शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

जळगावात आई-वडिलांसमोरच तरुण मुलाची भोसकून हत्या; आक्रोशाने गावकरी झाले सुन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 17:26 IST

मारेकरी २ वर्षाच्या चिमुरड्याच्या रडण्याच्या आवाजाने गहिवरले नाहीत. युवराजच्या उजव्या छातीच्या बाजूला धारधार शस्त्राने वार करून, मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले.

Jalgaon Murder : शेतातील दादर काढणीची घाई सुरू होती, शेतात महिला मजूर दाखल झाले. दादर काढणीच्या कामाला सुरुवात होईलच, त्याआधी वृद्ध आई-वडिलांचा किंचाळण्याचा आवाज झाला. शेतात आई-वडिलांच्या समोरच युवराज कोळी यांच्यावर हॉटेल व्यावसायिक भरत पाटील यांच्यासह तिघांनी चाकूने सपासप वार करीत हत्या केल्याची हृदयद्रावक घटना जळगाव तालुक्यातील कानसवाडा शिवारात शुक्रवारी सकाळी ७:३० वाजता घडली आहे.

कानसवाडा-शेळगावचे उपसरपंच राहिलेले युवराज कोळी यांचा शेळगाव येथील भरत पाटील यांच्यासोबत गुरुवारी रात्री वाद झाला. त्या वादातून सकाळी भरत पाटील यांच्यासह तिघांनी युवराज कोळी यांच्या कानसवाडा येथील शेतात जाऊन निघृण हत्या केली. आई-वडिलांनी व शेतात कामाला आलेल्या काही महिला मजुरांनी कोळी यांना एका खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. खुनाच्या या घटनेने भादली व परिसर हादरला आहे. कोळी यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईक, मित्रांची मोठी गर्दी झाली होती.

दोन वर्षांचा मुलगा रडत राहिला, ते मारतच राहिलेगुरुवारी युवराज कोळी आपल्या दोन वर्षाच्या चिराग नावाच्या मुलालाही शेतात घेऊन आले होते. युवराज कोळीवर हल्ला झाला, त्यावेळेस चिराग त्याच शेडमध्ये होता. हल्ला झाला, त्याचवेळी चिराग रडत होता. चिरागचे आजी-आजोबा मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी मारेकरी मात्र २ वर्षाच्या चिमुरड्याच्या रडण्याच्या आवाजाने गहिवरले नाहीत. युवराजच्या उजव्या छातीच्या बाजूला धारधार शस्त्राने वार करून, मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले.

काय आहे हत्येचे कारण...सोपान कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २०२१ मध्ये कोरोना काळात भरत पाटील याने आपले परमिट रूम व बीअर बार शासनाने निश्चित करून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ सुरू ठेवले होते. युवराज कोळी त्यावेळेस २ शेळगाव-कानसवाडा या ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच असल्याने भरत पाटील याला शासनाने निश्चित करून दिलेल्या वेळेतच व्यवसाय करण्यास सांगितले होते. तेव्हापासून भरत पाटील व त्याची मुले युवराज कोळी यांच्याशी ग्रामपंचायतीच्या मुद्द्यावरून भांडत होती. गुरुवारी रात्रीही काहीही कारण नसताना, भरत पाटील याने युवराज कोळी यांना ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात काय विकास केला, याचा जाब विचारत शिवीगाळ केल्याचे सांगितले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी शेतात येऊन संगनमताने भरत पाटील, परेश पाटील व देवेंद्र पाटील यांनी मुलाची हत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस