातील पोलिसांनी त्यांना सांगितले की, तुमच्या फाशीची वेळ झाली आहे. तेव्हा ते म्हणाले होते की, 'थांबा, आधी एका क्रांतिकारकाला दुसऱ्या क्रांतिकारकाशी भेटू द्या'. पुढील एक मिनिट ते पुस्तक वाचत राहिले. नंतर पुस्तक बंद करून ते छताकडे फेकलं आणि म्हणाले, आता ठिक आहे. चला'.

इंग्रज सरकार दिल्लीच्या असेम्बलीमध्ये पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल पास करणार होते. हे दोन्ही बिल असे होते ज्याने भारतीयांवर इंग्रजांचा दबाव आणखी वाढला असता. फायदा केवळ इंग्रजांचा होणार होता. याने चळवळही बंद पाडणंही शक्य होणार होतं. हे दोन बिल त्यांना पास करून घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी जमेल ते प्रयत्न केले होते.  

टॅग्स :Shaheed Diwasशहीद दिवसBhagat SinghभगतसिंगInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सhistoryइतिहास