शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

जळगावात आई-वडिलांसमोरच तरुण मुलाची भोसकून हत्या; आक्रोशाने गावकरी झाले सुन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 17:26 IST

मारेकरी २ वर्षाच्या चिमुरड्याच्या रडण्याच्या आवाजाने गहिवरले नाहीत. युवराजच्या उजव्या छातीच्या बाजूला धारधार शस्त्राने वार करून, मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले.

Jalgaon Murder : शेतातील दादर काढणीची घाई सुरू होती, शेतात महिला मजूर दाखल झाले. दादर काढणीच्या कामाला सुरुवात होईलच, त्याआधी वृद्ध आई-वडिलांचा किंचाळण्याचा आवाज झाला. शेतात आई-वडिलांच्या समोरच युवराज कोळी यांच्यावर हॉटेल व्यावसायिक भरत पाटील यांच्यासह तिघांनी चाकूने सपासप वार करीत हत्या केल्याची हृदयद्रावक घटना जळगाव तालुक्यातील कानसवाडा शिवारात शुक्रवारी सकाळी ७:३० वाजता घडली आहे.

कानसवाडा-शेळगावचे उपसरपंच राहिलेले युवराज कोळी यांचा शेळगाव येथील भरत पाटील यांच्यासोबत गुरुवारी रात्री वाद झाला. त्या वादातून सकाळी भरत पाटील यांच्यासह तिघांनी युवराज कोळी यांच्या कानसवाडा येथील शेतात जाऊन निघृण हत्या केली. आई-वडिलांनी व शेतात कामाला आलेल्या काही महिला मजुरांनी कोळी यांना एका खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. खुनाच्या या घटनेने भादली व परिसर हादरला आहे. कोळी यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईक, मित्रांची मोठी गर्दी झाली होती.

दोन वर्षांचा मुलगा रडत राहिला, ते मारतच राहिलेगुरुवारी युवराज कोळी आपल्या दोन वर्षाच्या चिराग नावाच्या मुलालाही शेतात घेऊन आले होते. युवराज कोळीवर हल्ला झाला, त्यावेळेस चिराग त्याच शेडमध्ये होता. हल्ला झाला, त्याचवेळी चिराग रडत होता. चिरागचे आजी-आजोबा मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी मारेकरी मात्र २ वर्षाच्या चिमुरड्याच्या रडण्याच्या आवाजाने गहिवरले नाहीत. युवराजच्या उजव्या छातीच्या बाजूला धारधार शस्त्राने वार करून, मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले.

काय आहे हत्येचे कारण...सोपान कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २०२१ मध्ये कोरोना काळात भरत पाटील याने आपले परमिट रूम व बीअर बार शासनाने निश्चित करून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ सुरू ठेवले होते. युवराज कोळी त्यावेळेस २ शेळगाव-कानसवाडा या ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच असल्याने भरत पाटील याला शासनाने निश्चित करून दिलेल्या वेळेतच व्यवसाय करण्यास सांगितले होते. तेव्हापासून भरत पाटील व त्याची मुले युवराज कोळी यांच्याशी ग्रामपंचायतीच्या मुद्द्यावरून भांडत होती. गुरुवारी रात्रीही काहीही कारण नसताना, भरत पाटील याने युवराज कोळी यांना ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात काय विकास केला, याचा जाब विचारत शिवीगाळ केल्याचे सांगितले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी शेतात येऊन संगनमताने भरत पाटील, परेश पाटील व देवेंद्र पाटील यांनी मुलाची हत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस