शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

विद्युत खांब हटविण्याचा कामाला सोमवारपासून होणार सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला मुख्य अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब हटविण्याचा कामाला आता सोमवारचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला मुख्य अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब हटविण्याचा कामाला आता सोमवारचा मुहूर्त मिळाला आहे. तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या या कामाला आता सोमवारपासून सुरुवात होणार असल्याची माहिती महावितरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सोमवारी कामाला सुरुवात झाल्यानंतर पंधरा दिवसात विद्युत खांब स्थलांतरीत करण्याचे काम पुर्ण होणार आहे.

मनपा प्रशासनाने २५ कोटींमधील शिल्लक निधीतील दीड कोटी रुपयांचा निधी महावितरणकडे वर्ग केल्यानंतर आता या कामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, शुक्रवारी मनपा व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या पुलाच्या ठिकाणी जावून पाहणी केली. पुलाची पाहणी केल्यानंतर विद्युत खांब हटविण्यासाठी कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अशा प्रकारे केले जाणार स्थलांतर

शिवाजी नगर उड्डाणपुलापासून ते टॉवर दरम्यान उच्च दाबाची विद्युत लार्इन बंद करावी लागणार आहे. त्या ठिकाणचे विद्युत खांब काढून टाकावे लागतील. या संपुर्ण भागात अंडरग्राऊंड हायटेन्शन लार्इन टाकावी लागणार आहे. यासोबतच वीज ग्राहकांसाठी कमी दाबाची लार्इन अंडरग्राऊंड टाकावी लागेल. पुलापासून टॉवरपर्यंत रस्त्यात एकही पोल उभारला जाणार नसून उच्च दाबाची विद्युत लार्इन ही अंडरग्राऊंड टाकली जाणार आहे. तसेच ग्राहकांना कनेक्शनसाठी ठिकठिकाणी फिडर पिलर उभारले जाणार आहेत.

फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होवू शकतो पुल ?

शिवाजीनगर उड्डाणपुलाचे आतापर्यंत ६० टक्के पुर्ण झाले असून, विद्युत खांबाचा प्रश्न जर वेळीच मार्गी लागला असता तर पुलाचे काम आतापर्यंत पुर्ण झाले असते. दरम्यान, विद्युत खांब स्थलांतर करण्याचे काम महावितरणने महिनाभरात पुर्ण केले तर पुलाचे उर्वरित काम फेब्रुवारी २०२२ पर्यंत पुर्ण होण्याची शक्यता आहे. मक्तेदाराकडून गर्डर तयार करण्याचे सुरुच ठेवले असून, केवळ विद्युत खांब स्थलांतरीत होण्याचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे.