शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

पत्नी पळाली, दलालीचे १ लाखही बुडाल्याने तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 21:47 IST

दलालाकडून फसवणूक

जळगाव : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नी पळाली. लग्न जोडण्यासाठी महिला दलालांनी घेतलेले एक लाख रुपयेही परत मिळत नसल्याच्या संतापात कैलास संतोष चवरे (रा. कुसुंबा, ता. जळगाव) या तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. दरम्यान, याप्रकरणात दलाल लिलाबाई उर्फ भाभी रामनारायण जोशी (रा.शनी पेठ) व संगीताबाई रोहीदास भालेराव (३७, हॅपी होम कॉलनी) या दोघांना शनी पेठ पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. ७ आॅगस्ट रोजी कैलास याचा मृत्यू झाला होता.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कैलास या तरुणाचे सात वर्षापूर्वी लग्न झाले होते. चार वर्षापूर्वी पत्नीशी घटस्फोट झाला. पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आहे. समाजात मुलींची कमतरता असल्याने मुली मिळण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे मेहुणा संतोष रघुनाथ पाटील (रा. कुसुंबा, ता. जळगाव) हे कुसुंबा येथे राहणाºया कल्पनाबाई यांच्यामार्फत शनी पेठेतील लिलाबाई उर्फ भाभी रामनारायण जोशी यांच्याकडे गेले. लिलाबाई हिने विवाह संबंध जोडणारी उज्ज्वला उर्फ संगीता ही मलकापूरला माझी ओळखीची असून तिच्याकडे मुली असल्याचे सांगितले.त्यानुसार कैलास, त्याचा मेहुणा संतोष व इतर नातेवाईक मलकापूर येथे मुलगी पाहण्यासाठी गेले. तेथे मुलगी पसंत पडली, मात्र नंतर मुलाचे दुसरे लग्न असल्याने तिने लग्नास नकार दिला. त्यामुळे या दलाल महिलेने दुसरी मुलगी दाखविली, परंतु त्यासाठी १ लाख रुपये लागतील म्हणून सांगितले. मुलगी पसंत झाल्यानंतर जागेवरच ४० हजार रुपये देण्यात आले व त्याच दिवशी तेथे एकमेकाच्या गळ्यात माळ टाकून कैलास व मुलीचे लग्न लावण्यात आले. त्यानंतर सर्वजण घरी आले असता कुसंबा येथे लिलाबाई जोशी हिला ६० हजार रुपये देण्यात आले. ३० जुलै २०२० रोजी विवाह व पैशाचा व्यवहार झाला.खोट्या नावाचा वापरलग्न लावून देण्याच्या प्रकरणांमध्ये दलालांकडून खोट्या नावाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. संगीता भालेराव हिने पद्मा सुधाकर खिल्लारे, संगीता रोहीदास भालेराव, संगीता रमेश पाटील, व संगीता संतोष पाटील अशा नावांचा वापर केल्याचे उघड झाले आहे. या गुन्ह्यात नववधू व लिलाबाई जोशी या दोघांना अटक झालेली नाही.दुसºया दिवशी मोबाईल घेऊन पलायनदुसºया दिवशी ३१ रोजी ११.३० वाजता नववधू कैलासचा मोबाईल घेऊन घरातून पळून गेल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे कैलास व संतोष असे दोघंजण १ आॅगस्ट रोजी लिलाबाई हिच्याकडे गेले. मुलगी पळून गेली, त्यामुळे आमचे एक लाख रुपये परत कर, अशी मागणी त्यांनी केली असता लिलाबाई हिने पैसे देण्यास नकार दिला. त्यावर पैसे दिले नाही तर मी जीवाचे बरे वाईट करुन घेईल, अशी धमकी कैलास याने दिली. परंतु तरीही लिलाबाई हिने पैसे परत केले नाहीत. ३ रोजी कैलास याने ‘पत्नी पळाली, १ लाख रुपये पण गेले’ असे म्हणत संतापात शनी पेठेत शनी मंदिराकडे विष प्राशन केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबाने कैलास याला दवाखान्यात दाखल केले. तेथे ७ आॅगस्ट रोजी उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हादरम्यान, या घटनेनंतर संताष रघुनाथ पाटील यांनी शनी पेठ पोलीस स्टेशन गाठून नववधू, दलाल लिलाबाई उर्फ भाभी रामनारायण जोशी (रा. शनी पेठ) व संगीताबाई रोहीदास भालेराव यांच्याविरुध्द तक्रार दिली. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, संगीता हिला रविवारी पोलिसांनी अटक केली. सोमवारी दलाल लिलाबाई उर्फ भाभी रामनारायण जोशी हिला अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघींचीही कारागृहात रवानगी केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेशसिंग पाटील, सलीम पिंजारी, रवींद्र पाटील, परीस जाधव, अभिजित सैंदाणे, अनिल कांबळे, राहूल पाटील, राहूल घेटे व धनंजय येवले करीत आहेत.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव