शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
2
फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
3
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी
4
पश्चिम बंगालमध्ये नवा ट्विस्ट! CM ममता बॅनर्जी भाजपा खासदाराच्या घरी; चर्चांना उधाण
5
"पप्पा फक्त एकदा परत या आणि..."; शहीद वडिलांना आजही व्हॉईस मेसेज पाठवतो ७ वर्षांचा लेक
6
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ जुलैला मतदान आणि निकाल लागणार
7
'भाजपशासित राज्ये पेपरफुटीची केंद्रे बनली', NEET परीक्षेतील गोंधळावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
8
Paras Defence And Space Technologies : एका दिवसात २० टक्क्यांचे रिटर्न; 'या' स्मॉलकॅप डिफेन्स कंपनीचे शेअर्स का बनलेत रॉकेट?
9
'मला न्याय द्या...', स्वाती मालीवाल यांचे शरद पवार, राहुल गांधींना पत्र; भेटीची वेळ मागितली!
10
वयानुसार किती वेळ आणि कोणता प्रकारचा करावा व्यायाम?; WHO ने दिल्या गाइडलाईन्स
11
IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; आता 'या' खात्याची मिळाली जबाबदारी
12
शिवसेना खासदार रवींद्र वायकर 'शिवतीर्थ'वर; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
13
"मी तर वारकऱ्यांमध्ये गेलो होतो पण..."; कार्यकर्त्याने पाय धुतल्यावर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
14
लोकसभेनंतर विधानसभेतही अजित पवारांना धोबीपछाड?; शरद पवारांकडून बारामतीत मोर्चेबांधणी
15
Godawari Power and Ispat shares : अधिक पैसे देऊन आपलेच शेअर खरेदी करणार 'ही' कंपनी, वृत्तानंतर गुंतवणूकदाराच्या शेअरवर उड्या
16
VIDEO: "हा काय भारत नाही"; चाहत्याला मारण्यासाठी धावला हारिस रौफ; रस्त्यातच मोठा गोंधळ
17
जीम ट्रेनरच्या प्रेमात अडकली, पतीच्या हत्येची सुपारी दिली; प्लॅन A फसला, त्यानंतर...
18
₹१८ वर जाऊ शकतो हा शेअर; एक्सपर्ट म्हणाले, "कर्ज कमी करणार कंपनी, खरेदी करा..."
19
सामान्य माणसाचं आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न, अक्षय कुमारच्या 'सरफिरा'चा रोमांचक ट्रेलर रिलीज
20
Team India सुपर-८ साठी सज्ज; रोहितने सांगितली रणनीती, म्हणाला, "शक्य तितक्या..."

गोवर, रुबेलाने वाढविली पालकांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 11:57 PM

लहान मुलांना इंजेक्शनची भीती

विजयकुमार सैतवालजळगाव : राष्ट्रीय कार्यक्रम असलेल्या गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेने लहान मुलांना इंजेक्शनची भीती असल्याने ते शाळेत जाण्यासाठी मागे-पुढे करीत आहे. या सोबतच या लसीकरणाच्या दुष्परिणामांबाबत वेगवेगळे संदेश फिरत असल्याने पालकांचीही चिंता वाढली आहे.मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेचे जळगाव जिल्ह्यात ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ८ लाख ५७ हजार ८४८ लाभार्थी असून त्यांना पाच आठवड्यात लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील या लाभार्थींप्ांैकी ६४ ते ६४ टक्के लाभार्थी हे शालेय विद्यार्थी असून त्यांना शाळेतच लसीकरण केले जाणार आहे. तसेच उर्वरित ३५ ते ४० टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण अंगणवाडी केंद्र व बाहय लसीकरण सत्रात केले जाणार आहे.राज्यात काही ठिकाणी या लसीकरण मोहिमेसाठी पालकांकडून संमतीपत्र मागितले जात असल्याच्या तक्रारी होत्या. या मुळे पालकांमध्ये अधिक चिंता आहे. शाळांकडून संमतीपत्र मागितले नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यासाठी संमतीपत्राची आवश्यकता नसल्याचेही आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.जळगाव जिल्ह्यात एकूण लाभार्थ्यांपैकी ६० ते ६५ टक्के लाभार्थी हे शाळेत जाणारे आहेत. त्यांना लस देण्यासाठी ३ हजार ३८० शाळांमध्ये एकूण ४३६६ लसीकरण सत्र राबविण्यात येणार आहे. उर्वरित ३५ ते ४० टक्के लाभार्थी शाळाबाह्य असून नंतरच्या २ आठवडयात अंगणवाडी केंद्र व बाह्य लसीकरणाचे ३०३३ सत्र, दुर्गम अति जोखमीचा भागामध्ये एकूण १३५ सत्र व २४८३ संस्थेतील सत्र असे एकूण जिल्ह्यातील १० हजार १७ सत्रामध्ये गोवर रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे.गोवर रुबेला लसीकरणाबाबत भीती असली तरी या मोहिमेचा लाभ सर्व नागरिकांनी घेऊन आपल्या ९ महिने ते १५ वर्षापर्यंतच्या सर्व मुला व मुलींना गोवर रुबेलाची लस द्यावी, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.गोवर-रुबेला लसीकरणाबाबत पालकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने ते बालरोग तज्ज्ञांकडे विचारणा करीत आहेत. अनेक पालकांनी याबाबत संमती दर्शविली असली तरी मुलांना लस दिली असल्याने पुन्हा द्यावी की नाही, या बाबत संभ्रमात आहेत. त्यात सोशल मीडियावर असणाºया वेगवेगळ््या संदेशांमुळे पालक भयभीत होत असल्याचे सांगितले जात आहे. हे लसीकरण केल्यानंतर कोणत्याही लसीकरणानंतर येणारा ताप येऊ शकतो अथवा पूरळ येऊ शकतात. मात्र पालकांनी त्याबाबत भीती बाळगू नये, असे आवाहन बालरोग तज्ज्ञांनी केले आहे. ताप आल्यास औषधी देऊन तो कमी होऊ शकतो व पूरळ आल्यास त्यासाठी औषधोपचाराची आवश्यकता नसल्याचे बालरोग तज्ज्ञांचेही म्हणणे आहे

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव