शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'ये डर मुझे अच्छा लगा', सुषमा अंधारेंनी गुलाबराव पाटलांच्या टिकेलाही दिलं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 15:20 IST

सुषमा अंधारे ह्या तीन महिन्यांचं बाळ असून त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर काय टीका केली याच्या क्लिप एकदा ऐका, असं म्हणत टोला लगावला.

जळगाव - बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. एकीकडे न्यायालयीन लढाई सुरू असताना दुसरीकडे दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. महाप्रबोधन यात्रेतून सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील प्रमुख नेत्यांना लक्ष्य केलं आहे. त्यावरुन, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारेंवर टीका केली. त्या टिकेला आता सुषमा अंधारे यांनी जगळगावात पत्रकारांशी बोलताना प्रत्युत्तर दिलं.  

सुषमा अंधारे ह्या तीन महिन्यांचं बाळ असून त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर काय टीका केली याच्या क्लिप एकदा ऐका, असं म्हणत टोला लगावला. गुलाबराव पाटील चोपडा तालुक्यातील धानोरा येथे १६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यासाठी आले असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली होती. त्यावर, सुषमा अंधारे यांनीही जळगाव दौऱ्यातच गुलाबरावांवर प्रहार केला. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील मला तीन महिन्यांचे बाळ म्हणत असतील, तर बाळ जसा सर्व खोड्या करतो, त्या करण्याचा मला अधिकार आहे, असं प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिलं.  

सुप्रीम कोर्टाचा अनादर होणारं कोणतंही वक्तव्य करणार नाही. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. "सत्य परेशान हो सकता है, पराजीत नहीं" असे म्हणत न्यायालयीन लढाईवर भाष्य केलं. आमदारांमुळे शिवसैनिक नसतात तर शिवसैनिकांमुळे आमदार असतात. लोकांचे पाठबळ नसल्यानेच आमदारांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. शिवसेना ही अन्यायाविरोधातली मशाल हातात घेऊन कोणत्याही दवाबाला बळी न पडता अत्यंत निष्ठेने आणि ठामपणे उभी असेल. सध्या महाराष्ट्राला कंगाल करण्याचे राजकारण सुरु आहे, असे म्हणत त्यांमनी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात असल्याकडे लक्ष वेधले. 

महाप्रबोधन यात्रेतील फलक चोरण्यावर 'ये डर मुझे अच्छा लगा, अशी मिश्कील प्रतिक्रिया त्यांनी दिली. आजपासून महाप्रबोधन यात्रेतील दुसर्‍या टप्प्यासाठी त्या जळगाव जिल्ह्यात आल्या आहेत. या अनुषंगाने जळगावात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. 

गुलाबरावांची उद्धव ठाकरेंवरही टीका

आमच्यावर बोलण्यासाठी काही लोकं सोडलेत, जा त्यांना बदनाम करा. कुणी कितीही आमच्यावर बोलण्याचा प्रयत्न करत असाल तरी ३० वर्ष शिवसेना संघटना वाचवण्यासाठी, वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. निवडणूक हरलो, जिंकलो तरी खांद्यावरचा भगवा खाली उतरवला नाही. परंतु आता ३-४ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून आलेले लोकं आमच्यावर टीका करतायेत. आम्ही मंत्रिपद सोडून गुवाहाटीला गेलो. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी हे पाऊल उचललं अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.  

टॅग्स :JalgaonजळगावSushma Andhareसुषमा अंधारेGulabrao Patilगुलाबराव पाटील